शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

Panshet Flood 1961: पानशेत दुर्घटनेला ६१ वर्षे हाेऊनही प्रश्न प्रलंबितच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2022 15:40 IST

शहराच्या वेगवेगळ्या भागात जागा उपलब्ध करून पूरबाधितांचे पुनर्वसन केले असले तरी काही भागातील घराच्या मालकी हक्क हस्तांतराचा प्रश्न प्रलंबितच

पुणे : पानशेत धरणफुटीच्या दुर्घटनेला ६१ वर्षे पूर्ण झाले तरी पुनर्वसनाच्या रूपाने त्या जखमा भळभळत आहेत. शहराच्या वेगवेगळ्या भागात जागा उपलब्ध करून पूरबाधितांचे पुनर्वसन केले असले तरी काही भागातील घराच्या मालकी हक्क हस्तांतराचा प्रश्न प्रलंबितच आहे. याबाबतच्या शासन निर्णयात अनेक त्रुटी असल्याने त्यांना मालकी हक्क हस्तांतर करणे आणि शासनाचा नजराना भरून स्वतःच्या नावावर हक्काचे घर करणे अवघड होत आहे.

पानशेत धरण फुटून दि. १२ जुलै १९६१ राेजी अनेकांचा बळी गेला. हजाराे नागरिक बेघर झाले होते. या घटनेला मंगळवारी ६१ वर्षे पूर्ण होत आहेत. या पूरग्रस्तांचे पुनर्वसन शासनाने सातारा रस्ता, पद्मावती, सहकारनगर, संभाजी नगर, महर्षी नगर, मुकुंद नगर, लक्ष्मी नगर, कोथरूड या भागात केले. मात्र, त्यांचे प्रश्न सरकार दरबारी अद्याप प्रलंबित असल्याने येणाऱ्या सरकारने तरी गंभीरपणे लक्ष देऊन पूरग्रस्त संस्था, वारसदारांना मालकी हक्क कसा मिळेल याबाबत लक्ष केंद्रित करून प्रामुख्याने प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी जोर धरत आहे.

या आहेत समस्या

- शहरातील १०३ पूरग्रस्त सोसायटीच्या वारस हक्काचे प्रश्न प्रलंबित.- संस्थांना मालकी हक्क मिळण्याच्या प्रक्रियेत हस्तांतर करण्यासाठी अडथळा.- पूरग्रस्त मूळ सभासद मालकी हक्क मिळण्यापासून वर्षानुवर्षे वंचित.- अनधिकृत वारस नोंदणी, एकाच कुटुंबातील तीन तीन सभासद- मागासवर्गीय सोसायटीच्या मालकी हक्काच्या वारस नोंदी प्रलंबित.

''पूरग्रस्तांच्या अडचणीबाबत पानशेत पूरग्रस्त सहकारी गृहरचना संस्था विकास मंडळाने शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. त्याला यश आले असून, १९७६ च्या शासन निर्णयानुसार प्रति चौरस फूट ६० रुपये दराप्रमाणे मालकी हक्क मिळवण्यासाठी ३ वर्षे मुदतवाढ दिली आहे. यात छोटे व मोठे व्यावसायिक यांना एकच मापदंड लागू करणे हे अन्यायकारक असल्याने याबाबत शासनाने पुनर्विचार करावा. - शशिकांत बडदरे (सचिव, पानशेत पूरग्रस्त सहकारी गृहरचना संस्थांचे विकास मंडळ, पुणे)'' 

''पूरग्रस्त १०३ सोसायटीच्या मूळ वारस हक्काचे प्रश्न प्रलंबित आहेत. त्याचबरोबर २१ मागासवर्गीय सोसायटीच्या मालकी हक्काची घरे नावावर नाहीत. अनेक सोसायटींमध्ये प्रशासक नेमले आहेत. काही सोसायटीला वालीच नाही. महसूल विभागाने मागासवर्गीय सोसायटीच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे. समाज कल्याण विभाग व महसूल विभाग यांच्यात संभ्रम आहे. - अंबादास सूर्यवंशी (अध्यक्ष, लहूजी आर्मी)''

टॅग्स :PuneपुणेDamधरणWaterपाणीRainपाऊसMaharashtraमहाराष्ट्र