शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

महाराष्ट्रात 'आप' चा मोठा निर्णय; इंडिया आघाडीला ठोकला रामराम, मनपा निवडणूक स्वतंत्र लढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 17:23 IST

लोकसभा, विधानसभेला मदत करूनही आम्ही त्यांच्याकडे एकही जागा मागितली नाही, मात्र त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही

पुणे : लोकसभा व विधानसभा निवडणुकीत ‘इंडिया आघाडी’बरोबर राहिलेल्या आम आदमी पार्टी (आप) पक्षाने दिल्लीबरोबरचमहाराष्ट्रातही काँग्रेसचा हात सोडला आहे. काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीला ‘आप’ने रामराम ठोकला असून, राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे.

पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी अजित फाटके यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली. पुणे जिल्हा परिषद निवडणूक तसेच पंचायत समिती, गण व गट ही स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय पक्षाने आधीच जाहीर केला आहे. त्याचबरोबर राज्यातील सर्व महापालिका, नगरपरिषदा, नगर पंचायती व पुण्यासह अन्य जिल्हा परिषदांमध्येही पक्ष स्वतंत्रपणे आपले उमेदवार उभे करणार आहे. त्याप्रमाणे तयारी करण्याचे आदेश पक्षश्रेष्ठींनी पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाला तसेच राज्यातील पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.

लोकसभेची निवडणूक ‘आप’ने ‘इंडिया आघाडी’त सहभागी होऊन लढवली, मात्र लोकसभेसाठी राज्यात कुठेही उमेदवार दिला नव्हता. विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी काही मतदारसंघांची पक्षाकडे मागणी करून तिथून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. इंडिया आघाडीबरोबर तशी बोलणी करावीत, असेही पक्षाला कळवले होते. मात्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीतही इंडिया आघाडीला पाठिंबा जाहीर करून पक्षाच्या दिल्लीतील नेत्यांनी राज्यातील एकही जागा लढवायची नाही, असा निर्णय घेतला. त्यामुळे इच्छुक कार्यकर्ते नाराज झाले होते. तेव्हापासूनच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक स्वतंत्रपणे लढाव्यात, अशी मागणी होत होती. दरम्यानच्या काळात ‘आप’ व ‘काँग्रेस’ यांच्यातील राजकीय वातावरण बरेच बिघडले. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने आपच्या विरोधात उमेदवार उभे केले. त्यामुळेच ‘आप’च्या काही उमेदवारांचा पराभव झाला. सलग दोन वेळा दिल्लीतील मतदारांनी ‘आप’कडे दिल्लीची सत्ता दिली होती. यावेळी त्यांना भारतीय जनता पक्षाकडून दिल्लीत मात मिळाली. त्यामुळे काँग्रेसबरोबरचे राजकीय संबंध बिघडून त्याचा परिणाम ‘आप’ने ‘इंडिया आघाडी’ सोडण्यात झाला आहे. अजित फाटके यांनी सांगितले की, लोकसभा, विधानसभा निवडणुकीत सक्रिय मदत करूनही आम्ही त्यांच्याकडे एकही जागा मागितली नाही, मात्र त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.’’

मागील काही वर्षे ‘आप’चे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी राज्याच्या विविध भागांमध्ये समर्पण वृत्तीने काम करत आहेत. त्याशिवाय कामगार क्षेत्रातही आपने काही पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून चांगले संघटनात्मक काम केले आहे. विशेषत: महापालिका क्षेत्रामध्ये चांगले संघटन उभे राहिले आहे. त्याचा स्वतंत्रपणे लढण्याला निश्चितपणे उपयोग होणार आहे.- अजित फाटके, राज्य प्रभारी, आप

टॅग्स :PuneपुणेAam Admi partyआम आदमी पार्टीdelhiदिल्लीMaharashtraमहाराष्ट्रMuncipal Corporationनगर पालिकाArvind Kejriwalअरविंद केजरीवालElectionनिवडणूक 2024IndiaभारतMahavikas Aghadiमहाविकास आघाडी