शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

भामा-आसखेडमध्ये ८३ टक्के पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2018 01:01 IST

भामा-आसखेड धरणामध्ये सध्या ८३.१९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. धरणाची साठवण क्षमता ८.१४ टीएमसी असून, धरण १०० टक्के भरले होते.

आसखेड  - भामा-आसखेड धरणामध्ये सध्या ८३.१९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. धरणाची साठवण क्षमता ८.१४ टीएमसी असून, धरण १०० टक्के भरले होते. पाण्याची पातळी ६६९.०२ मीटर असून, एकूण पाणीसाठा १९४.१४९ दशलक्ष घनमीटर व उपयुक्त पाणीसाठा १८०.६२७ दलघमी आहे. नुकतेच धरणामधून पाणी सोडण्यात आले होते. आलेगाव पागापर्यंत पाणी पोहोचल्यावर गुरुवारी रात्री विसर्ग बंद करण्यात आल्याची माहिती शाखा अभियंता भारत बेंद्रे यांनी दिली.अनेक वर्षांपासून पुनर्वसन व काही प्रश्नांकडे जबाबदरीने लक्ष न देता आणि तातडीने निर्णय न घेतल्याने बाधित शेतकऱ्यांनी पाणी सोडण्यास विरोध केला. त्यामुळे उशिराने दि. २७ आॅक्टोबर रोजी सकाळी १०.२० वाजता १,१०० क्युसेक्सने, तर १२.२० वाजता १,६५३ क्युसेक्सने पोलीस बंदोबस्तात भामा-आसखेड धरणातून पाणी सोडण्यात आले होते. पाणी सोडण्यात आले, त्या वेळी १०० टक्के पाणीसाठा शिल्लक होता. तर, गतवर्षी झालेल्या सुमारे १,२९२ मिलिमीटर पावसामुळे (उशिरापर्यंत पडलेल्या) विहिरी-नाले समाधानकारक भरलेले होते. परंतु, यंदा फक्त ७७५ मिलिमीटरच पाऊस झाला आहे. त्यामुळे समोर येऊन ठेपलेल्या दुष्काळामुळे पाण्याचे नियोजन हा धरण प्रशासनापुढील गंभीर प्रश्न आहे. रब्बी हंगामातील पहिले आवर्तन २० आॅक्टोबर रोजी सोडणे अपेक्षित होते; परंतु धरणग्रस्तांच्या कित्येक वर्षांच्या प्रलंबित प्रश्नांमुळे त्यांनी केलेल्या विरोधामुळे ६ दिवस पाणी सोडण्यास उशिर झाला.परंतु, पाणी जरी उशिरा सोडले तरी खेड, शिरूर, दौंडला त्याचा मोठा फायदा होणार आहे.खेड, दौंड, शिरूरला फायदा : नदीकाठच्या गावांची भागली तहानखेड तालुक्यासह शिरूर व दौंड या तालुक्यांतील नदीकाठच्या गावांना आणि शेतीसह विविध गावांच्या पाणी योजनांना पाणी मिळाले. तर, त्याबरोबर नदीवरील कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे पूर्णपणे भरले आहेत. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे या पाण्याचा फायदा खेडसह शिरूर व दौंड या तालुक्यांना होणार आहे. त्यामुळे हे धरण तिन्ही तालुक्यांतील शेतकरी व नागरिकांना कायमच वरदान ठरले आहे. तर, नदीकाठ जवळपासच्या गावांची तहान भागली आहे.

टॅग्स :DamधरणPuneपुणे