शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

पुण्यात ६३ टक्के बरसला, खडकवासला प्रकल्प निम्मे भरले; १० महत्त्वाच्या धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा

By नितीन चौधरी | Updated: July 22, 2024 18:29 IST

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये ५२ टक्के अर्थात १५.२४ टीएमसी पाणीसाठा जमा झाला

पुणे : जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून घाटमाथ्यावर सुरू असलेल्या पावसामुळे मावळ तालुक्यात सुमारे सरासरीच्या १२७ टक्के पाऊस झाला आहे. तर दौंडमध्येदेखील पावसाने सरासरी ओलांडली आहे. जिल्ह्यात २२ जुलैपर्यंत ३०९ मिलिमीटर पाऊस पडतो. त्यानुसार आतापर्यंत १९२.६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील दहा महत्त्वाच्या धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. तर पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये ५२ टक्के अर्थात १५.२४ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे.

गेल्या आठवड्यापासून जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पावसाने जोर धरला आहे. मावळ, मुळशी, भोर, वेल्हे व जुन्नर या तालुक्यांमध्ये २२ पैकी सरासरी २० दिवस पाऊस झाला आहे. तर शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड व पुरंदर या पूर्वेकडील तालुक्यांमध्ये तुलनेने पावसाचे दिवस कमी आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १९२.६ मिलिमीटर पाऊस झाला असून २२ जुलैपर्यंतच्या सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत ६३ टक्के पाऊस झाला आहे. वेल्हे तालुक्यात आतापर्यंत सर्वाधिक ८८२.६ मिलिमीटर पाऊस झाला असून हा पाऊस सरासरीच्या ८९.३ टक्के इतका आहे. मावळ तालुक्यात आतापर्यंत ५९४.४ मिलिमीटर अर्थात सरासरीच्या १२७ टक्के पाऊस झाला आहे. टक्केवारीचा विचार करता दौंड तालुक्याने सरासरी ओलांडली असून येथे आतापर्यंत ६६.३ मिलिमीटर अर्थात सरासरीच्या १०२.८ टक्के पाऊस झाला आहे. सर्वात कमी ६३.४ मिलिमीटर पाऊस पुरंदरमध्ये झाला आहे. सरासरीच्या तुलनेत हा पाऊस ४९.८ टक्के इतकाच आहे.

दुसरीकडे खडकवासला प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस होत असल्याने सोमवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत चारही धरणात १५.२४ टीएमसी अर्थात क्षमतेच्या ५२.२७ टक्के जलसाठा तयार झाला आहे. गेल्यावर्षी याच तारखेला चारही धरणांमध्ये १४.११ टीएमसी अर्थात ४८.४१ टक्के पाणीसाठा होता.

जिल्ह्यातील पुरंदर, दौंड, इंदापूर, बारामती या चार तालुक्यांमध्ये तुलनेने पाऊस कमी असल्याने खडकवासला प्रकल्पातून पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार पालकमंत्री अजित पवार यांनी शनिवारी खडकवासला प्रकल्पातून खरीप आवर्तन सोडण्याचे निर्देश दिले. खडकवासला डाव्या कालव्यातून शनिवारी ३०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले. रविवारी त्यात वाढ करून ७०० क्युसेक क्षमतेने पाणी सोडण्यात आले. तर सोमवारी पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने हा विसर्ग ७०० वरून १००५ क्युसेक करण्यात आला.

जिल्ह्यातील तालुकानिहाय पाऊस

तालुका      पाऊस        टक्के

हवेली        १०२.४        ५२.२मुळशी       ५०८.२       ७८.७भोर           ३३२.२        ९०.६मावळ       ५९४.४        १२७वेल्हे          ८८२.६        ८९.३जुन्नर           ९९.८        ४५.६खेड          १०४.६         ६३.२आंबेगाव    २२८.७         ९२.५शिरूर        ५३.४          ७३.७बारामती     ३४.५           ५७.३इंदापूर       ७३.६           ९०.६दौंड          ६६.३           १०२.८पुरंदर        ६३.४            ४९.८

एकूण       ३०९.३           ६२.३

जिल्ह्यातील धरणसाठा (टक्क्यांमध्ये)

डिंभे - २७.५४पानशेत - ५९.२८वरसगाव - ४६.०९खडकवासला - ७७.७३पवना - ४५.४५चासकमान - २९.८६घोड - ८.८२आंद्रा - ४०.३३नीरा देवघर - ४३.८१भाटघर - ४९.९५टेमघर - ३९.९४

खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा

एकूण १५.२४--५२.२७गेल्या वर्षी १४.११--४८.४१

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीRainपाऊसDamधरणenvironmentपर्यावरणPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका