शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

आणीबाणीच्या घटनेला ४६ वर्ष पूर्ण; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा काँग्रेसवर ट्विटद्वारे निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2021 15:18 IST

देशात आणीबाणी जाहीर केलेल्या घटनेला शुक्रवारी ( दि. २५) ४६ वर्ष पूर्ण होत आहे. याच धर्तीवर पाटील यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

पुणे : आणीबाणीच्या मुद्द्यांवरून भाजपकडून सातत्याने काँग्रेसला लक्ष केले जात असते. आज देखील भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसवर आणीबाणीच्या घटनेचा संदर्भ घेत टीका करण्याची संधी सोडली नाही.देशात आणीबाणी जाहीर केलेल्या घटनेला शुक्रवारी ( दि. २५) ४६ वर्ष पूर्ण होत आहे. याच धर्तीवर पाटील यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. 

चंद्रकांत पाटील यांनी ट्विटद्वारे काँग्रेसवर टीका केली आहे. या ट्विटमध्ये पाटील म्हणतात, 'गरीबी हटाव’च्या घोषणा हवेतच विरल्या. दारिद्र्य निर्मूलनाचे स्वप्न दाखवणाऱ्या इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने आणीबाणीच्या काळात राबवलेल्या आर्थिक धोरणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था मोडकळीस आली आणि याचे भारतावर दूरगामी परिणाम झाले. याचबबरोबर त्यांनी आणीबाणी हे काँग्रेसचं लोकशाही पायदळी तुडवण्याचं लांच्छनास्पद कारस्थान असल्याची टीका देखील केली आहे. 

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने भारतीय अर्थव्यवस्था संपूर्णरित्या उद्धवस्त केली, अर्थचक्राची गती मंदावली, बेरोजगारी वाढली आणि सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांचे वेतन रोखले. ‘गरिबी हटाव’ अशी घोषणा देणाऱ्या इंदिरा गांधींनी प्रत्यक्षात मात्र ‘गरिबी बढाव’च्या दिशेनेच कृती केली असल्याचेही पाटील यांनी ट्विटसोबत केलेल्या फोटोत म्हटले आहे. तसेच इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने भारतीय अर्थव्यवस्था संपूर्णरित्या उद्धवस्त केली, अर्थचक्राची गती मंदावली, बेरोजगारी वाढली आणि सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांचे वेतन रोखले. ‘गरिबी हटाव’ अशी घोषणा देणाऱ्या इंदिरा गांधींनी प्रत्यक्षात मात्र ‘गरिबी बढाव’च्या दिशेनेच कृती केली असल्याची टीका देखील चंद्रकांत पाटील यांनी या ट्विट मध्ये केली आहे.

संविधानाला धक्का लावणाऱ्या आणि प्रशासनाच्या जबाबदाऱ्या कमी करणाऱ्या ५ प्रमुख घटनादुरुस्ती संसदेत सत्ताबळाचा वापर करून मंजूर करण्यात आल्या. ३८व्या घटनादुरुस्तीच्या माध्यमातून २५ जून १९७५ रोजी करण्यात आलेल्या आणीबाणीच्या विध्वंसक घोंष्णेला न्याययंत्रणेच्या चौकटीतून वगळण्यात आले असेही चंद्रकांत पाटलांनी ट्विट केलेल्या फोटोत म्हटले आहे.

पंतप्रधान मोदींचंही आणीबाणीच्या घटनेचा निषेध व्यक्त करणारं ट्विट 

आणीबाणीच्या त्या काळ्या दिवसाला विसरता येणार नाही. १९७५ ते १९७७ या काळात संस्थांचा नाश झाला. आपण भारतीय लोकशाही भावनांना बळकट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा संकल्प करूया आणि राज्यघटनेत नमूद केलेल्या मूल्यांचे पालन करुया असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

 

टॅग्स :Puneपुणेchandrakant patilचंद्रकांत पाटीलcongressकाँग्रेसPoliticsराजकारणBJPभाजपाIndira Gandhiइंदिरा गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी