शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

भामा-आसखेडमध्ये ८३ टक्के पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2018 01:01 IST

भामा-आसखेड धरणामध्ये सध्या ८३.१९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. धरणाची साठवण क्षमता ८.१४ टीएमसी असून, धरण १०० टक्के भरले होते.

आसखेड  - भामा-आसखेड धरणामध्ये सध्या ८३.१९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. धरणाची साठवण क्षमता ८.१४ टीएमसी असून, धरण १०० टक्के भरले होते. पाण्याची पातळी ६६९.०२ मीटर असून, एकूण पाणीसाठा १९४.१४९ दशलक्ष घनमीटर व उपयुक्त पाणीसाठा १८०.६२७ दलघमी आहे. नुकतेच धरणामधून पाणी सोडण्यात आले होते. आलेगाव पागापर्यंत पाणी पोहोचल्यावर गुरुवारी रात्री विसर्ग बंद करण्यात आल्याची माहिती शाखा अभियंता भारत बेंद्रे यांनी दिली.अनेक वर्षांपासून पुनर्वसन व काही प्रश्नांकडे जबाबदरीने लक्ष न देता आणि तातडीने निर्णय न घेतल्याने बाधित शेतकऱ्यांनी पाणी सोडण्यास विरोध केला. त्यामुळे उशिराने दि. २७ आॅक्टोबर रोजी सकाळी १०.२० वाजता १,१०० क्युसेक्सने, तर १२.२० वाजता १,६५३ क्युसेक्सने पोलीस बंदोबस्तात भामा-आसखेड धरणातून पाणी सोडण्यात आले होते. पाणी सोडण्यात आले, त्या वेळी १०० टक्के पाणीसाठा शिल्लक होता. तर, गतवर्षी झालेल्या सुमारे १,२९२ मिलिमीटर पावसामुळे (उशिरापर्यंत पडलेल्या) विहिरी-नाले समाधानकारक भरलेले होते. परंतु, यंदा फक्त ७७५ मिलिमीटरच पाऊस झाला आहे. त्यामुळे समोर येऊन ठेपलेल्या दुष्काळामुळे पाण्याचे नियोजन हा धरण प्रशासनापुढील गंभीर प्रश्न आहे. रब्बी हंगामातील पहिले आवर्तन २० आॅक्टोबर रोजी सोडणे अपेक्षित होते; परंतु धरणग्रस्तांच्या कित्येक वर्षांच्या प्रलंबित प्रश्नांमुळे त्यांनी केलेल्या विरोधामुळे ६ दिवस पाणी सोडण्यास उशिर झाला.परंतु, पाणी जरी उशिरा सोडले तरी खेड, शिरूर, दौंडला त्याचा मोठा फायदा होणार आहे.खेड, दौंड, शिरूरला फायदा : नदीकाठच्या गावांची भागली तहानखेड तालुक्यासह शिरूर व दौंड या तालुक्यांतील नदीकाठच्या गावांना आणि शेतीसह विविध गावांच्या पाणी योजनांना पाणी मिळाले. तर, त्याबरोबर नदीवरील कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे पूर्णपणे भरले आहेत. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे या पाण्याचा फायदा खेडसह शिरूर व दौंड या तालुक्यांना होणार आहे. त्यामुळे हे धरण तिन्ही तालुक्यांतील शेतकरी व नागरिकांना कायमच वरदान ठरले आहे. तर, नदीकाठ जवळपासच्या गावांची तहान भागली आहे.

टॅग्स :DamधरणPuneपुणे