शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

Ujani Dam: उजनीत मुबलक पाणीसाठा; धरणातील यंदाची पातळी मागील वर्षीच्या तुलनेत ७ टक्क्याने जास्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 17:47 IST

पंढरपुर, मंगळवेढा व सोलापुरसह आजुबाजुच्या गावाला पिण्यासाठी, शेतीसाठी व औद्योगिक वापरासाठी उपयोगात आणले जाते

इंदापूर : राज्यातील सर्वात मोठ्या व पूणे, सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी जिवनदायिनी ठरलेल्या उजणी धरणातील सध्याची पाणी पातळी मागील वर्षीच्या तुलनेत सात टक्क्याने जास्त आहे. सोलापूरला पिण्यासाठीच्या पाण्याचे एक आवर्तन मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण झाले आहे.

तरीही उजणी धरणात अजून ६६.९३ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पुढील दोन महीने सोलापुरात उष्णता कीतीही वाढली तरीही सोलापुरला पाण्याची कमतरता मात्र भासणार नसल्याची माहीती उजणी धरण पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता आर.पी. मोरे यांनी दिली.

 उजणी धरणाचे पाणी पंढरपुर, मंगळवेढा व सोलापुरसह आजुबाजुच्या गावाला पिण्यासाठी, शेतीसाठी व औद्योगिक वापरासाठी उपयोगात आणले जाते. या परिसरामध्ये जवळ जवळ तीस ते चाळीस साखर कारखाने हे उजणीच्या पाण्यावर अवलंबुन आहेत. सध्या उजणी धरणामध्ये ६६.९३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. धरणातील सध्याची पाणी पातळी ४९५.२३० मीटर इतकी आहे. धरणात एकुण ३५.८६ टीएमसी एवढा उपयक्त पाणी साठा आहे. सध्या उजणीतुन सिना-माढा बोगदा २२२ क्युसेक, दहीगाव एल- आयएस ८४ क्युसेक, बोगदा १०० क्युसेक, व मुख्य कॅनाल ३०० क्युसेक असा एकुण ७०६ क्युसेकने पाणी विसर्ग सुरू असुन चालु वर्षी पाण्याची कमतरता भासणार नाही.

पाण्याचा फायदा पुणे, सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यांना होणार 

उजणी धरणाची पाणी साठवण क्षमता ११७ टीएमसी इतकी आहे. चालू हंगामात उजणी धरण परिसर व भीमा खोर्‍यात पाऊस मोठ्या प्रमाणात पडल्याने उजणी धरण हे पुर्ण क्षमतेने भरले होते. तर धरण परिसरात अवकाळी पावसाचे प्रमाण यावर्षी जास्त झाल्याने उजणीच्या खालच्या भागातील शेतकर्‍यांना शेतीसाठी लागणार्‍या पाण्याची कमतरता फारच कमी भासली. त्यामळे यावर्षी चालु हंगामात उजणीतुन शेतीसाठी पाण्याच्या आवर्तनाची मागणी झाली नाही. परिणामी धरणात पाणीसाठा मुबलक शिल्लक राहिल्याने या पाण्याचा फायदा पूणे, सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांना व नागरिकांना जास्त होणार आहे.

टॅग्स :PuneपुणेDamधरणWaterपाणीFarmerशेतकरी