शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

३८ प्रकरणांना तब्बल एका वर्षानंतर मंजुरी; नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या अभय योजनेत ५ कोटींपेक्षा जास्त थकीत प्रकरणे

By नितीन चौधरी | Updated: March 2, 2025 13:12 IST

नोंदणी मुद्रांक शुल्क विभागाच्या पडताळणी ही बाब समोर आल्यानंतर संबंधितांना नोटिसा पाठवण्यात आल्या. मात्र

पुणे : नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने गेल्यावर्षी जाहीर केलेल्या अभय योजनेत पाच कोटी रुपयांपेक्षा जास्त वसुली असलेल्या ४५ पैकी ३८ प्रकरणांना तब्बल एका वर्षानंतर मंजुरी दिली आहे. अभय योजना गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये संपल्यानंतर तब्बल चार महिन्यांनंतर या प्रकरणांना मंजुरी देण्यात आली आहे. यात सर्वाधिक २१ प्रकरणे मुंबईतील असून, पुण्यातील सहा प्रकरणांना मंजुरी मिळाली आहे. या ३८ प्रकरणांमधून १८४ कोटी रुपये विभागाला मिळणार आहेत.

राज्यात १९८० पासून नोंदणी झालेल्या दस्तांमध्ये चुकीचे मुद्रांक शुल्क भरण्यात आले. नोंदणी मुद्रांक शुल्क विभागाच्या पडताळणी ही बाब समोर आल्यानंतर संबंधितांना नोटिसा पाठवण्यात आल्या. मात्र, त्यावरील दंडदेखील वाढत गेला. त्यामुळे राज्य सरकारने १ डिसेंबर २०२३ पासून अभय योजना लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार थकीत मुद्रांक शुल्क व दंडावरील वसुलीत सवलत देण्यात आली. या योजनेत पाच कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी मुद्रांक शुल्क विभागाने तसा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवावा, त्यानंतर त्याला मंजुरी देण्यात येईल, अशी अट घालण्यात आली होती. राज्यात असे ४५ प्रस्ताव मुंबई, पुणे, नाशिक व रायगड या मोठ्या शहरांमधून आले होते.

विभागाने हे प्रस्ताव राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठविले होते. मात्र, एक वर्ष उलटून गेले तरीही या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली नव्हती. यामागे तांत्रिक कारण देण्यात येत होते. प्रत्यक्षात ‘व्यवहार’ पूर्ण न झाल्यामुळे मंजुरी मिळाली नसल्याचे खासगीत सांगण्यात येत होते. दरम्यान, नवे सरकार स्थापन झाल्यानंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विभागाच्या आढाव्यात या प्रकरणांना मंजुरी देण्याचे ठरविले.राज्य सरकारकडे आलेल्या या ४५ प्रस्तावांमध्ये मुंबईतील २५, पुण्यातील ७, रायगडमधील ७ व नाशिकमधील ६ प्रकरणांचा समावेश आहे. राज्य सरकारने यातील ३८ प्रस्तावांना मंजुरी दिली असून, त्यात मुंबईतील २१, पुण्यातील ६, नाशिकमधील ४ व रायगडमधील ७ प्रकरणांचा समावेश आहे. या सर्व ३८ प्रकरणांमधून राज्य सरकारला १८४ कोटी ५० लाख रुपयांचा महसूल मिळणार आहे. उर्वरित सात प्रकरणांनादेखील लवकरच मंजुरी मिळेल, असे विभागाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रGovernmentसरकार