शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

दुर्दैवी घटना! मामा-मामीनंतर भाचीवरची काळाचा घाला; गाडीवर झाड कोसळून झाला होता अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2022 12:16 IST

उपचार सुरू असताना रात्री दोनच्या सुमारास मृत्यू

नीरा :पुरंदर तालुक्यात काल शुक्रवारी झालेल्या वादळ वाऱ्यात पिंपळे येथे झाड अंगावर कोसळून नवविवाहित जोडप्याचा मृत्यु झाला होता. यामध्ये त्यांची सात वर्षाची भाची गंभीर जखमी झाली होती. तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना रात्री दोनच्या सुमारास तिचाही मृत्यू झाला आहे.

काल (दि. २२ एप्रिल) सायंकाळी पुरंदर तालुक्यात पाऊस व वादळ वारा सुरु झाला होता. यावेळी परिंचे येथील रेनुकेश गुणशेखर जाधव (वय २९ वर्ष)  व त्याची पत्नी सारिका रेनुकेश जाधव (वय २३ वर्ष) त्याच बरोबर त्यांची भाची ईश्वरी संदेश देशमुख हे सासवडहून यात्रेनिमित्त परिंचेकडे मोटार सायकलवर जात होते. साधारण सात वाजलेच्या सुमारास पिंपळे येथून जात असतांना रस्त्या शेजारील अर्धवट जळलेले वडाचे झाड त्यांच्या अंगावर कोसळले. यामध्ये रेनुकेश व सारिका यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर त्यांची भाची (बहिणीची मुलगी) गंभीर जखमी झाली होती.

बेशुद्ध अवस्थेत असल्याने ईश्वरी हिला पुढील उपचारासाठी पुणे येथे पाठवण्यात आले होते. मात्र आज पहाटे दोनच्या सुमारास या मुलीचा ही मृत्यू झाल्याची माहिती सामोर येत आहे. या घटनेमुळे तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे तीन जीवांचा अंत :

वृद्ध माता पिता झाले पोरके पुरंदर तालुक्यातील बांधकाम विभाग रस्त्यावरील वाहतूक सुरक्षेबाबत अत्यंत दुर्लक्ष करीत आहे. तालुक्यात यापूर्वी सुद्धा अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. रस्त्याच्याकडेला असलेल्या धोकादायक झाडांचा वेळोवेळी सर्वे करून त्यावर उपाय योजना करायला हव्यात. मात्र अर्धवट जळलेली झाडे व पूर्ण वाळलेली झाडे अनेक ठिकाणी यमदूत म्हणून आज ही उभी आहेत. जळालेली किंवा वाळलेली झाडे काढली तर बांधकाम विभागाच्या कारवाईला लोकांना सामोरे जावे लागते. त्यामुळे लोकही त्याकडे दुर्लक्ष करतात. आता तरी बांधकाम विभागाने रस्ता सुरक्षा बाबत आढावा घेऊन आणखी दुर्घटना होण्या अगोदरच उपाय योजना करायला हव्यात.

टॅग्स :PurandarपुरंदरPuneपुणेRainपाऊसpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAccidentअपघात