शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर मनसे नेते नाराज? म्हणाले, “त्यांनी आम्हाला दोनदा फसवलेय”
2
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी पदार्पणासह रचणार इतिहास; जाणून घ्या सविस्तर
3
Big Breaking: तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात अखेर डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल
4
"देशात धार्मिक युद्ध भडकवण्यासाठी सुप्रीम कोर्ट जबाबदार"; मर्यादेबाहेर जाताय म्हणत भाजप खासदाराची टीका
5
IPL 2025 Video: 'सुपरमॅन' कॅच! विपराजला हवा होता चौकार, पण जोस बलटरने हवेत उडत घेतला भन्नाट झेल
6
राज ठाकरेंशी युती झाल्यास उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का?; संजय राऊत म्हणाले...
7
Video - अग्निकल्लोळ! एका ठिणगीमुळे बोटीला भीषण आग; १४८ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
“मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमुळे राज ठाकरेंची उपयुक्तता सर्वांना वाटत आहे”: छगन भुजबळ
9
“राहुल गांधींचा ‘डरो मत’ संदेश अमलात आणू, एकता, अखंडतेची मशाल घेऊन वाटचाल करू”: सपकाळ
10
Maharashtra Politics : राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र येणार का? संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
11
“इथले मीठ खाता अन् मराठीला विरोध करता? हिंदीची सक्ती होऊ देणार नाही”; उद्धव ठाकरेंनी ठणकावले
12
IPL 2025: चेन्नई सुपर किंग्जमध्ये आला 'बेबी एबी'; अशी आहे टी२० कारकीर्द
13
“कार्यकर्त्यांनी कठोर मेहनत घ्यावी, ५ वर्षांनंतर काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल”: नाना पटोले
14
"मी ज्या झोपडपट्टीतून आलोय...", दिसण्यावरून ट्रोल करणाऱ्यांना सिद्धार्थ जाधवची सणसणीत चपराक
15
गुजरातविरुद्ध केएल राहुलचा विक्रमी षटकार; रोहित, विराट आणि धोनीच्या पंक्तीत झाला सामील
16
'तो' प्रवास ठरला शेवटचा! गायीला वाचवण्याच्या प्रयत्नात कार कालव्यात पडली, एअर होस्टेसचा मृत्यू
17
'हिंदू आहोत हा आमचा गुन्हा आहे का?', पश्चिम बंगाल हिंसाचार बाधित महिलांचा भावनिक सवाल
18
“आम्ही कुटुंब फोडणारे नाही, राज अन् उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर स्वागतच”: हर्षवर्धन सपकाळ
19
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना गती; शिंदे गटातील नेत्यांची प्रतिक्रिया म्हणाले...

शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या ४ मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू; आंबेगाव तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2024 17:40 IST

शाळेला सुट्टी असल्याने ही मुले दुपारच्या वेळी शेततळ्याकडे गेल्याचा प्राथमिक अंदाज असून पोहत असतानाच चौघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला

मंचर: शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या चार मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना निरगुडसर (ता. आंबेगाव) येथे दुपारी साडेतीन वाजता घडली. श्रद्धा काळू नवले (वय 13),सायली काळू  नवले (वय 11), दीपक दत्ता मधे (वय 7) राधिका नितीन केदारी (वय 14)अशी पाण्यात बुडून मरण पावलेल्या मुलांची नावे आहेत.

मूळचे जवळे बाळेश्वर (संगमनेर)येथील कामगार गोरक्षनाथ बबन कवठे हे पत्नी ज्योती ,दत्तक मुली श्रद्धा काळू नवले व सायली काळू नवले यांच्यासमवेत निरगुडसर येथे राहून मजुरीचे काम करत होते. तर मूळचे कानेवाडी(ता. खेड) येथील तीन कुटुंब कामासाठी निरगुडसर येथे आले  सर्वजण पोंदेवाडी येथे शेतात काम करण्यासाठी गेले होते. मुले दीपक मध्ये व राधिका केदारी हे घरीच होते. दुपारी श्रद्धा नवले, सायली नवले, दीपक मधे, राधिका केदारी हे चौघे पोहण्यासाठी नजीक असलेल्या शेततळ्यात गेले. शेततळ्यात पाच ते सात फूट पाणी होते. पोहत असतानाच चौघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. शेतात पाणी भरत असताना तेरा वर्षाचा सुरज गोरक्षनाथ कवठे हा मुलगा धावत येऊन त्याने चार जण पाण्यात बुडाल्याची माहिती दिली. त्यानंतर सुरज कवठे व त्यांची पत्नी ज्योती यांनी तातडीने शेततळ्याकडे धाव घेतली. या शेततळ्याला तारेचे कंपाउंड असून या तारेतून चौघे आत गेले होते. या चौघांना पाण्याबाहेर काढून तातडीने उपचारासाठी मंचर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मात्र ते उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले आहे. श्रद्धा नवले ही इयत्ता सातवीत, सायली नवले ही इयत्ता पाचवीमध्ये , दीपक मधे हा दुसरीत निरगुडसर येथील शाळेत शिकत होते. राधिका केदारी ही पोंदेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकत होती. शाळेला सुट्टी असल्याने ही मुले दुपारच्या वेळी शेततळ्याकडे गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे. भीमाशंकर कारखान्याच्या रुग्णवाहिकेतून मुलांना उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. कारखान्याचे कर्मचारी मदत करत होते. देवेंद्र शहा फाउंडेशनचे स्वप्निल मोरे यांनी मदत केली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :PuneपुणेambegaonआंबेगावWaterपाणीDeathमृत्यूFarmerशेतकरीhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर