शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
6
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
7
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
8
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
9
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
10
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
11
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
12
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
13
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
14
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
15
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
16
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
17
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
18
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

आयटीतील ६८ हजार कर्मचाऱ्यांना भरली धडकी; कर्मचारी, पगारकपातीची टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 4:05 AM

शासनाने कर्मचाºयांची कपात न करण्याचे आदेश दिले असताना देखील त्यांना विविध कारणे दाखवून घरी जाण्यास सांगितले जात आहे.

पुणे : आयटी कंपन्यांची मनमानी सुरूच असून, त्याचा फटका कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. आतापर्यंत ६८ हजार आयटी कर्मचाºयांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांना कामावरून कमी करणे तसेच पगारकपातीच्या नोटीस पाठवल्या आहेत. यासंबंधी कामगार आयुक्तांकडे दाद मागितली आहे. शासनाने कर्मचाºयांची कपात न करण्याचे आदेश दिले असताना देखील त्यांना विविध कारणे दाखवून घरी जाण्यास सांगितले जात आहे. यामुळे त्यांच्यात भीतीचे वातावरण आहे.

आयटी, आयटीईएस, बीपीओ, केपीओ आणि त्याच्या संबंधित क्षेत्रातील कर्मचाºयांचे कल्याण, फायदे आणि हक्कांसाठी काम करणाºया राष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान कर्मचारी सिनेटने ६८,००० हून अधिक कर्मचाºयांचे प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी याबाबत कामगार विभागाला निवेदन दिले आहे. कर्मचारी कपात, वेतन कमी करणे, सक्तीने राजीनामा, इतर विविध समस्या याविरोधात कामगार विभाग आणि जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे याचिका दाखल केल्या आहेत.

राज्यातील बºयाच आयटी, आयटीएस, बीपीओ, केपीओ कंपन्यांनी कर्मचाºयांचा बेकायदा सामूहिक टर्मिनेशन, मोबदला व संपूर्णपणे उल्लंघन करून पगाराची बेकायदेशीर कपात करण्याची मोहीम सुरू केली आहे. खासगी कंपन्यांना कोणतेही बंधनकारक आदेश जारी न झाल्याने हजारो कर्मचारी रोजगाराच्या आणि उत्पन्नाचे नुकसान होत आहेत. महाराष्ट्रातील ६ लाखांहून अधिक आयटी, आयटीएस, बीपीओ, केपीओ कर्मचाºयांच्या कुटुंबापुढे मोठी समस्या निर्माण झाल्याचे यानिमित्ताने दिसून आले आहे.

आतापर्यंत अनेकदा कामगार विभागाकडे कर्मचाºयांच्या प्रश्नाबाबत निवेदन देण्यात आले आहे. मात्र, त्यावर कुठलीही ठोस कारवाई झालेली नाही. शासनाचा आदेश आहे, त्याचे पालन न करणाºयांवर कारवाई का केली जात नाही? कामगार प्रशासन संबंधित कंपनीला नोटीस पाठवते. मात्र, त्याची दखल कंपनीकडून घेतली जात नसल्याचे दिसून आले आहे.- हरप्रीत सलुजा, सरचिटणीस, नॅशनल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉइज सेनेट

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याITमाहिती तंत्रज्ञानPuneपुणे