शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाबाधीताच्या मृत्युनंतर जवळच्या नातलगांनी मृताचे पाय धुन पाणी केले प्राशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:12 IST

शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त २० लोकाची मर्यादा असे जाहीर केले असतांनाही पुर्व हवेेेलीतील बहुतांश ग्रामपंचायत ...

शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त २० लोकाची मर्यादा असे जाहीर केले असतांनाही पुर्व हवेेेलीतील बहुतांश ग्रामपंचायत हद्दीत अंत्यविधी व दशक्रियाविधीसाठी शंभरपेक्षा जास्त लोक हजेरी लावून सरकारच्या आदेशाला कात्रजचा घाट दाखवत असल्याचे निदर्शनास येत आहे. या पाणी पिण्याच्या प्रकऱणातील रुग्णाच्या अंत्यविधीसाठीही शेकडो लोकसहभागी सहभागी झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

पुर्व हवेलीमधील एका मोठ्या रुग्णालयात या रूग्णाचे दोन दिवसापुर्वी कोरोना मुळे निधन झाले. संसर्ग वाढु नये यासाठी मृत व्यक्तीचे शरीर नातेवाईकांच्या ताब्यात न देता नियमांचे पालन करुन सदर व्यक्तीवर अंत्यसंस्कार केले जातात. परंतू जवळच्या नातेवाईकांनी विनवणी केल्याने रुग्णालय प्रशासनाने मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. शेवटची आंघोळ घालण्याच्या नावाखाली बाधिताचा मृतदेह तो राहत असलेल्या दाटीवाटीच्या वस्तीत नेला. व त्या ठिकाणी दहापेक्षा जास्त महिला नातेवाईकांनी त्याला आंघोळ घातली. त्यानंतर त्याचे घरातील १०० पेक्षा जास्त नातेवाईकांनी ते पाणी पिण्यास सुरुवात केली. ही बाब एका स्थानिक कार्यकर्त्याच्या लक्षात आली. कोरोनाचा संसर्ग वाढेल यासाठी पाय धुतलेले पाणी पिऊ नये व अंत्यविधीसाठी त्वरीत हलविण्याची विनंती त्याने नातेवाईकांच्याकडे केली. परंतू नातेवाईकांनी त्या कार्यकर्त्याला गप्प केले व पाणी प्राशन केले. सदर प्रकार या कार्यकर्त्याने व्हॉटस्अप ग्रुपवर टाकल्यानंतर उघडकीस आला. या प्रकरणाचा सखोल तपास करुन, मृत व्यक्तीच्या नातेवाईकांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी स्थानिक नागरीक करत आहेत.

कोरोनाची साखळी तुटावी म्हणून शासनाने अंत्यसंस्कार तसेच दशक्रियाविधी जास्तीत जास्त २० लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी दिलेली आहे. हा आदेश राज्यात पाळला जात आहे. परंतू याला पुर्व हवेली अपवाद ठरत असल्याचे चित्र दिसत आहे. पुर्व हवेली कोरोनाचा हॉटस्पॉट ठरू पहात असताना बहुतांश गावात अंत्यविधी व दशक्रियाविधीसाठी कमीत कमी १०० पेक्षा अधिक लोक जमा होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. वरील दोन्ही कार्यकर्मात सोशल डिस्टन्स अथवा मास्कचा नियम धाब्यावर बसवला जात आहे. पुर्व हवेेेलीतील मोठ्या ग्रामपंचायत हद्दीतील स्मशानभूमीमध्ये गेले ८ ते १० दिवसांत झालेल्या अंत्यविधी व दशक्रिया विधींमध्ये सहभागींवर नजर टाकल्यास महाराष्ट्र शासनाने फक्त पुर्व हवेलीलाच या नियमांतून सुट दिली की काय ? असा प्रश्न उपस्थित होते आहे.