शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागात '' घशाला तहान, उदासिन प्रशासन''...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2019 13:16 IST

पाणी नसल्याने अनेक ठिकाणी लोकांना काम धंदा सोडून पाण्याचा टँकर कधी येणार याची वाट पाहत ताटकळत थांबावे लागत असल्याचे चित्र आहे..

पळसदेव : इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागात तीव्र पाणीटंचाई जाणवत असताना प्रशासन मात्र उदासीन आहे. अनेक ठिकाणी स्वत: ग्रामपंचायत ने पाणी टँकर सुरू केले आहेत. लोकांची तहान भागविण्यासाठी अनेक ग्रामपंचायती दररोज हजारो रुपये खर्च करत आहेत. मात्र प्रस्ताव पाठवून सुध्दा प्रशासनाने टँकर सुरू केलेले नाहीत. त्यामुळे लोकांना आहे तहान. ...अन् प्रशासन उदासिन अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.पाणी नसल्याने अनेक ठिकाणी लोकांना काम धंदा सोडून पाण्याचा टँकर कधी येणार याची वाट पाहत ताटकळत थांबावे लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पाण्याचा टँकर आला की, पाणी भरण्यासाठी लोकांची झुंबड उडत आहे. यावरून पाण्याची टंचाई व दुष्काळाची दाहकता काय आहे याचा प्रत्यय येतो. एवढी भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असताना शासनाचा एकही अधिकारी फिरकताना दिसत नाही. यावरून प्रशासन किती तत्पर याचा प्रत्यय येतो. शासनाचे अधिकारी कागदोपत्री काम करतात. मात्र लोकांना पाणीटंचाईचा त्रास होतो.  याबाबत भादलवाडी गावच्या सरपंच राणीताई कन्हेरकर यांनी सांगितले की, गेली दीड महिन्यांपासून आम्ही स्व: खर्चाने कंपनी मधून टँकरने पाणी आणत आहोत.  डाळज क्रमांक  २ चे सरपंच अ‍ॅड. प्रदीप जगताप यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, आम्ही तहसीलदार मॅडम यांची भेट घेतली असता, त्यांनी सांगितले की, तुमचे गाव बॅकवॉटर पट्टयात आहे. तसेच दोन किलोमीटर हद्दीत विहीरी आहेत. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांना पाणी मिळणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. ............आम्ही येथील प्रस्ताव प्रांताधिकारी यांच्या कडे पाठविला आहे. लवकरच टँकर सुरू होईल.-सोनाली मेटकरी, तहसिलदार, इंदापूर.

टॅग्स :IndapurइंदापूरWaterपाणीdroughtदुष्काळ