शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
5
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
6
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
7
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
8
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
9
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
10
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
11
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
12
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
13
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
14
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
15
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
16
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
17
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
18
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
19
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
20
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?

वीर धरण १०० टक्के भरल्याने १३ हजार ९११ क्युसेक्सने नीरा नदीत पाणी सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 11:34 PM

नीरा देवघर, भाटघर तसेच गुंजवणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वाढ झाली असून, वीर धरणात गतवर्षीपेक्षा लवकर पाणी जमा झाले.

नीरा - नीरा देवघर, भाटघर तसेच गुंजवणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वाढ झाली असून, वीर धरणात गतवर्षीपेक्षा लवकर पाणी जमा झाले. धरण १०० टक्के भरल्याने धरणातून १३ हजार ९११ क्युसेक्स वेगाने नीरा नदीत पाणी सोडण्यात आले असून, नीरा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. नीरामाई दुथडी भरून वाहत असून, नीरा (ता.पुरंदर) येथील ब्रिटिशकालीन पुलावर तसेच प्रसिद्ध दत्तघाटाच्या पायऱ्यांना पाणी लागल्याने नदीच्या खळाळत्या प्रवाहाचे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी नीरा व परिसरातील नागरिक येत आहेत.जिल्ह्यातील धरणक्षेत्रात यंदा चांगला पाऊस झाला त्यामुळे गुंजवणी, नीरा देवघर तसेच भाटघर धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली. वीर धरण परिसरात यंदा जेमतेम पाऊस झाला, मात्र इतर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली. नीरा नदीपात्रातून पाणी वाहत असून, यामुळे पुरंदर, बारामती, इंदापूर, खंडाळा तालुक्यातील शेतीला संजीवनी मिळणार आहे. पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने नीरा डावा व उजवा कालवा तसेच नदीपात्राच्या कडेच्या पाणीसाठ्यात पाणी जमा होत असून, यामुळे भूजल पातळीत वाढ होणार आहे. चालू हंगामातील बाजरी, भुईमूग, सोयाबीन, फळपिके आदींना पावसाचा तसेच नदीच्या पाण्याचा फायदा होणार आहे. यामुळे हजारो एकर शेतीला फायदा होणार असून, नदीवर बांधलेल्या बंधाºयातही पाणी टिकून राहण्यास मदत होणार आहे. दरम्यान, नीरामाईची ओटी तसेच पूजनाला महिलांनी सुरुवात केली असून, पीकपाणी चांगले येऊन बरकत मिळण्याची प्रार्थना केली जात आहे.पोलिसांचे हवे लक्षनीरा दुथडी भरून वाहत असून, हे दृश्य टिपण्यासाठी अनेक जण पुलावर येत आहेत. मात्र सेल्फी तसेच फोटोग्राफीच्या नादात एखादा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरुणाई येथे मोठ्या प्रमाणावर येत असून त्यांच्या हालचालींकडे पोलिसांनी लक्ष देणे गरजेचे आहे.या आठवड्यात वीर धरणातून थोड्याफार प्रमाणात पाण्याचा विसर्ग दोन वेळा करण्यात आला. आज गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास नीरा देवघर धरणातून ७९३७ क्युसेक्स, भाटघर धरणातून २३२९ क्युसेक्स तर वीर धरणातून १३९११ क्युसेक्स वेगाने रात्रभर पाणी सोडण्यात येणार आहे.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या