शहरं
Join us  
Trending Stories
1
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
2
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
3
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
4
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
5
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
6
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
7
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
8
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
9
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
10
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
11
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
12
ATM मधून पैसे काढताना तुम्हीही दोनदा Cancel बटन दाबता का? खरंच कामाची आहे का ही ट्रिक
13
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
14
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
15
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
16
'तो खोटं बोलला, हॉटेलमध्ये जाताच त्याने माझी...'; विधवा सासूने जावयावर केला खळबळजनक आरोप
17
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
18
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
19
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
20
Raja Raghuvanshi : कट, खून अन् पुरावे... मेघालय पोलिसांनी तब्बल ७९० पानांमध्ये नोंदवला सोनम रघुवंशी आणि राजचा गुन्हा!

महाराष्ट्रात 'आप' चा मोठा निर्णय; इंडिया आघाडीला ठोकला रामराम, मनपा निवडणूक स्वतंत्र लढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 17:23 IST

लोकसभा, विधानसभेला मदत करूनही आम्ही त्यांच्याकडे एकही जागा मागितली नाही, मात्र त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही

पुणे : लोकसभा व विधानसभा निवडणुकीत ‘इंडिया आघाडी’बरोबर राहिलेल्या आम आदमी पार्टी (आप) पक्षाने दिल्लीबरोबरचमहाराष्ट्रातही काँग्रेसचा हात सोडला आहे. काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीला ‘आप’ने रामराम ठोकला असून, राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे.

पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी अजित फाटके यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली. पुणे जिल्हा परिषद निवडणूक तसेच पंचायत समिती, गण व गट ही स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय पक्षाने आधीच जाहीर केला आहे. त्याचबरोबर राज्यातील सर्व महापालिका, नगरपरिषदा, नगर पंचायती व पुण्यासह अन्य जिल्हा परिषदांमध्येही पक्ष स्वतंत्रपणे आपले उमेदवार उभे करणार आहे. त्याप्रमाणे तयारी करण्याचे आदेश पक्षश्रेष्ठींनी पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाला तसेच राज्यातील पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.

लोकसभेची निवडणूक ‘आप’ने ‘इंडिया आघाडी’त सहभागी होऊन लढवली, मात्र लोकसभेसाठी राज्यात कुठेही उमेदवार दिला नव्हता. विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी काही मतदारसंघांची पक्षाकडे मागणी करून तिथून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. इंडिया आघाडीबरोबर तशी बोलणी करावीत, असेही पक्षाला कळवले होते. मात्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीतही इंडिया आघाडीला पाठिंबा जाहीर करून पक्षाच्या दिल्लीतील नेत्यांनी राज्यातील एकही जागा लढवायची नाही, असा निर्णय घेतला. त्यामुळे इच्छुक कार्यकर्ते नाराज झाले होते. तेव्हापासूनच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक स्वतंत्रपणे लढाव्यात, अशी मागणी होत होती. दरम्यानच्या काळात ‘आप’ व ‘काँग्रेस’ यांच्यातील राजकीय वातावरण बरेच बिघडले. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने आपच्या विरोधात उमेदवार उभे केले. त्यामुळेच ‘आप’च्या काही उमेदवारांचा पराभव झाला. सलग दोन वेळा दिल्लीतील मतदारांनी ‘आप’कडे दिल्लीची सत्ता दिली होती. यावेळी त्यांना भारतीय जनता पक्षाकडून दिल्लीत मात मिळाली. त्यामुळे काँग्रेसबरोबरचे राजकीय संबंध बिघडून त्याचा परिणाम ‘आप’ने ‘इंडिया आघाडी’ सोडण्यात झाला आहे. अजित फाटके यांनी सांगितले की, लोकसभा, विधानसभा निवडणुकीत सक्रिय मदत करूनही आम्ही त्यांच्याकडे एकही जागा मागितली नाही, मात्र त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.’’

मागील काही वर्षे ‘आप’चे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी राज्याच्या विविध भागांमध्ये समर्पण वृत्तीने काम करत आहेत. त्याशिवाय कामगार क्षेत्रातही आपने काही पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून चांगले संघटनात्मक काम केले आहे. विशेषत: महापालिका क्षेत्रामध्ये चांगले संघटन उभे राहिले आहे. त्याचा स्वतंत्रपणे लढण्याला निश्चितपणे उपयोग होणार आहे.- अजित फाटके, राज्य प्रभारी, आप

टॅग्स :PuneपुणेAam Admi partyआम आदमी पार्टीdelhiदिल्लीMaharashtraमहाराष्ट्रMuncipal Corporationनगर पालिकाArvind Kejriwalअरविंद केजरीवालElectionनिवडणूक 2024IndiaभारतMahavikas Aghadiमहाविकास आघाडी