शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

स्वातंत्र्यानंतरही विज्ञानापासून आपण लांबच; डॉ. जयंत नारळीकर यांची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 2:38 AM

ज्या गोष्टींवर आपण विश्वास ठेवतो त्याची योग्य तपासणी केली तर एकविसाव्या शतकात राहाणे जास्त सोयीचे होईल याकडे त्यांनी लक्ष वेधले.

पुणे : पंडित नेहरूंनी ‘डिस्कव्हरी आॅफ इंडिया’मधून विज्ञानाची महती लोकांपर्यंत पोहोचवली. स्वातंत्र्यानंतर लोक विज्ञानाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतील आणि त्यांच्यात एक निर्णयक्षमता निर्माण होईल. मात्र स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे झाली तरी वैज्ञानिक दृष्टिकोनापासून आपण लांबच आहोत, अशी खंत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी व्यक्त केली. ज्या गोष्टींवर आपण विश्वास ठेवतो त्याची योग्य तपासणी केली तर एकविसाव्या शतकात राहाणे जास्त सोयीचे होईल याकडे त्यांनी लक्ष वेधले.२० आॅगस्ट हा डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा हौतात्म्य दिन या वर्षीपासून ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस’ म्हणून पाळण्याचा निर्णय आॅल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्क आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांनी घेतला आहे. त्याच्या पूर्वसंध्येला या दोन्हींसह लोकविज्ञान संघटना आणि सिम्बायोसिस स्कूल आॅफ लिबरल आटर््स या संघटनांच्या वतीने ‘वैज्ञानिक दृष्टिकोन कशासाठी?’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये ‘२१ व्या शतकात जगायला शिकताना’ या विषयावर ते बोलत होते.याप्रसंगी मुक्ता दाभोलकर, डॉ. विवेक माँटेरो आणि डॉ. सत्यजित रथ उपस्थित होते.डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी सापडले ही समाधानाची गोष्ट आहे. लवकरच संपूर्ण कट उघडकीस येईल अशी अपेक्षा व्यक्त करून डॉ. नारळीकर यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाची मांडणी केली. ते म्हणाले, आज आसपासची स्थिती पाहातो तेव्हा असे वाटते, की अजूनही लोक १८ व १९व्या शतकातून बाहेर आलेले नाहीत. एकविसाव्या शतकात म्हणतो तेव्हा खासियत काय? विज्ञानाने अनेक गोष्टीत प्रगती केली. त्याचे पडसाद तंत्रज्ञानात उमटले. मात्र ज्या वेळी विज्ञानामधून तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञानामधून विज्ञानात जातो तेव्हा सगळे विज्ञानाचे शोध कल्याणकारी असतातच असे नाही. त्याचे दुष्परिणाम असू शकतात. विज्ञानाचा योग्य वापर करतो की नाही, हे पाहणे आवश्यक आहे. दाभोलकर यांना माहिती होते की जुन्या विचारसरणीला नवीन प्रवाहात आणले पाहिजे. जी माहिती आपल्याला आहे ती कधीतरी अपुरीदेखील असू शकते त्यासाठी एखादी गोष्ट तपासून घेता आली पाहिजे. आपण कुठली गोष्ट वैज्ञानिक दृष्टिकोनातून न तपासता अंधश्रद्धेच्या आहारी जातो. ही खरच अंधश्रद्धा आहे की श्रद्धा आहे? लोकांना मदत करणे ही श्रद्धा असू शकते मात्र दोन्हीमध्ये काय तथ्य आहे याची तपासणी करावी. विश्वास ठेवणाऱ्या गोष्टींची तपासणी केली तर एकविसाव्या शतकात राहणे जास्त सोयीचे होईल.डॉ. सत्यजित रथ ‘परंपरा आणि नवता : एक वैज्ञानिक दृष्टिकोन’ या विषयावर बोलताना म्हणाले, सामान्य माणसाचा दृष्टिकोन हा वैज्ञानिक नसतो. राज्यघटनेने हे गाठोडं लोकांच्या डोक्यावर दिले आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन मनुष्यत्वाचे व्यवच्छेदक लक्षण असेल तर आपण ते का हरवून बसलो आहोत हा प्रश्न आहे.वैैज्ञानिक दृष्टिकोन शोषणमुक्तीचा मार्गमुक्ता दाभोलकर यांनी ‘शोषणरहित समाजासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन’ या विषयावर विचार व्यक्त केले. शास्त्रज्ञ किंवा विज्ञानाच्या विषयावर काम करणाºया व्यक्तींना माहिती आहे की प्रश्न उपस्थित करताना हिंसा शोषण होऊ शकते, तरीही वैज्ञानिक दृष्टिकोन हाच शोषणमुक्तीचा मार्ग आहे आणि त्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. मुलांच्या मनात आज प्रश्न निर्माण होत आहेत आणि ते त्याची पडताळणी करीत आहेत. त्यांच्या अनुभविश्वाला भिडले पाहिजे तरच शोषणरहित समाज निर्माण होऊ शकतो. आयुष्यात निर्णय घेताना तर्क वापरता आले पाहिजेत. वैज्ञानिक दृष्टिकोनापासून शोषणविरहित समाजाकडे वाटचाल केली तर हिंसेला तोंड द्यावे लागणे हे आव्हान आहे. यासाठी माणसांनी एकमेकांचा आदर करून हात दिला पाहिजे.

टॅग्स :Jayant Narlikarजयंत नारळीकरscienceविज्ञान