शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
3
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
4
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
5
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
6
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
7
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
8
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
9
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
10
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
11
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
12
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
13
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
14
छत्रपतींच्या किल्ल्यांकडे पाहण्याची नजर आता बदलेल?
15
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
16
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
17
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ
18
बाजाराची चाल कंपन्यांचे निकाल ठरवणार; विक्रीचा मारा सुरूच
19
तुमच्यामुळे झाला महाराष्ट्र टॉपर! नागरिकांची यूपीआयला पसंती
20
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर

खराब रस्त्यामुळे तरुणाने गमावला जीव; १५ किमीसाठी दीड तास, पालक संतप्त, राजगड तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 13:46 IST

तरुणाला अस्थमाचा त्रास होता, अचानक श्वसनाचा त्रास सुरू होऊ लागल्याने रुग्णालयात जाण्याचा निर्णय घेतला, मात्र खराब रस्त्याने सावकाश जावे लागत होते

वेल्हे : रस्त्याच्या दुरवस्थेमुळे १५ किमी अंतर पार करून रुग्णालयात जाण्यास उशीर झाल्याने, एका तरुणाला आपला जीव गमवावा लागल्याचा प्रकार राजगड तालुक्यात घडला आहे. केवळ खराब रस्त्यामुळे आपल्या मुलाला जीव गमवावा लागल्याने, त्या मुलाचे पालक संताप व्यक्त करत आहेत. संदेश संभाजी इंगुळकर (वय १८) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

संभाजी इंगुळकर हे मूळचे वेल्हे तालुक्यातील राहणारे. मात्र, ते कामानिमित्त पुण्यातील कात्रज भागामध्ये स्थायिक झाले. इंगुळकर यांना दोन मुले. त्यातला छोटा मुलगा संदेश इंगुळकर याला लहानपणापासून अस्थमाचा त्रास होता. वयाच्या पाचव्या वर्षी त्याच्यावर शस्त्रक्रिया केल्यामुळे तो त्रास थांबला होता. सर्वसामान्य मुलांप्रमाणे तोही जगत होता. मात्र, १० नोव्हेंबर रोजी शेतात काम करत असताना त्याला अचानक श्वसनाचा त्रास सुरू होऊ लागला. मात्र, त्याच्यावर उपचारासाठी गावात सुविधा उपलब्ध नव्हत्या, तर सोंडे सरपले येथील उपकेंद्र बंद असल्यामुळे घरातील व्यक्ती त्याला घेऊन उपचारासाठी गावापासून नसरापूरकडे जाण्यासाठी निघाले. मात्र, अंबवणेमार्गे अत्यंत खराब रस्ता असल्याने ते कोदवडीमार्गे नसरापूर दिशेने चालले असता, अत्यंत खराब रस्त्याने गाडी सावकाश चालवावी लागत होती. त्यातच गुंजवणी नदीवरील कोदवडी येथील अरुंद पुलावर भात काढण्यासाठी आलेला हार्वेस्टर त्या पुलावर अडकला. त्या ठिकाणी वीस ते पंचवीस मिनिटे वेळ गेला. तिथून पुढे करंजावणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र असून नसल्यासारखे आहे, कारण त्या ठिकाणी योग्य ते उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी असल्याने, त्या ठिकाणी न थांबता व संदेशचा त्रास वाढू लागल्याने त्यांच्या कुटुंबाने नसरापूरकडे जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, नसरापूरकडे जाणाऱ्या रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याने व नसरापूर गावात जाण्यासाठी बनेश्वर फाट्यापासून मोठी गर्दी असल्याने ट्रॅफिक जाम झाल्याने दवाखान्यापर्यंत जाण्यासाठी गावापासून दीड तास लागला. मात्र, जोपर्यंत त्या रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच संदेशचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.

प्रशासनाच्या हलगर्जीपणा

संदेशचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याबाबत संदेशचे वडील संभाजी इंगुळकर यांनी प्रशासनाच्या गलथान कारभारमुळे माझ्या मुलाचा मृत्यू झाला, असा संताप व्यक्त केला आहे. तालुक्यात प्राथमिक विकासाअभावी नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. आज जर जाण्यासाठी रस्ते नीट असते, तर माझ्या मुलावर वेळेत उपाचार झाले असते आणि त्याचा जीव वाचला असता. फक्त १५ किमीच्या प्रवासासाठी दीड तासाचा कालावधी लागला. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या हलगर्जीपणामुळेच माझा मुलगा आज माझ्यात नाही. आता तरी या रस्त्याचे वेळेत कामे मार्गी लावा, म्हणजे आणखी कुणाचा बळी जाणार नाही, अशी प्रतिक्रिया इंगुळकर व्यक्त करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्यDeathमृत्यूhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरSocialसामाजिक