शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

आमदारांच्या गावातच विनापरवाना सहावी, सातवीचे वर्ग; वर्ग बंद करण्याचे झेडपीचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 13:49 IST

वर्ग सुरू राहिल्यास शिरूरचे गटशिक्षणाधिकारी व शाळेचे मुख्याध्यापक हे जबाबदार असे या आदेशात म्हटले

पुणे : शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या वडगाव रासाई गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत विनापरवाना गेल्या दोन वर्षांपासून सहावी आणि सातवीचे वर्ग सुरू असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेला वारंवार तक्रार करूनही याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. अखेर मंगळवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी हे दोन्ही वर्ग बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच हे वर्ग सुरू राहिल्यास शिरूरचे गटशिक्षणाधिकारी व शाळेचे मुख्याध्यापक हे जबाबदार असतील, असेही या आदेशात म्हटले आहे.

वडगाव रासाई (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत गेल्या दोन वर्षांपासून विनापरवाना सहावी आणि सातवीचे वर्ग सुरू होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर समोर आले आहे. वडगाव रासाई येथे असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या बाजूला स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे छत्रपती विद्यालय आहे. त्या ठिकाणी ५ वी ते १० वीपर्यंतचे वर्ग भरत आहेत. मात्र, तरीही जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये दोन वर्ग भरविण्यात आले. झेडपीच्या सहावीच्या वर्गात ३०, तर सातवीच्या वर्गात २१ मुले शिकत आहेत. या विद्यार्थ्यांची संगणक प्रणालीमध्ये कुठेही नोंद आढळून येत नाही.

यासंदर्भात माजी अध्यक्ष प्रदीप कंद, वडगाव रासाईचे सरपंच सचिन शेलार यांच्यासह काही स्थानिक ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेतली. त्यांच्यासमोर हा प्रकार उघडकीस आणला. इतकेच नाही, तर शाळेत मुबलक शिक्षक उपलब्ध नाही, विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे, गावात इतर संस्थेची शाळा उपलब्ध असूनही विनापरवाना वर्ग सुरू ठेवण्याचा अट्टाहास कशासाठी असे प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आले. त्यानंतर या शाळेची पाहणी केल्यानंतर विनापरवाना सहावी आणि सातवीचे वर्ग सुरू असल्याचे समोर आल्याने हे दोन्ही वर्ग बंद करण्याचे आदेश जिल्हा परिषदेने दिले आहेत. तसेच या वर्गांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे नजीकच्या शाळेत समायोजन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

मुख्याध्यापकच जबाबदार

जिल्हा परिषदेच्या शाळेत पाचवी ते सातवीचे वर्ग सुरू करण्यासाठी पटसंख्या आणि अंतराचे निकष आहेत. त्यानुसार वडगाव रासाई शाळेला नियमानुसार पाचवीचे वर्ग सुरू करण्यास काही अटी व शर्तीवर परवानगी २०२१ मध्ये दिली आहे. त्यानंतर विनापरवाना सहावी आणि सातवीचे वर्ग सुरू असल्याचे समोर येताच हे दोन्ही वर्ग बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्याध्यापकांकडे खुलासा मागविण्यात आला असून, याला मुख्याध्यापकच जबाबदार आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान न होण्यासाठी या विद्यार्थ्यांचे नजीकच्या शाळेत समायोजन करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांनी सांगितले.

''आमदार अशोक पवार आणि माजी जिल्हा परिषद सदस्या सुजाता पवार यांनी राजकीय दबाव वापरून चुकीच्या पद्धतीने विनापरवाना वर्ग सुरू करण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने आम्ही सातत्याने याला विरोध केला. परंतु वर्ग सुरूच ठेवले. अखेर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या माध्यमातून ही बाब अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर हे दोन्ही वर्ग विनापरवाना सुरू असल्याचे समोर आल्याने ते बंद करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. - सचिन शेलार सरपंच, वडगाव रासाई.'' 

टॅग्स :PuneपुणेSchoolशाळाEducationशिक्षणStudentविद्यार्थीMLAआमदार