शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

Panshet Flood 1961: पळा.., पळा.., पाणी आले.. पाणी वाढले; आरोळ्या अन् एकच हाहाकार, पानशेत धरणफुटीला ६३ वर्षे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2024 13:04 IST

६३ वर्षांपूर्वी अर्थात १२ जुलै १९६१ राेजी पुणे पूर्ण पाण्यात गेले, ताे दिवस आजही आठवला की अंगावर काटा येताे

सुदाम विश्वे, निवृत्त कलाशिक्षक

पुणे : उष:काळ हाेता हाेता काळरात्र हाेणे म्हणजे काय? हे ज्यांनी याचि देही याचि डाेळा अनुभवला ताे म्हणजे प्रसंग म्हणजे पानशेत धरणफुटीने पुण्यात घातलेला हाहाकार. या घटनेला शुक्रवारी (दि. १२) ६३ वर्षे पूर्ण हाेत आहेत. याबाबत माझ्या वडिलांनी सांगितलेले कटू अनुभव आजही डाेळ्यासमाेर उभे राहतात. त्या दिवशी आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी अक्षरश: पुणेकर पुरते लुटले गेले, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

बराेबरच ६३ वर्षांपूर्वी अर्थात १२ जुलै १९६१ राेजी पुणे पूर्ण पाण्यात गेले हाेते. तो दिवस आठवण्याइतका मी मोठा नव्हतो; पण वडीलधाऱ्या मंडळींच्या ताेंडून अनेक वर्षे त्या कटू आठवणी ऐकत ऐकत लहानाचा माेठा झालाे, त्यामुळे ताे दिवस आजही आठवला की अंगावर काटा येताे.

वडील सांगत हाेते की, पळा... पळा... पाणी आले... पाणी वाढले... अशा आरोळ्या झाल्या आणि एकच हाहाकार उडाला. आम्ही त्यावेळी गणेशपेठ येथे राहत होतो. दगडी नागोबा येथे आमचे घर होते. नागझरी नाल्यातून पाणी थेट तेथील अनेक घरांमध्ये घुसले. आईने धैर्याने आम्हा लहानांना बाहेर काढत मनपाच्या शाळेत आश्रय घेतला. घरातील भांडी, इतर सर्व सामान पुरात वाहून गेले आणि क्षणात हाेत्याचे नव्हते झाले. फक्त घरातील मधला खांब होता त्याला एक कंदील व वडिलांचा फोटो होता तो वाचला होता.

आणखी एक आठवण वडीलधारी मंडळी सांगत असे. ती म्हणजे पुराचे पाणी ओसरल्यावर दुसऱ्या दिवशी पुन्हा पाणी आले... पाणी आले... अशी आराेळी दिली गेली. लोक सर्व साेडून सैरावैरा पळू लागले. अशा प्रकारे नागरिकांना घाबरून भुरट्या चोरांनी घरातील सामान घेऊन पोबारा केला.

शासनाने पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला. पूरग्रस्तांसाठी बांधलेल्या गोखलेनगर येथे आम्हाला घर दिले. वडिलांनी जिद्दीने पुन्हा संसार उभा केला. आम्हाला शिक्षण दिले. स्वतःच्या पायावर उभे केले. पुरामुळे पुण्याचा विस्तार झाला. याच पानशेत पुरामुळे विस्थापित झालेल्यांसाठी गोखलेनगर येथे तीन टेकड्यांच्या मध्ये वसाहत वसवली गेली. हा भाग तसा संपूर्ण जंगलाचा, त्यामुळे सुरुवातीला घराबाहेर पडायलाही भीती वाटायची; पण आज तेच गोखलेनगर पुण्याच्या मध्यवस्तीत मोडते. पुरामुळे आम्ही गोखलेनगर येथे आलो आणि आमचे जीवन समृद्ध झाले, असे असले तरी ताे दिवस आठवला की आजही अंगावर काटा येताे.

टॅग्स :PuneपुणेfloodपूरWaterपाणीDamधरणRainपाऊसSenior Citizenज्येष्ठ नागरिक