शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
2
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
3
महाराष्ट्राच्या लुटारुंना लोकसभा निवडणुकीत जागा दाखवू; उद्धव ठाकरेंचा घणाघात
4
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
5
१०० वर्षांपेक्षा जुना इतिहास, Reliance इतकं मार्केट कॅप... Covishield लस तयार करणाऱ्या कंपनीची कहाणी
6
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांचा भाजपाला इशारा
7
Success Story : स्कूल ड्रॉपआऊट, जे बनले देशातील सर्वात श्रीमंत ज्वेलर; देश-विदेशात पसरलाय व्यवसाय
8
आरक्षण, घटनेवर खोटा प्रचार सुरू; ४०० हून अधिक जागा जिंकणार : गृहमंत्री शाह
9
भाजप राज्यघटना फाडूनच फेकेल; घटनेची प्रत हाती धरून राहुल गांधी यांचा दावा
10
VIDEO : महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंचं रिल, महाराष्ट्रातील जनतेला केलं विशेष आवाहन
11
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
12
मुख्यमंत्री महिलांच्या कपड्यांकडेच बघत असतात, कारण काय? माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा नितीश कुमारांवर पलटवार
13
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
14
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
15
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
16
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
17
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
18
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
19
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
20
लालूंच्या कन्येकडे १५.८२ कोटींची संपत्ती; कोणतेही कर्ज नाही

देशातील ६० टक्के शेतीला पाणी नाही - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2019 11:51 PM

देशात ८२ टक्के शेतकऱ्यांचे क्षेत्र २ हेक्टरपेक्षा कमी आहे. त्यातील ६० टक्के शेतीला खात्रीचे पाणी नाही. त्यामुळे केवळ शेतीचा व्यवसाय करणे संपूर्ण कुटुंबासाठी योग्य नाही.

बारामती - देशात ८२ टक्के शेतकऱ्यांचे क्षेत्र २ हेक्टरपेक्षा कमी आहे. त्यातील ६० टक्के शेतीला खात्रीचे पाणी नाही. त्यामुळे केवळ शेतीचा व्यवसाय करणे संपूर्ण कुटुंबासाठी योग्य नाही. शेतीचे क्षेत्र वाढत नाही. शेतीच्या वाटण्या होत आहेत. परिणामी शेतीचे क्षेत्र कमी होत असून कुटुंब मात्र वाढत आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले.माळेगाव बु. (ता. बारामती) येथील ‘व्हीएनएस निर्माण तावरे सिटी’ या प्रकल्पाचे भूमिपूजन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित शेतकरी मेळाव्यात पवार बोलत होते. पवार म्हणाले, की आपण कृषिमंत्री असताना यवतमाळ जिल्ह्यातील एका शेतक-याने आत्महत्या केली होती. त्या रात्री आपल्याला झोप लागली नाही. त्यामुळे तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यासमवेत त्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची भेट घेतली. त्या ‘माऊली’ने डोळ्यात पाणी आणून सांगितले. शेतकºयाच्या डोक्यावर कर्ज होतं. त्या कर्जाची परतफेड करता आली नाही. कर्जातील काही भाग मुलीच्या लग्नासाठी काढून ठेवला होता. लग्नाला विलंब झाला. कर्जाचे व्याज वाढत गेले. त्यामुळे बँकेची नोटीस आली. लिलाव झाला तर लग्नही रद्द होईल. या भीतीपोटी यवतमाळच्या शेतकºयानं आत्महत्या केल्याचं त्यांच्या पत्नीनं सांगितलं. देशाच्या उद्योगपतींना कर्जमाफी मिळू शकते, मग शेतक-यांना का नाही. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला,हे चित्र बदलायचे आहे. त्यामुळे निर्णय घेणे आवश्यक असल्याचे पंतप्रधानांना सांगितले. त्यानंतर तातडीने ७१ हजार कोटींच्या कर्जमाफीसह कर्जावरील व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेतला.या वेळी अ‍ॅड. केशवराव जगताप यांनी निष्क्रीय शासनामुळे शेतकºयांच्या पदरी निराशा आल्याची टीका केली. तसेच, अ‍ॅड. राहुल तावरे, संतोष वायचळ यांनी प्रास्ताविक केले. सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, तसेच स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील कलाकार शंतनू मोघे, आश्विनी महांगडे यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी ज्येष्ठ नेते पवार यांच्या हस्ते पुणे शहरातील ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड जे. पी. धायतडक, कलाकार शंतनु मोघे यांच्यासह विविध पदाधिकारी कलाकारांचा सन्मान करण्यात आला.‘व्हीएनएस निर्माण तावरे सिटी’च्या वतीने अशोकराव तावरे, अ‍ॅड. केशवराव जगताप, प्रकाश चव्हाण, शंकर तावरे, अनिल तावरे, सचिन भोसले, दिलीप तावरे, कल्याण पांचागणे, अ‍ॅड. राहुल तावरे यांनी स्वागत केले. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासराव देवकाते, कृषी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र पवार, सभापती संजय भोसले, बाळासाहेब तावरे, रोहिणी तावरे, अभिनेत्री स्नेहलता तावरे, शहाजी काकडे, छोटा पुढारी घनश्याम दरोडे आदी उपस्थित होते....तेवढेदेखील पैसे शेतक-यांना दिले नाहीदेशाच्या अर्थसंकल्पाने शेतक-यांसाठी वार्षिक ६ हजार रुपये जाहीर केले आहेत. त्यामुळे चहाच्या कपाला जेवढे पैसे मिळतात, तेवढेदेखील पैसे शेतकºयांना दिले नाही. असली दया आम्हाला नको. शेतीमालाला, शेतकºयांच्या घामाला भाव द्या. शेतकरी लाचारीने वागणार नाही, अशा शब्दांत अर्थसंकल्पात शेतकºयांसाठी जाहीर केलेल्या निर्णयावर माजी कें द्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी टीका केली....त्यांना देशातील ८० टक्के खाणा-यांची काळजी आहेदेशातील साखरेसाठी जाहीर केलेला २९०० रुपये भाव पडणारा नाही. त्यामुळे उसाला चांगली किंमत देता येत नाही. किमान ३२०० ते ३३०० दर साखरेला मिळाल्यास शेतकºयांना उसाला चांगली किंंमत देता येईल.कमीत कमी शेतकºयांना ३ ते ३५०० टन शेतकºयांना मिळल्याशिवाय शेतकºयाला ऊर्जितावस्था येणार नाही. मात्र, राज्यकर्त्यांना आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २० टक्के उत्पादकांपेक्षा देशातील ८० टक्के खाणा-यांची काळजी आहे.त्यामुळे साखरेच्या किंमती वाढविण्याचा निर्णय होत नाही, अशी टीका माजी कें द्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केली.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारagricultureशेतीIndiaभारत