शहरं
Join us  
Trending Stories
1
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; उपराज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
2
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
3
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
4
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
5
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
6
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
7
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
8
मुंबई इंडियन्सच्या संघात अंशुल कंबोजची एन्ट्री! टॉस जिंकून २३ वर्षीय ऑल राऊंडरला दिली संधी, जाणून घ्या कोण आहे तो
9
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
10
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
11
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
12
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
13
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
14
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
15
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
16
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
17
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
18
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
19
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
20
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"

'मोदी सरकारने ७ वर्षात महागाई वाढवण्याबरोबरच जनसामान्यांची फसवणूकही केली', काँग्रेसचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 5:41 PM

महाराष्ट्र काँग्रेस कमिटी आयोजित महागाईच्या विरोधात जनजागरण यात्रा ही पुणे जिल्ह्यामध्ये सध्या सुरू आहे

बारामती : कोरोना काळामध्ये महाविकासआघाडी सरकारने चांगले काम केले. मात्र मोदी सरकारने आपल्या लोकांचे लसीकरण पूर्ण होण्याआधी जगाची वाहवा मिळवण्यासाठी आमच्या हक्काच्या लसी दुसऱ्या देशांना दिल्या. थांबवण्याचे काम राहुल गांधी यांनी केले. नाहीतर कोणाचेच लसीकरण झाले नसते. जनसामान्यांसाठी काम करण्याची वृत्ती कोणाची आहे हे आता लोकांनी समजून घेतले पाहिजे. सात वर्षांमध्ये भाव वाढ तर झालीच मात्र फसवणूक केली असल्याचा आरोप इंदापूरातून काँग्रेसने केला आहे. 

महाराष्ट्र काँग्रेस कमिटी आयोजित महागाईच्या विरोधात जनजागरण यात्रा ही पुणे जिल्ह्यामध्ये सध्या सुरू आहे. शुक्रवारी इंदापूर येथील संविधान चौकापासून जनजागरण यात्रा सुरू झाली. त्यानंतर इंदापूर शहरांमधून ही यात्रा मुख्य बाजारपेठेत जाऊन पुढे नगरपालिकेच्या प्रांगणात स्थिरावली. यावेळी झालेल्या सभेत काँग्रेस पक्षाच्या पुणे जिल्ह्या सहप्रभारी उत्कर्षा रूपवते बोलत होत्या.

रूपवते म्हणाल्या, काँग्रेस पक्ष हा नेहमीच जनसामान्यांच्या बाजूने उभा राहणारा पक्ष आहे. काँग्रेसने अनेक योजना राबवल्या. निराधार महिलांसाठी संजय गांधी निराधार योजना राबवली,  ही योजना आज अद्यापि सुरू आहे. गरजू व्यक्तींसाठी रेशन द्वारे भरडधान्य योजना काँग्रेस पक्षाने सुरू केल्या. मात्र देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात ही योजना बंद झाली. ही योजना पुन्हा सुरू करण्याची खटपट महाविकास आघाडी सरकार करत आहे. उज्वला फक्त नावाला उज्वला आहे. त्याखाली सर्व अंधार आहे. ना शेतमालाला भाव, ना कोणत्या सोयी सुविधा पद्धतीचा गलथान कारभार सध्या सुरू आहे. त्याच्या विरोधात जनजागरण झालं पाहिजे,  म्हणून काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आज गावोगावी फिरत आहे. 

पंतप्रधान मोदी यांना इंदापूरच्या चौकात बोलवायचे का? 

पंतप्रधान मोदी म्हणाले होते, 'अच्छे दिन आयेंगे मोदीजी को लायेंगे' पंधरा लाख रुपयांचे आमिष दिलं. उलट नोटबंदी करून आमच्या घरातील गरजेसाठी ठेवलेले पैसे काढून बँकेत भरायला लावले. सामान्य नागरिक नोटा बदलण्यासाठी बँकेच्या समोर उभी राहिली. त्यामध्ये अनेकांचा बळी गेला, याचा हिशोब कोण देणार? पंतप्रधान मोदी म्हणाले होते, मला पन्नास दिवस द्या मी सर्व व्यवस्थित करतो, नाही तर कोणत्याही चौकात मला जाळून टाका. हे मोदींचे शब्द आहेत. त्यामुळे आता इंदापूरच्या चौकात मोदींना बोलवायचं का? असाही सवाल यावेळी रूपवते यांनी उपस्थित केला.

टॅग्स :BaramatiबारामतीNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीNarendra Modiनरेंद्र मोदी