शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
6
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
7
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
8
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
9
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
10
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
11
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
12
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
13
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
14
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
15
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
16
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
17
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
18
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
19
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
20
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळापाठोपाठ महागाईच्या झळांची तीव्रता वाढली

By admin | Updated: August 31, 2015 03:55 IST

दुष्काळाच्या झळांपाठोपाठ आता महगाईच्याही झळा बसू लागल्या आहेत. कांदा ग्राहकांना रडवत असतानाच सर्वसामान्यांच्या आहारातील महत्त्वाच्या घटक असणाऱ्या

बारामती : दुष्काळाच्या झळांपाठोपाठ आता महगाईच्याही झळा बसू लागल्या आहेत. कांदा ग्राहकांना रडवत असतानाच सर्वसामान्यांच्या आहारातील महत्त्वाच्या घटक असणाऱ्या डाळींचे दर गगनाला भिडले आहेत. तूरडाळ होलसेल बाजारात १६० रुपये किलोवर पोहोचल्याने डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. तूरडाळीसह सर्वच डाळींनी दरांचा उच्चांक गाठला आहे. गरिबांच्या ताटातून वरण-आमटी गायब होऊ लागली आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील प्रत्येक कुटुंबात आहारामध्ये डाळींचा वापर केला जातो. भात-वरण, वरण-भाकरी गरिबांचे अन्न समजले जाते; मात्र या वरणाच्या सर्वच डाळींचे दर मागील काही महिन्यांपासून कडाडले आहेत. त्यामुळे गृहिणींच्या स्वयंपाकाचे गणित बिघडू लागले आहे. वाढलेल्या दराचा परिणाम बाजारातही जाणवू लागला आहे. मागील काही दिवसांपासून डाळींच्या मागणीतही घट झाली आहे, तर आठवडेबाजारातून डाळींची मागणी करणारे ग्राहकच गायब असल्याचे येथील व्यापाऱ्यांनी सांगितले. विक्रीसाठी आणलेली १० किलो तूरडाळीचीदेखील एका महिन्याच्या कालावधीत विक्री झाली नसल्याचे येथील व्यापारी बाळू खिंडारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. सर्वसामान्य कुटुंबामध्ये रोजच्या जेवणात डाळीचे वरण, आमटी यांचा समावेश असतो. विशेषत: आजारी व्यक्ती व ज्येष्ठांच्या आहारात वरण अत्यावश्यक पदार्थ आहे. ऐन दुष्काळी परिस्थितीत सर्वत्र मंदीचे वातावरण आहे. त्यातच मानवी जीवनातील मूलभूत गरज असणारे अन्न महागले आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक मेटाकुटीस आला आहे. डाळींपाठोपाठ जेवणाची लज्जत वाढवणारा कांदा अजूनही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. बाजारात सध्या मध्यम प्रतीचा कांदा प्रतिकिलो ६० रुपये दराने विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्याचबरोबर केरळ येथील ‘सांबर कांदा’ १२० रुपये किलो दराने विकला जात आहे. या कांद्याला हॉटेल व्यावसायिकांकडून चांगली मागणी आहे, असे येथील विक्रेत्यांनी सांगितले. (वार्ताहर)