शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

Panshet Flood 1961: पळा.., पळा.., पाणी आले.. पाणी वाढले; आरोळ्या अन् एकच हाहाकार, पानशेत धरणफुटीला ६३ वर्षे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2024 13:04 IST

६३ वर्षांपूर्वी अर्थात १२ जुलै १९६१ राेजी पुणे पूर्ण पाण्यात गेले, ताे दिवस आजही आठवला की अंगावर काटा येताे

सुदाम विश्वे, निवृत्त कलाशिक्षक

पुणे : उष:काळ हाेता हाेता काळरात्र हाेणे म्हणजे काय? हे ज्यांनी याचि देही याचि डाेळा अनुभवला ताे म्हणजे प्रसंग म्हणजे पानशेत धरणफुटीने पुण्यात घातलेला हाहाकार. या घटनेला शुक्रवारी (दि. १२) ६३ वर्षे पूर्ण हाेत आहेत. याबाबत माझ्या वडिलांनी सांगितलेले कटू अनुभव आजही डाेळ्यासमाेर उभे राहतात. त्या दिवशी आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी अक्षरश: पुणेकर पुरते लुटले गेले, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

बराेबरच ६३ वर्षांपूर्वी अर्थात १२ जुलै १९६१ राेजी पुणे पूर्ण पाण्यात गेले हाेते. तो दिवस आठवण्याइतका मी मोठा नव्हतो; पण वडीलधाऱ्या मंडळींच्या ताेंडून अनेक वर्षे त्या कटू आठवणी ऐकत ऐकत लहानाचा माेठा झालाे, त्यामुळे ताे दिवस आजही आठवला की अंगावर काटा येताे.

वडील सांगत हाेते की, पळा... पळा... पाणी आले... पाणी वाढले... अशा आरोळ्या झाल्या आणि एकच हाहाकार उडाला. आम्ही त्यावेळी गणेशपेठ येथे राहत होतो. दगडी नागोबा येथे आमचे घर होते. नागझरी नाल्यातून पाणी थेट तेथील अनेक घरांमध्ये घुसले. आईने धैर्याने आम्हा लहानांना बाहेर काढत मनपाच्या शाळेत आश्रय घेतला. घरातील भांडी, इतर सर्व सामान पुरात वाहून गेले आणि क्षणात हाेत्याचे नव्हते झाले. फक्त घरातील मधला खांब होता त्याला एक कंदील व वडिलांचा फोटो होता तो वाचला होता.

आणखी एक आठवण वडीलधारी मंडळी सांगत असे. ती म्हणजे पुराचे पाणी ओसरल्यावर दुसऱ्या दिवशी पुन्हा पाणी आले... पाणी आले... अशी आराेळी दिली गेली. लोक सर्व साेडून सैरावैरा पळू लागले. अशा प्रकारे नागरिकांना घाबरून भुरट्या चोरांनी घरातील सामान घेऊन पोबारा केला.

शासनाने पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला. पूरग्रस्तांसाठी बांधलेल्या गोखलेनगर येथे आम्हाला घर दिले. वडिलांनी जिद्दीने पुन्हा संसार उभा केला. आम्हाला शिक्षण दिले. स्वतःच्या पायावर उभे केले. पुरामुळे पुण्याचा विस्तार झाला. याच पानशेत पुरामुळे विस्थापित झालेल्यांसाठी गोखलेनगर येथे तीन टेकड्यांच्या मध्ये वसाहत वसवली गेली. हा भाग तसा संपूर्ण जंगलाचा, त्यामुळे सुरुवातीला घराबाहेर पडायलाही भीती वाटायची; पण आज तेच गोखलेनगर पुण्याच्या मध्यवस्तीत मोडते. पुरामुळे आम्ही गोखलेनगर येथे आलो आणि आमचे जीवन समृद्ध झाले, असे असले तरी ताे दिवस आठवला की आजही अंगावर काटा येताे.

टॅग्स :PuneपुणेfloodपूरWaterपाणीDamधरणRainपाऊसSenior Citizenज्येष्ठ नागरिक