शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांनी 'पांघरूण खातं' सुरु करावं आणि त्याचं मंत्री व्हावं- उद्धव ठाकरे
2
अमित शाह यांनी '102 डिग्री' ताप असतानाही संसदेत 'मत चोरी'वर दिलं उत्तर, सभागृह सोडून गेले राहुल गांधी
3
“प्राचीन मंदिर पाडून RSSचे कार्यालय”; उद्धव ठाकरेंची अमित शाहांवर टीका, ‘तो’ फोटोही दाखवला
4
अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला बसणार, सशक्त लोकायुक्तावरून राज्य सरकारला दिला असा इशारा...  
5
"बिबट्यांना पाळीव प्राण्यांचा दर्जा द्या", आमदार रवी राणा यांची अजब मागणी 
6
उंदीर मारण्याचं औषध, सल्फास, तुटलेला मोबाईल...; नवरदेवाचा संशयास्पद मृत्यू, आज होतं लग्न
7
टाटा-महिंद्रासह 'या' शेअर्समध्ये जोरदार तेजी! सलग ३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; फक्त एका क्षेत्रात तोटा
8
लेकीचं भविष्य 'सेफ' करण्यासाठी करा 'या' ६ ठिकाणी गुंतवणूक! मिळवा सर्वाधिक परतावा आणि टॅक्समध्ये सूट
9
फ्रान्समध्ये अचानक वीज झाली 'मोफत', सरकारकडून नागरिकांना 'शून्य दरात' पुरवठा
10
पंतप्रधान मोदींचे उत्तराधिकारी देवेंद्र फडणवीस होणार?; CM म्हणाले, “बाप जिवंत असताना...”
11
इंडिगोचा मोठा निर्णय! त्रस्त प्रवाशांना नुकसानभरपाई; मिळणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर
12
Electric Geyser Safety Tips: तुम्ही Geyser वापरता? मग 'या' ३ गोष्टींची काळजी घ्या, अपघात टळेल!
13
Tanya Mittal : "कृपया, माझे पैसे द्या...", तान्या मित्तलने ८०० साड्यांचं पेमेंट बुडवलं? स्टायलिस्टचा गंभीर आरोप
14
TATA च्या 'या' शेअरची बिकट स्थिती; ५०% पेक्षा जास्त घसरला, नव्या नीचांकी स्तरावर पोहोचला शेअर
15
पाकिस्तानी इतिहासात पहिल्यांदाच ISI प्रमुखाला शिक्षा! इम्रान खानशी संबंध भोवले, जनरल फैज हमीद १४ वर्षे तुरुंगवास
16
'अमित शाह घाबरले, त्यांचे हातही थरथरत होते...', राहुल गांधींचा गृहमंत्र्यांवर निशाणा
17
डेट फंड्सकडे गुंतवणूकदारांची पाठ! महिन्यात २५,६९२ कोटी काढले, 'या' योजनेला सर्वाधिक पसंती
18
करण जोहरची 'धुरंधर'वर प्रतिक्रिया, रणवीर सिंह अन् दिग्दर्शक आदित्य धरबद्दल म्हणाला...
19
Arunachal Pradesh Accident: अरुणाचल प्रदेशात मजुरांना घेऊन जाणारा ट्रक खोल दरीत कोसळला, १७ जणांचा मृत्यू झाल्याची भीती
20
IPO पूर्वी झुनझुनवाला कुटुंबानं 'या' कंपनीत केली ₹१०० कोटींची गुंतवणूक, अन्य २५ दिग्गजांनीचीही इनव्हेस्टमेंट
Daily Top 2Weekly Top 5

सामान्यांना मोठा दिलासा! रहिवासी झोनमधील जमिनी नियमित करण्यासाठी आता केवळ ५ टक्के अधिमूल्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 15:14 IST

सरकारकडून २०१७ पासून हे अधिमूल्य २५ टक्के आकारले जात आहे, आता यात तब्बल २० टक्क्यांनी कपात करून ५ टक्के केले

पुणे: राज्य सरकारने तुकडेबंदी कायद्यात अंशत: सुधारणा करून पूर्वीच्या शेती झोनमध्ये असलेल्या व आता रहिवासी झोनमध्ये आलेल्या तुकड्यांतील जमिनींना नियमित करण्यासाठी अधिमूल्य दरांत कपात करून सामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारकडून २०१७ पासून हे अधिमूल्य २५ टक्के आकारले जात आहे. आता यात तब्बल २० टक्क्यांनी कपात करून ५ टक्के केले आहे. पुणे शहरालगतची गावे महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर या गावांमधील अशा तुकड्यांतील जमिनी नियमित करण्यासाठी याचा फायदा होणार आहे. त्यामुळे या जमीनमालकांना आता याची नोंद करणे तसेच विक्री करणे सुलभ होणार आहे.

राज्यात १५ नोव्हेंबर १९६५ पासून तुकडेबंदी कायदा अमलात आला. शेती झोनमधील तुकड्याने खरेदी केलेल्या जमिनींच्या गुंठ्यातील तुकड्यांची नोंद होत नव्हती. त्यानंतर २०१७ मध्ये जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबतच्या अधिनियमात सुधारणा करण्यात आली. अशा जमिनी रहिवासी झोनमध्ये आल्यानंतर रेडीरेकनर दराच्या २५ टक्के अधिमूल्य भरून त्या नियमित करता येत आहेत. मात्र, हे मूल्य अधिक असल्याने अनेक जमीनमालक नियमितीकरण करण्यास उत्सुक नसायचे. परिणामी त्याला थंड प्रतिसाद मिळाला. हे मूल्य कमी केल्यास अशा तुकड्यांचे भोगवटादार अर्थात मालक त्यांचा परवानगीयोग्य वापर सुरू करू शकतील आणि वापरात नसलेले असे असंख्य तुकडे पुन्हा उत्पादक वापरामध्ये आणता येऊ शकतील, त्यामुळे आर्थिक विकासामध्ये योगदान देता येईल, असा राज्य सरकारचा होरा होता.

रेडीरेकनर दराच्या १० टक्के कमीची शिफारस

ही बाब महसुलाशी संबंधित असल्याने कायद्याचा अभ्यास करण्यासाठी तसेच त्यामध्ये आवश्यकतेनुसार सुधारणा करण्याची शिफारस करण्यासाठी राज्य सरकारने उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. या समितीने हे नियमाधीनकरण अधिमूल्य जमिनीच्या बाजारमूल्याच्या अर्थात रेडीरेकनर दराच्या १० टक्के इतके कमी करण्याची शिफारस केली आहे. मात्र, या सुधारणेबाबतचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हे अधिमूल्य जमिनीच्या बाजारमूल्याच्या ५ टक्के करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

शहरालगत जमिनींच्या नियमितीकरणास मिळणार चालना

या निर्णयामुळे मोठ्या शहरांलगत असलेल्या गावांमधील रहिवासी झोनमधील जमिनींच्या नियमितीकरणाला मोठी चालना मिळणार आहे. पूर्वीच्या शेती झोनमधील व आता रहिवासी झोनमध्ये आलेल्या अशा जमिनींची नोंद करण्यासाठी केवळ ५ टक्के अधिमूल्य भरून त्यांचे नियमितीकरण करता येणार आहे. शहरांलगतच्या अशा जमिनींची नोंद झाल्यानंतर त्यांची विक्री करता येणार आहे. नियमितीकरण झाल्याने बँकाही कर्ज देऊ शकणार आहेत. यामुळे हजारो जमीनमालकांना दिलासा मिळाला आहे. राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नसल्याने राज्यपालांना तत्काळ कार्यवाही करणे आवश्यक व्हावे यासाठी या सुधारणा अधिनियमाचा अध्यादेश जारी करण्यात आला आहे.

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीGovernmentसरकारMONEYपैसाSocialसामाजिकMaharashtraमहाराष्ट्र