शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
3
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
4
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
5
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
8
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
9
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
10
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
11
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
12
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
13
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
14
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
15
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
16
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
17
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
18
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
19
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
20
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के

११०० मान्यवरांसोबत झळकलेले '' झळकी ''...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2019 07:00 IST

कधी अपमान,तर कधी सन्मान यांच्या हिंदोळ्यावर हातची नोकरी गमावून देखील ते या छंदापासून दूर गेले नाही..

ठळक मुद्देसिनेमाच नव्हे नाटक, संगीत, क्रीडा, राजकारण अशा अनेक क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश

- दीपक कुलकर्णी-पुणे : बालगंधर्व रंगमंदिरात कार्यक्रमासाठी गेले असताना तिथे त्यांनी रंगभूमीचे नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांच्यासोबत फोटो काढला. त्यानंतर त्यांना सेलिब्रेटी लोकांसोबत फोटो काढण्याचा छंदच जडला..मग ऊन, वारा, पाऊस, दिवस रात्र, नोकरी अशी कशाचीही पर्वा न करता ते आजतागायत फक्त धावताहेत ते मान्यवरांच्या फोटोसाठी.. कधी अपमान,तर कधी सन्मान यांच्या हिंदोळ्यावर हातची नोकरी गमावून देखील ते या छंदापासून दूर गेले नाही.. पण ते आजही स्वत:चा छंद सांभाळून आनंदी आहे.

तब्बल ११०० सेलिब्रेटींसोबत त्यांनी फोटो तर काढलेच पण पुन्हा जेव्हा कधी त्यांची भेट झाली तेव्हा कलर प्रिंटवर दिमाखात ऑटोग्राफ देखील घेतात...अशा या छंद वेड्या कलाकाराचे नाव आहे नागेश उर्फ नागण्णा झळकी..   सोलापूर जिल्हयातील नागण्णा नावावरुन आणि त्याला अवगत वाटत असलेल्या भाषेवरुन जरी कर्नाटकी वाटत असले तरी ते महाराष्ट्रीयन असल्याचे छातीठोकपणे सांगतात. त्याचा हा छंद साधारणपणे सहा ते सात वर्षांपूर्वी सुरु झाला. तेव्हापासून ते आत्तापर्यंत फक्त सिनेमाच नव्हे नाटक, संगीत, क्रीडा, राजकारण अशा अनेक क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश आहे. त्यात केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, क्रिेकेटपटू जहीर खान,अजय जडेजा, अभिनेते नाना पाटेकर, भरत जाधव,अनुपम खेर, डॉ .श्रीराम लागू, विक्रम गोखले, गायक जगजित सिंग, पंकज उधास, आशा भोसले, शंकर महादेवन संगीतकार, अनु मलिक, संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा, यांसारख्या तब्बल ११०० मान्यवरांसोबतचा फोटोसंग्रह त्यांच्याकडे आहे.
पण या छंदाची जपणूक करताना नेहमी सहजासहजीच थोर सेलिब्रेटींचे फोटो उपलब्ध होणार असतात. एकतर या लोकांच्या मूडप्रमाणे हे लोक वागतात. त्याचा फटका कधी बसेल ते सांगता येत नाही..पण कधी कधी त्यांना सिनेमाक्षेत्रातल्या महान हस्तींच्या विस्मयकारक व सन्मानजनक पाहुणचाराचा मानही पदरी पडला आहे.हा छंद जोपासताना त्यांना मदत होते ती श्रीनिवास कुलकर्णी या मित्राची..तो वेळातवेळ काढून त्यांना सोबत करतो.     झळकी म्हणाले,अमिताभ बच्चन हे माझे आवडते अभिनेते होते. हा छंद जडल्यावर मला अनामिकपणे त्यांच्यासोबत फोटो काढण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. परंतु, त्यांची भेट मिळणे तितकेसे सोपे नव्हते. पण माज्या आॅफिसमधील राजीव बापट नावाच्या सहकाºयामुळे ही संधी मिळाली. एक दिवस गोरेगाव फिल्म सिटीत श्रेया घोषाल यांना भेटायला गेलो असताना तिथे अनेपेक्षितपणे अमिताभजींच्या सहाय्यकाचा फोन आला व त्यांनी भेटीचे निमंत्रण दिले. तोपर्यंत त्यांच्याशी सहाय्यकाशी फोनवर चर्चा करत होतो. पण जेव्हा महानायक अमिताभजींची भेट घडली आणि त्यांच्यासोबत फोटो मिळाला तो क्षण फक्त ५ मिनिटांच्या आतला असेल. पण तो माज्यासाठी अवाक् करणारा होता. त्यानंतर त्यांची वेगवेगळ््या ठिकाणी कार्यक्रमादरम्यान एकूण चारवेळा भेट झाली. किरण शांताराम व बिग बींसह काढलेला एकत्रित फोटो अविस्मरणीय आठवण आहे. 

