शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
6
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
7
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
8
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
9
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
10
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
11
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
12
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
13
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
14
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
15
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
16
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
17
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
18
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
19
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
20
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा

सामान्यांना मोठा दिलासा! रहिवासी झोनमधील जमिनी नियमित करण्यासाठी आता केवळ ५ टक्के अधिमूल्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 15:14 IST

सरकारकडून २०१७ पासून हे अधिमूल्य २५ टक्के आकारले जात आहे, आता यात तब्बल २० टक्क्यांनी कपात करून ५ टक्के केले

पुणे: राज्य सरकारने तुकडेबंदी कायद्यात अंशत: सुधारणा करून पूर्वीच्या शेती झोनमध्ये असलेल्या व आता रहिवासी झोनमध्ये आलेल्या तुकड्यांतील जमिनींना नियमित करण्यासाठी अधिमूल्य दरांत कपात करून सामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारकडून २०१७ पासून हे अधिमूल्य २५ टक्के आकारले जात आहे. आता यात तब्बल २० टक्क्यांनी कपात करून ५ टक्के केले आहे. पुणे शहरालगतची गावे महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर या गावांमधील अशा तुकड्यांतील जमिनी नियमित करण्यासाठी याचा फायदा होणार आहे. त्यामुळे या जमीनमालकांना आता याची नोंद करणे तसेच विक्री करणे सुलभ होणार आहे.

राज्यात १५ नोव्हेंबर १९६५ पासून तुकडेबंदी कायदा अमलात आला. शेती झोनमधील तुकड्याने खरेदी केलेल्या जमिनींच्या गुंठ्यातील तुकड्यांची नोंद होत नव्हती. त्यानंतर २०१७ मध्ये जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबतच्या अधिनियमात सुधारणा करण्यात आली. अशा जमिनी रहिवासी झोनमध्ये आल्यानंतर रेडीरेकनर दराच्या २५ टक्के अधिमूल्य भरून त्या नियमित करता येत आहेत. मात्र, हे मूल्य अधिक असल्याने अनेक जमीनमालक नियमितीकरण करण्यास उत्सुक नसायचे. परिणामी त्याला थंड प्रतिसाद मिळाला. हे मूल्य कमी केल्यास अशा तुकड्यांचे भोगवटादार अर्थात मालक त्यांचा परवानगीयोग्य वापर सुरू करू शकतील आणि वापरात नसलेले असे असंख्य तुकडे पुन्हा उत्पादक वापरामध्ये आणता येऊ शकतील, त्यामुळे आर्थिक विकासामध्ये योगदान देता येईल, असा राज्य सरकारचा होरा होता.

रेडीरेकनर दराच्या १० टक्के कमीची शिफारस

ही बाब महसुलाशी संबंधित असल्याने कायद्याचा अभ्यास करण्यासाठी तसेच त्यामध्ये आवश्यकतेनुसार सुधारणा करण्याची शिफारस करण्यासाठी राज्य सरकारने उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. या समितीने हे नियमाधीनकरण अधिमूल्य जमिनीच्या बाजारमूल्याच्या अर्थात रेडीरेकनर दराच्या १० टक्के इतके कमी करण्याची शिफारस केली आहे. मात्र, या सुधारणेबाबतचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हे अधिमूल्य जमिनीच्या बाजारमूल्याच्या ५ टक्के करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

शहरालगत जमिनींच्या नियमितीकरणास मिळणार चालना

या निर्णयामुळे मोठ्या शहरांलगत असलेल्या गावांमधील रहिवासी झोनमधील जमिनींच्या नियमितीकरणाला मोठी चालना मिळणार आहे. पूर्वीच्या शेती झोनमधील व आता रहिवासी झोनमध्ये आलेल्या अशा जमिनींची नोंद करण्यासाठी केवळ ५ टक्के अधिमूल्य भरून त्यांचे नियमितीकरण करता येणार आहे. शहरांलगतच्या अशा जमिनींची नोंद झाल्यानंतर त्यांची विक्री करता येणार आहे. नियमितीकरण झाल्याने बँकाही कर्ज देऊ शकणार आहेत. यामुळे हजारो जमीनमालकांना दिलासा मिळाला आहे. राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नसल्याने राज्यपालांना तत्काळ कार्यवाही करणे आवश्यक व्हावे यासाठी या सुधारणा अधिनियमाचा अध्यादेश जारी करण्यात आला आहे.

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीGovernmentसरकारMONEYपैसाSocialसामाजिकMaharashtraमहाराष्ट्र