शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
2
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
6
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
7
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
8
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
9
स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर प्राणघातक हल्ला, रुग्णालयात दाखल 
10
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
11
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
12
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
13
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
14
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
15
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
16
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
17
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
18
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

शासनाने थकविला आयआयईचा ८ कोटींचा निधी : डॉ. भालचंद्र मुणगेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 7:56 PM

शिक्षणापासून वंचित, शोषित, बालकामगार, स्थलांतरीत, प्रौढ, अल्पसंख्यांक, दिव्यांग यांच्या तसेच ग्रामीण व आदिवासी भागातील शिक्षणाच्या समस्यांवर आयआयई ही संस्था कार्यरत आहे.

ठळक मुद्देदरवर्षी आयसर संस्थेकडून ४५ टक्के व राज्य शासनाकडून ४५ टक्के असे ९० टक्के अनुदान ८ वर्षांपासून अनुदानच मिळालेले नाही, त्यांच्याकडे ६ कोटी ९० लाख रूपयांची रक्कम थकितसंस्थेच्या विश्वस्त मंडळाबाबत तक्रार करण्यात आल्याने आयसर संस्थेने अनुदान बंद

पुणे : शिक्षणाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या इंडियन इन्स्टिटयूट आॅफ एज्युकेशन (आयआयई) संस्थेला गेल्या ८ वर्षांपासून राज्यशासनाने तसेच आयसर संस्थेकडून एक वर्षांपासून निधी मिळालेला नाही. राज्य सरकारकडे ६ कोटी ९० लाख तर आयसरकडे १ कोटी २० अशी एकूण ८ कोटी १० लाख रूपयांची रक्कम थकित आहे. त्यामुळे संस्था अडचणीत आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी दिली.शिक्षणतज्ज्ञ डॉ. जे. पी. नाईक व डॉ. चित्रा नाईक यांनी आयआयईची स्थापना करून त्याचे नेतृत्व केले. सामाजिक विज्ञान शाखांमध्ये आंतरशाखीय संशोधन करणारी आयआयई ही महत्त्वाची संस्था आहे. त्याचबरोबर शिक्षणापासून वंचित, शोषित, बालकामगार, स्थलांतरीत, प्रौढ, अल्पसंख्यांक, दिव्यांग यांच्या तसेच ग्रामीण व आदिवासी भागातील शिक्षणाच्या समस्यांवर ही संस्था कार्यरत आहे. मात्र राज्य शासनाकडून केल्या जात असलेल्या दुर्लक्षामुळे आयआयई संस्था अडचणीत सापडली आहे. मुणगेकर म्हणाले, आयसर संस्थेकडून ४५ टक्के व राज्य शासनाकडून ४५ टक्के असे ९० टक्के अनुदान दरवर्षी संस्थेला मिळत असे. उर्वरित १० टक्के खर्च संस्थेकडून केला जातो. राज्य शासनाकडून गेल्या ८ वर्षांपासून अनुदानच मिळालेले नाही, त्यांच्याकडे ६ कोटी ९० लाख रूपयांची रक्कम थकली आहे. त्याचबरोबर संस्थेच्या विश्वस्त मंडळाबाबत तक्रार करण्यात आल्याने आयसर संस्थेने अनुदान बंद केले. दोन्ही अनुदान बंद झाल्याने संस्था अडचणीत आली आहे. सध्या कार्यरत असलेले विश्वस्त मंडळ अधिकृत असल्याचा निर्णय धर्मादाय आयुक्त कार्यालयाने दिला आहे. त्यामुळे आयसर व राज्य शासनाकडून अनुदान मिळण्यास आता कोणतीही अडचण नाही.  आयआयईच्या १० पैकी ५ विश्वस्तांनी मागील वर्षी अचानक राजीनामे दिले. त्यामुळे संस्थेच्या विश्वस्त मंडळामध्ये केवळ ५ सदस्य उरले. संस्थेच्या घटनेनुसार कारभार पाहण्यासाठी किमान ७ विश्वस्तांचे मंडळ अस्तित्त्वात असणे बंधनकारक होते. त्यानंतर ५ विश्वस्तांनी मिळून नवीन ५ विश्वस्तांची नियुक्ती केली. त्याला धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून मंजूरी देण्यात आली आहे. त्यामुळे संस्थेचे काम पूर्वपदावर येत आहे असे मुणगेकर यांनी सांगितले. संस्थेच्या विश्वस्त तसेच पदाधिकाऱ्यांनी संस्थेच्या कारभारात सुधारणा करायची असते. मात्र, त्यांनीच संस्थेचा कारभार योग्य नसल्याचे सांगत राजीनामे दिले, ही कृती अत्यंत चुकीची होती. त्यामुळे त्याचा फटका आयआयईला सहन करावा लागत आहे. 

टॅग्स :PuneपुणेBhalchandra Mungekarभालचंद्र मुणगेकरState Governmentराज्य सरकारfundsनिधी