शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

३८ प्रकरणांना तब्बल एका वर्षानंतर मंजुरी; नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या अभय योजनेत ५ कोटींपेक्षा जास्त थकीत प्रकरणे

By नितीन चौधरी | Updated: March 2, 2025 13:12 IST

नोंदणी मुद्रांक शुल्क विभागाच्या पडताळणी ही बाब समोर आल्यानंतर संबंधितांना नोटिसा पाठवण्यात आल्या. मात्र

पुणे : नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने गेल्यावर्षी जाहीर केलेल्या अभय योजनेत पाच कोटी रुपयांपेक्षा जास्त वसुली असलेल्या ४५ पैकी ३८ प्रकरणांना तब्बल एका वर्षानंतर मंजुरी दिली आहे. अभय योजना गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये संपल्यानंतर तब्बल चार महिन्यांनंतर या प्रकरणांना मंजुरी देण्यात आली आहे. यात सर्वाधिक २१ प्रकरणे मुंबईतील असून, पुण्यातील सहा प्रकरणांना मंजुरी मिळाली आहे. या ३८ प्रकरणांमधून १८४ कोटी रुपये विभागाला मिळणार आहेत.

राज्यात १९८० पासून नोंदणी झालेल्या दस्तांमध्ये चुकीचे मुद्रांक शुल्क भरण्यात आले. नोंदणी मुद्रांक शुल्क विभागाच्या पडताळणी ही बाब समोर आल्यानंतर संबंधितांना नोटिसा पाठवण्यात आल्या. मात्र, त्यावरील दंडदेखील वाढत गेला. त्यामुळे राज्य सरकारने १ डिसेंबर २०२३ पासून अभय योजना लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार थकीत मुद्रांक शुल्क व दंडावरील वसुलीत सवलत देण्यात आली. या योजनेत पाच कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी मुद्रांक शुल्क विभागाने तसा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवावा, त्यानंतर त्याला मंजुरी देण्यात येईल, अशी अट घालण्यात आली होती. राज्यात असे ४५ प्रस्ताव मुंबई, पुणे, नाशिक व रायगड या मोठ्या शहरांमधून आले होते.

विभागाने हे प्रस्ताव राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठविले होते. मात्र, एक वर्ष उलटून गेले तरीही या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली नव्हती. यामागे तांत्रिक कारण देण्यात येत होते. प्रत्यक्षात ‘व्यवहार’ पूर्ण न झाल्यामुळे मंजुरी मिळाली नसल्याचे खासगीत सांगण्यात येत होते. दरम्यान, नवे सरकार स्थापन झाल्यानंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विभागाच्या आढाव्यात या प्रकरणांना मंजुरी देण्याचे ठरविले.राज्य सरकारकडे आलेल्या या ४५ प्रस्तावांमध्ये मुंबईतील २५, पुण्यातील ७, रायगडमधील ७ व नाशिकमधील ६ प्रकरणांचा समावेश आहे. राज्य सरकारने यातील ३८ प्रस्तावांना मंजुरी दिली असून, त्यात मुंबईतील २१, पुण्यातील ६, नाशिकमधील ४ व रायगडमधील ७ प्रकरणांचा समावेश आहे. या सर्व ३८ प्रकरणांमधून राज्य सरकारला १८४ कोटी ५० लाख रुपयांचा महसूल मिळणार आहे. उर्वरित सात प्रकरणांनादेखील लवकरच मंजुरी मिळेल, असे विभागाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रGovernmentसरकार