एक कटू आठवण सांगताना झळकी यांनी सांगितले,  सुमन कल्याणपूर ज्येष्ठ गायिका  सुमन कल्याणपूरकर यांचा टिळ्रक स्मारक येथे कार्यक्रम होता. त्यादिवशी सकाळपासून त्यांच्यासह फोटो काढायचे मनोमन ठरविले.पण त्यांनी सपशेल नकार देत तुम्ही गाणे ऐकायला आला की फोटो काढायला अशा शब्दांत खरडपट्टी काढली. आजतागायत लता मंगशेकर यांना भेटण्याचा चार ते पाच वेळा योग आला पण त्यांच्यासोबत अद्यापही फोटो आणि सहीच्या प्रतीक्षेत ते आहे. परंतु, याउलट खलनायक म्हणून प्रचलित असलेले रणजित यांना त्यांच्या घरी भेटण्यासाठी गेलो असताना त्यांच्याकडे माज्या अगोदर आलेल्या एका सिनेमा दिग्दर्शकाला थांबवत त्यांनी आम्हांला वेळ दिला. हा माज्यासाठी आश्चयार्चा धक्का होता तर होताच एका खलनायक अभिनेत्याच्या आत वसलेल्या माणसाचे दर्शन घडले. अभय देओल याच्यासोबत फोटो क्लिक करण्यासाठी तर तब्बल १३ तास एका खुर्चीवर बसून राहिलो होतो. असे एक ना अनेक प्रसंगांनी छंद जोमात जपण्याचा प्रयत्न करत आहे.     अचानक कंपनीतून कमी करण्यात आले तेव्हा कुटुंबाच्या उदरनिवार्हाचा प्रश्न उपस्थित झाला. मात्र हार न मानता पुन्हा आपल्या छंदाला व्यावसायिकतेत रुपांतरित करत पूर्णवेळ फोटोग्राफी करण्याचे ठरविले. आता सिनेमाविषयक कार्यक्रम, जुन्या व नव्या गाण्यांवर आधारित संगीत रजनी कार्यक्रमांची फोटोग्राफी करण्याचे काम करतो. तब्बल तीन वेळा सलग तेरा तास फोटोग्राफी केल्याचे ते आवर्जून सांगतात. ...........हल्ली कुठल्याही सेलेब्रिटींचा फोटो काढायचा म्हटलं की दडपण येते. कारण त्यांच्या भोवती असणारे सुरक्षारक्षकांचे कवच त्यांना भेटू देत नाही. पूवीर्चा कलाकारांशी होणारा संवाद कुठेतरी फक्त सेल्फीमध्ये अडकलेला दिसतो. सोशलमीडियामुळे कलाकारांचाही मोकळेपणा दिवसेंदिवस हरवत चालला आहे. सध्या प्रत्येक कलाकार प्रचंड धावपळीत असतो. त्यांच्या पोहचणे ते निघण्यापर्यंतच्या संपूर्ण  वेळेची गणित ठरलेले असताना फोटोसाठी मोठी कसरत करावी लागते. पण ही कसरत आणि होणारी धावपळ दूर व्हायला त्या मान्यवर व्यक्तींसोबत मिळणारा एखादा फोटो आणि काहीक्षण पुरेसे ठरतात.- नागण्णा झळकी.

टॅग्स :PuneपुणेcinemaसिनेमाPoliticsराजकारण