शहरं
Join us  
Trending Stories
1
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
2
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
3
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
4
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
5
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
6
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
7
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
8
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
9
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
10
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
11
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
12
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
13
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
14
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
15
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
16
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
17
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
18
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
19
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
20
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला

११०० मान्यवरांसोबत झळकलेले '' झळकी ''...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2019 07:00 IST

कधी अपमान,तर कधी सन्मान यांच्या हिंदोळ्यावर हातची नोकरी गमावून देखील ते या छंदापासून दूर गेले नाही..

ठळक मुद्देसिनेमाच नव्हे नाटक, संगीत, क्रीडा, राजकारण अशा अनेक क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश

- दीपक कुलकर्णी-पुणे : बालगंधर्व रंगमंदिरात कार्यक्रमासाठी गेले असताना तिथे त्यांनी रंगभूमीचे नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांच्यासोबत फोटो काढला. त्यानंतर त्यांना सेलिब्रेटी लोकांसोबत फोटो काढण्याचा छंदच जडला..मग ऊन, वारा, पाऊस, दिवस रात्र, नोकरी अशी कशाचीही पर्वा न करता ते आजतागायत फक्त धावताहेत ते मान्यवरांच्या फोटोसाठी.. कधी अपमान,तर कधी सन्मान यांच्या हिंदोळ्यावर हातची नोकरी गमावून देखील ते या छंदापासून दूर गेले नाही.. पण ते आजही स्वत:चा छंद सांभाळून आनंदी आहे.

तब्बल ११०० सेलिब्रेटींसोबत त्यांनी फोटो तर काढलेच पण पुन्हा जेव्हा कधी त्यांची भेट झाली तेव्हा कलर प्रिंटवर दिमाखात ऑटोग्राफ देखील घेतात...अशा या छंद वेड्या कलाकाराचे नाव आहे नागेश उर्फ नागण्णा झळकी..   सोलापूर जिल्हयातील नागण्णा नावावरुन आणि त्याला अवगत वाटत असलेल्या भाषेवरुन जरी कर्नाटकी वाटत असले तरी ते महाराष्ट्रीयन असल्याचे छातीठोकपणे सांगतात. त्याचा हा छंद साधारणपणे सहा ते सात वर्षांपूर्वी सुरु झाला. तेव्हापासून ते आत्तापर्यंत फक्त सिनेमाच नव्हे नाटक, संगीत, क्रीडा, राजकारण अशा अनेक क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश आहे. त्यात केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, क्रिेकेटपटू जहीर खान,अजय जडेजा, अभिनेते नाना पाटेकर, भरत जाधव,अनुपम खेर, डॉ .श्रीराम लागू, विक्रम गोखले, गायक जगजित सिंग, पंकज उधास, आशा भोसले, शंकर महादेवन संगीतकार, अनु मलिक, संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा, यांसारख्या तब्बल ११०० मान्यवरांसोबतचा फोटोसंग्रह त्यांच्याकडे आहे.
पण या छंदाची जपणूक करताना नेहमी सहजासहजीच थोर सेलिब्रेटींचे फोटो उपलब्ध होणार असतात. एकतर या लोकांच्या मूडप्रमाणे हे लोक वागतात. त्याचा फटका कधी बसेल ते सांगता येत नाही..पण कधी कधी त्यांना सिनेमाक्षेत्रातल्या महान हस्तींच्या विस्मयकारक व सन्मानजनक पाहुणचाराचा मानही पदरी पडला आहे.हा छंद जोपासताना त्यांना मदत होते ती श्रीनिवास कुलकर्णी या मित्राची..तो वेळातवेळ काढून त्यांना सोबत करतो.     झळकी म्हणाले,अमिताभ बच्चन हे माझे आवडते अभिनेते होते. हा छंद जडल्यावर मला अनामिकपणे त्यांच्यासोबत फोटो काढण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. परंतु, त्यांची भेट मिळणे तितकेसे सोपे नव्हते. पण माज्या आॅफिसमधील राजीव बापट नावाच्या सहकाºयामुळे ही संधी मिळाली. एक दिवस गोरेगाव फिल्म सिटीत श्रेया घोषाल यांना भेटायला गेलो असताना तिथे अनेपेक्षितपणे अमिताभजींच्या सहाय्यकाचा फोन आला व त्यांनी भेटीचे निमंत्रण दिले. तोपर्यंत त्यांच्याशी सहाय्यकाशी फोनवर चर्चा करत होतो. पण जेव्हा महानायक अमिताभजींची भेट घडली आणि त्यांच्यासोबत फोटो मिळाला तो क्षण फक्त ५ मिनिटांच्या आतला असेल. पण तो माज्यासाठी अवाक् करणारा होता. त्यानंतर त्यांची वेगवेगळ््या ठिकाणी कार्यक्रमादरम्यान एकूण चारवेळा भेट झाली. किरण शांताराम व बिग बींसह काढलेला एकत्रित फोटो अविस्मरणीय आठवण आहे. 

एक कटू आठवण सांगताना झळकी यांनी सांगितले,  सुमन कल्याणपूर ज्येष्ठ गायिका  सुमन कल्याणपूरकर यांचा टिळ्रक स्मारक येथे कार्यक्रम होता. त्यादिवशी सकाळपासून त्यांच्यासह फोटो काढायचे मनोमन ठरविले.पण त्यांनी सपशेल नकार देत तुम्ही गाणे ऐकायला आला की फोटो काढायला अशा शब्दांत खरडपट्टी काढली. आजतागायत लता मंगशेकर यांना भेटण्याचा चार ते पाच वेळा योग आला पण त्यांच्यासोबत अद्यापही फोटो आणि सहीच्या प्रतीक्षेत ते आहे. परंतु, याउलट खलनायक म्हणून प्रचलित असलेले रणजित यांना त्यांच्या घरी भेटण्यासाठी गेलो असताना त्यांच्याकडे माज्या अगोदर आलेल्या एका सिनेमा दिग्दर्शकाला थांबवत त्यांनी आम्हांला वेळ दिला. हा माज्यासाठी आश्चयार्चा धक्का होता तर होताच एका खलनायक अभिनेत्याच्या आत वसलेल्या माणसाचे दर्शन घडले. अभय देओल याच्यासोबत फोटो क्लिक करण्यासाठी तर तब्बल १३ तास एका खुर्चीवर बसून राहिलो होतो. असे एक ना अनेक प्रसंगांनी छंद जोमात जपण्याचा प्रयत्न करत आहे.     अचानक कंपनीतून कमी करण्यात आले तेव्हा कुटुंबाच्या उदरनिवार्हाचा प्रश्न उपस्थित झाला. मात्र हार न मानता पुन्हा आपल्या छंदाला व्यावसायिकतेत रुपांतरित करत पूर्णवेळ फोटोग्राफी करण्याचे ठरविले. आता सिनेमाविषयक कार्यक्रम, जुन्या व नव्या गाण्यांवर आधारित संगीत रजनी कार्यक्रमांची फोटोग्राफी करण्याचे काम करतो. तब्बल तीन वेळा सलग तेरा तास फोटोग्राफी केल्याचे ते आवर्जून सांगतात. ...........हल्ली कुठल्याही सेलेब्रिटींचा फोटो काढायचा म्हटलं की दडपण येते. कारण त्यांच्या भोवती असणारे सुरक्षारक्षकांचे कवच त्यांना भेटू देत नाही. पूवीर्चा कलाकारांशी होणारा संवाद कुठेतरी फक्त सेल्फीमध्ये अडकलेला दिसतो. सोशलमीडियामुळे कलाकारांचाही मोकळेपणा दिवसेंदिवस हरवत चालला आहे. सध्या प्रत्येक कलाकार प्रचंड धावपळीत असतो. त्यांच्या पोहचणे ते निघण्यापर्यंतच्या संपूर्ण  वेळेची गणित ठरलेले असताना फोटोसाठी मोठी कसरत करावी लागते. पण ही कसरत आणि होणारी धावपळ दूर व्हायला त्या मान्यवर व्यक्तींसोबत मिळणारा एखादा फोटो आणि काहीक्षण पुरेसे ठरतात.- नागण्णा झळकी.

टॅग्स :PuneपुणेcinemaसिनेमाPoliticsराजकारण