शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत आज मोठी घसरण; १३ दिवसांत Gold ₹११,६२१ आणि Silver ₹३२,५०० नं झाली स्वस्त
4
“उडता भाला कशाला अंगावर घेता, आमचा प्रश्न निवडणूक आयोगाला, भाजपाला नाही”; मनसेची टीका
5
टॅक्स स्लॅबमध्ये मोठा बदल होणार? ५० लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर '३०% टॅक्स' नको; उद्योग संघटनेची मोठी मागणी
6
एका 'Kiss' नं रिक्षाचालकाला बनवलं सेलिब्रिटी; २ दिवस फाईव्ह स्टार हॉटेलला राहिला, त्यानंतर...
7
बांधकाम सुरू असलेला रेल्वे पुलावरून क्रेन कोसळली, वाहन चिरडली, दोघांचा जागीच मृत्यू
8
VIRAL : गालावर खळी, डोळ्यात धुंदी.. तरुणीने फारच मनावर घेतलं अन् पुढे काय केलं बघाच! व्हायरल होतोय व्हिडीओ
9
Groww IPO: डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
10
बॉलिंग मशीनने घेतला युवा क्रिकेटपटूचा बळी, सराव करताना चेंडू डोक्याला लागला आणि...
11
मोहम्मद अझरूद्दीन लवकरच घेणार मंत्रिपदाची शपथ; काँग्रेस त्याच्यावर इतकी 'मेहेरबान' का?
12
'इक्कीस'मध्ये अगस्त्य नंदासोबत झळकणारी अभिनेत्री कोण? अक्षय कुमारसोबत आहे कनेक्शन
13
हिरोशिमावर टाकलेल्या बॉम्बपेक्षा १०० पट पॉवरफूल; किती खतरनाक आहे रशियाचा पोसायडॉन? 
14
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
15
देवळात गेल्यावर तुम्ही योग्य पद्धतीने देवाचे दर्शन घेता का? १० महत्त्वाच्या गोष्टी पाळाच!
16
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
17
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
18
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
19
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
20
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर

खराब रस्त्यामुळे तरुणाने गमावला जीव; १५ किमीसाठी दीड तास, पालक संतप्त, राजगड तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 13:46 IST

तरुणाला अस्थमाचा त्रास होता, अचानक श्वसनाचा त्रास सुरू होऊ लागल्याने रुग्णालयात जाण्याचा निर्णय घेतला, मात्र खराब रस्त्याने सावकाश जावे लागत होते

वेल्हे : रस्त्याच्या दुरवस्थेमुळे १५ किमी अंतर पार करून रुग्णालयात जाण्यास उशीर झाल्याने, एका तरुणाला आपला जीव गमवावा लागल्याचा प्रकार राजगड तालुक्यात घडला आहे. केवळ खराब रस्त्यामुळे आपल्या मुलाला जीव गमवावा लागल्याने, त्या मुलाचे पालक संताप व्यक्त करत आहेत. संदेश संभाजी इंगुळकर (वय १८) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

संभाजी इंगुळकर हे मूळचे वेल्हे तालुक्यातील राहणारे. मात्र, ते कामानिमित्त पुण्यातील कात्रज भागामध्ये स्थायिक झाले. इंगुळकर यांना दोन मुले. त्यातला छोटा मुलगा संदेश इंगुळकर याला लहानपणापासून अस्थमाचा त्रास होता. वयाच्या पाचव्या वर्षी त्याच्यावर शस्त्रक्रिया केल्यामुळे तो त्रास थांबला होता. सर्वसामान्य मुलांप्रमाणे तोही जगत होता. मात्र, १० नोव्हेंबर रोजी शेतात काम करत असताना त्याला अचानक श्वसनाचा त्रास सुरू होऊ लागला. मात्र, त्याच्यावर उपचारासाठी गावात सुविधा उपलब्ध नव्हत्या, तर सोंडे सरपले येथील उपकेंद्र बंद असल्यामुळे घरातील व्यक्ती त्याला घेऊन उपचारासाठी गावापासून नसरापूरकडे जाण्यासाठी निघाले. मात्र, अंबवणेमार्गे अत्यंत खराब रस्ता असल्याने ते कोदवडीमार्गे नसरापूर दिशेने चालले असता, अत्यंत खराब रस्त्याने गाडी सावकाश चालवावी लागत होती. त्यातच गुंजवणी नदीवरील कोदवडी येथील अरुंद पुलावर भात काढण्यासाठी आलेला हार्वेस्टर त्या पुलावर अडकला. त्या ठिकाणी वीस ते पंचवीस मिनिटे वेळ गेला. तिथून पुढे करंजावणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र असून नसल्यासारखे आहे, कारण त्या ठिकाणी योग्य ते उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी असल्याने, त्या ठिकाणी न थांबता व संदेशचा त्रास वाढू लागल्याने त्यांच्या कुटुंबाने नसरापूरकडे जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, नसरापूरकडे जाणाऱ्या रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याने व नसरापूर गावात जाण्यासाठी बनेश्वर फाट्यापासून मोठी गर्दी असल्याने ट्रॅफिक जाम झाल्याने दवाखान्यापर्यंत जाण्यासाठी गावापासून दीड तास लागला. मात्र, जोपर्यंत त्या रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच संदेशचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.

प्रशासनाच्या हलगर्जीपणा

संदेशचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याबाबत संदेशचे वडील संभाजी इंगुळकर यांनी प्रशासनाच्या गलथान कारभारमुळे माझ्या मुलाचा मृत्यू झाला, असा संताप व्यक्त केला आहे. तालुक्यात प्राथमिक विकासाअभावी नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. आज जर जाण्यासाठी रस्ते नीट असते, तर माझ्या मुलावर वेळेत उपाचार झाले असते आणि त्याचा जीव वाचला असता. फक्त १५ किमीच्या प्रवासासाठी दीड तासाचा कालावधी लागला. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या हलगर्जीपणामुळेच माझा मुलगा आज माझ्यात नाही. आता तरी या रस्त्याचे वेळेत कामे मार्गी लावा, म्हणजे आणखी कुणाचा बळी जाणार नाही, अशी प्रतिक्रिया इंगुळकर व्यक्त करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्यDeathमृत्यूhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरSocialसामाजिक