शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra | राज्यात दहा महिन्यात ३० हजार अपघात; ६६ हजार नागरिक गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2022 12:34 IST

१०८ या आपत्कालीन क्रमांकावर आलेल्या वर्दीतून गंभीर आकडेवारी समोर...

- नितीन चाैधरी

पुणे : राज्यात रस्ते अपघातांच्या दृष्टीने यंदाचे वर्ष अतिशय वाईट ठरले असून, गेल्या दहा महिन्यांत तब्बल ३० हजारांहून अधिक वाहनांचा अपघात झाला. त्यात ६६ हजारांहून अधिक गंभीर झाले आहेत. १०८ या आपत्कालीन क्रमांकावर आलेल्या वर्दीतून ही गंभीर आकडेवारी समोर आली आहे. कोरोना काळाची दोन वर्षे वगळता, त्यापूर्वीच्या वर्षांशी तुलना करता २०२२ मध्ये गंभीर जखमींचे प्रमाण २० पटींहून अधिक वाढले आहे. याचे मुख्य कारण चालकांचा निष्काळजीपणा हाच आहे, असे दिसून येत आहे.

पुण्यात रविवारी नवले पुलावर झालेल्या अपघातात भरधाव ट्रकने तब्बल ४८ वाहनांना उडवले. त्यात अनेक जण जखमी झाले. त्यानंतर रस्ते अपघातांमध्ये १०८ रुग्णवाहिकेचा रिस्पॉन्स टाईम किती आहे, याविषयी चर्चा सुरू झाली. सुदैवाने या अपघातात गंभीर जखमींचे प्रमाण कमी होते. मात्र, चालकाच्या निष्काळजीपणामुळेच हा अपघात झाल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. या अपघातानंतर १०८ क्रमांकावरील रुग्णवाहिकेसाठी आलेल्या फोननंतर तेथील अपघातग्रस्तांना ११ मिनिटांत जवळील रुग्णालयांत दाखल करण्यात आले होते.

आपत्कालीन रुग्णवाहिका ९३७ :

राज्यात १०८ ही आपत्कालीन रुग्णवाहिका सेवा आहे. महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसच्या माध्यमातून बीव्हीजी रुग्णांना सेवा पुरवते. यासाठी राज्यभरात ९३७ रुग्णवाहिका तैनात आहेत. प्रत्येक रुग्णवाहिकेत डॉक्टरांची उपलब्धता असते. गंभीर जखमींना रुग्णवाहिकेतच प्राथमिक उपचार देऊन आवश्यकतेनुसार त्यांना रुग्णालयांत भरती केले जाते. या हेल्पलाइनवर आलेल्या वर्दीवरून राज्यात रस्ते अपघातांची संख्या चिंताजनक पातळीवर पोचली आहे.

आकडे बाेलतात...

- जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यांत राज्यामध्ये तब्बल ३० हजार ५५२ वाहनांचा अपघात झाला. - या अपघातात सुमारे ६५ हजार ९२२ जण गंभीर जखमी झाले आहेत.

- सन २०२१ मध्ये ४७ हजार ३०२ वाहनांचे अपघात झाले असले तरी गंभीर जखमींची संख्या केवळ २,९७८ होती.

- त्यापूर्वीच्या पाच वर्षांमध्येही हे प्रमाण कमीच होते. त्यामुळे २०२२ हे वर्ष अपघातांचे वर्ष ठरले.

पुणे जिल्ह्यातही वाढले अपघात :

राज्यात अपघात वाढले आहेत. पुणे जिल्हाही त्याला अपवाद नसून, दहा महिन्यांमध्ये १७८७ वाहनांचे अपघात झाले आहेत. त्यात गंभीर जखमींची संख्या तब्बल ५ हजार ५६७ इतकी आहे. सन २०२१ मध्ये गंभीर जखमींची सख्या केवळ २३१ होती. यंदा तब्बल २५ पट वाढ झाली आहे.

...म्हणून हाेताहेत अपघात!

बीव्हीजी महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर शेळके म्हणाले की, राज्यात सर्वत्र रस्त्यांची स्थिती चांगली झाल्याने वेगाचा आलेख वाढला आहे. तसेच चालकांचा निष्काळजीपणा देखील वाढला आहे. परिणामी अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या अपघातग्रस्त वाहनांमध्ये मोठ्या बसगाड्यांचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळेच जखमींची संख्या वाढली. त्यासाठी चालकांना वाहन परवाना देतानाच त्यांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे. त्यासाठी वेळोवेळी आम्हीही पुढाकार घेत असतो. चालकांमध्ये जागृतीची मोठी गरज आहे.

राज्यातील अपघात

वर्ष -अपघातग्रस्त वाहने- गंभीर जखमी

२०१७- ७४,११८- १४४१

२०१८- ७४,४४७- १३२५

२०१९- ५९,०१२- ६४६

२०२०- ३६,९८६- २०९

२०२१- ४७,३०२- २९७८

२०२२- (ऑक्टो) ३०,५५२- ६५,९२२

पुणे जिल्हा

२०१७ ४,९६९ १०४

२०१८ ५,३१० ९७

२०१९ ४,५७५ ७८

२०२० २,४८६ १८

२०२१ ३,३११ २३१

२०२२ १,७८७ ५५६७

१०८ रुग्णवाहिका

राज्य : ९३७

पुणे जिल्हा : ८२

पुणे, पिंपरी : ४१

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्र