शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

नीरा खोऱ्यातील धरणांत ७६ टक्के पाणीसाठा; गतवर्षापेक्षा पाणीसाठा सरासरी १४ टक्क्यांनी अधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 18:39 IST

या पाण्याचा उपयोग रब्बी व उन्हाळी हंगामाच्या पिकांना फायदेशीर होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

भरत निगडे

नीरा : नीरा-देवघर, भाटघर, वीर, गुंजवणी धरण परिसरात यावर्षी सरासरी इतका पाऊस पडला. या हंगामात धरणाच्या लाभक्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने व परतीचा पावसानेही दमदार हजेरी लावल्याने धरणे ओसंडून वाहत होती. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात नीरा खोऱ्यातील चार धरणांत गतवर्षापेक्षा सरासरी १४ टक्क्यांपेक्षा पाणीसाठा अधिकचा असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे.

४८ हजार ३२९ दशलक्ष घनफूट क्षमता असलेल्या नीरा खोऱ्यातील चारही धरणात एकूण ३६ हजार ९०१ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा म्हणजेच ७६.३५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षी ३० हजार ४०६ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा अर्थात ६२.९१ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. त्यामुळे यावर्षी मे महिन्यापर्यंत दोन्ही कालव्यातून नियमित विसर्ग सोडण्यात येईल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.

यावर्षी नीरा खोऱ्यातील या चार धरणात आज, बुधवारी (दि. २२) ७६.३५ टक्के पाणीसाठा आहे. या पाण्याचा उपयोग रब्बी व उन्हाळी हंगामाच्या पिकांना फायदेशीर होणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे यावर्षी नीरा डावा व उजवा कालव्यावर अवलंबून असणाऱ्या पिकांना उन्हाळी आवर्तन नियमित मिळणार असल्याची माहिती समजते.

बुधवारी (दि. २२) नीरा खोऱ्यातील नीरा - देवघर धरणात ९,०५२ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा म्हणजेच ७७.१८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षी ६,६६२ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा अर्थात ५६.८० टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. भाटघर धरणामध्ये १९,६५३ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा म्हणजेच ८३.६२ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षी १५,४१३ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा अर्थात ६५.५८ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. वीर धरणामध्ये ४,९९८ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा आहे. म्हणजेच ५३.१३ टक्के पाणी साठा उपलब्ध आहे.गतवर्षी ५,२७४ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा अर्थात ५६.०६ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. गुंजवणी धरणामध्ये ३,१९८ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा अर्थात ८६.६७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षी ३,०५७ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा अर्थात ८२.८५ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. त्यामुळे नीरा खोऱ्यातील धरणांमधील पाणीसाठ्याची स्थिती गतवर्षापेक्षा आकडेवारीवरून समाधानकारक असल्याचे समोर येत आहे.

तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ विसर्ग

२०२३ च्या पावसाळी हंगामात नीरा खोऱ्यात सरासरीपेक्षा २० टक्के पाऊस कमी झाला होता. त्यामुळे धरणे शंभर टक्के भरलीच नव्हती. परिणामी धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला नव्हता. आता या वर्षी २०२३ च्या पावसाळी हंगामात सरासरी इतका तर परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली होती. सर्व धरणांतून तीन आठवड्यापेक्षा जास्त काळ विसर्ग सुरू होता. ४८ टीएमसी क्षमतेच्या नीरा खोऱ्यातील चार धरणातून तब्बल ६० टीएमसी पाणी सोडण्यात आले होते.

रब्बी हंगामासाठी दुसरे आवर्तन सुरू

नीरा खोऱ्यातील पाणीसाठ्यावर पुणे जिल्ह्यातील पुरंदर, बारामती, इंदापूर, सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण, तर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरससह इतर भागातील शेतकरऱ्यांना वरदान असलेल्या वीर धरणावरील दोन्ही कालव्यांतून रब्बी हंगामासाठी दुसरे आवर्तन सुरू झाले आहे. बुधवारी नीरा उजव्या कालव्यातून १,२९९ क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. नीरा डाव्या कालव्यातून ८२७ क्यूसेकने विसर्ग सुरू आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWaterपाणीAgriculture Schemeकृषी योजनाAgriculture Sectorशेती क्षेत्र