शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

मंत्र्यांच्याही घरात वाजावी बासरी म्हणजे भांडणतंटे दूर होतील: हरिप्रसाद चौरासिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2019 04:16 IST

आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे महाराष्ट्रीय मंडळ क्रीडा संकुल येथे ६७ वा ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ बुधवारी (ता. ११) सुुरु झाला.

पुणे: ‘‘बासरी की सुरोंसे लडाई-झगडे बंद होते है; बासरी का संगीत ऐसा है जिससे सब माहौल प्रसन्न हो जाता है,’’ असा विचार ज्येष्ठ बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरासिया यांनी व्यक्त केले. ‘‘बासरी ही प्रत्येक मंत्र्यांच्याही घरात वाजली पाहिजे. म्हणजे भांडणतंटे दूर होऊन ‘हार्मनी’ निर्माण होईल,’’ अशीही टिप्पणी त्यांनी केली तेव्हा एकच हशा पिकला.

आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे महाराष्ट्रीय मंडळ क्रीडा संकुल येथे ६७ वा ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ बुधवारी (ता. ११) सुुरु झाला. याच महोत्सवाचा भाग असलेल्या ‘षड्ज’ या शास्त्रीय संगीत महोत्सवास तसेच ‘अंतरंग’ या कार्यक्रमालाही प्रारंभ झाला. यात प्रख्यात गायक अमरेंद्र धनेश्वर यांनी पं. चौरासिया यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या मिश्किल स्वभावाचे दर्शन या मुलाखतीदरम्यान घडले.

बासरी हे संगीतातले पहिले वाद्य आहे, अशी सुरुवात करुन पं. चौरासिया म्हणाले, पंडित पन्नालाल घोष यांना ऐकण्याची संधी मला मिळाली. ते शास्त्रीय वाजवायचे. पण तत्कालीन शास्त्रीय संगीतकारांनी बासरीला पहिल्यांदा फार महत्त्व दिले नव्हते. बासरीची उपेक्षाच करण्यात आली. आता मात्र भजन, गझल, लोकधून, शास्त्रीय संगीत असा बासरीचा सर्वदूर संचार आहे. बासरी हे असे वाद्य आहे ज्यातून योगही साधला जातो, असे ते म्हणाले.

पं. चौरासिया म्हणाले, बासरी वादकाच्या नोकरीसाठी कटक रेडिओ स्टेशनचे पत्र आले. घर सोडून मी जाणार हे कळल्यावर आयुष्यात पहिल्यांदा मी वडिलांना रडताना पाहिले. मी पाच वर्षांचा असतानाच माझी आई मला सोडून गेली. वडील म्हणाले, अरे तुझ्यासाठी मी दुसरे लग्न केले नाही, आणि तू आता मला सोडून निघाला आहेस? पंडित भोलेनाथ यांच्याकडे मी बासरीचे धडे गिरवले. त्यांच्यासारखी बासरी मी अजून ऐकली नाही.

सर्वोत्तम मैफलीची अजून प्रतीक्षा

‘‘सलग अठ्ठावीस वर्षे युरोपात बासरी वादन केले. जगभरच्या दिग्गज वादक, गायकांसोबत बासरी वादन केले. पण मला माझ्या सर्वोत्तम मैफिलीची प्रतीक्षा अजूनही आहे. अजूनही मी ‘सक्सेसफुल’ झालोय असे मला वाटत नाही. शिकण्याची प्रक्रिया माझी रोज चालू आहे,’’ असे वयाची ऐंशी ओलांडलेल्या पं. चौरासिया यांनी सांगितले.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारPuneपुणे