शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

राज्यातील १९० कारखान्यांकडून १०६ लाख टन साखरनिर्मिती; इथेनॉल निर्मितीतही आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 18:22 IST

राज्यात यंदा १०१२ लाख टन ऊसाचे गाळप झाले. १२ लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस होता.

पुणे: राज्यातील १९० साखर कारखान्यांंनी यंदा सरासरी१४० दिवस गाळप करून १०६ लाख टन साखर तयार केली. इथेनॉल निर्मितीमध्येही राज्य आघाडीवर असून केंद्र सरकारचे १०८ कोटी लिटरचे ऊद्दीष्ट कारखान्यांनी पूर्ण केले आहे. 

इथेनॉल विक्रीतून रक्कम रोख मिळाल्याने कारखान्यांना ऊस उत्पादक शेतकर्यांना त्यांच्या ऊसाची रास्त किफायतशीर किंमत (एफ आर पी) देणे शक्य झाले. एकूण ९३ टक्के एफआरपी दिली गेली. १९ कारखान्यांवर सुमारे ४५० कोटी रूपयांची थकबाकी दिली नाही म्हणून जप्तीची कारवाई झाली. आणखी १० कारखान्यांवर कारवाई प्रस्तावित आहे. एकाही ऊस ऊत्पादक शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होणार नाही, यासाठी साखर आयुक्त कार्यालय दक्ष राहणार आहे असे साखर आयूक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले.

इथेनॉल निर्मितीमुळे उतारा कमी झाला. मात्र त्याची किंमत जमेस धरली जाणार असल्याने त्यातून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही असे गायकवाड म्हणाले.

राज्यात यंदा १०१२ लाख टन ऊसाचे गाळप झाले. १२ लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस होता. सर्व ऊस गाळपात आणला गेला. आजमितीस राज्यात कुठेही गाळपासाठी ऊस शिल्लक नाही.सर्वाधिक म्हणजे १८.८८ लाख टन गाळप हातकणंगले ( ता. हुपरी) येथील जवाहर कारखान्याने केले. सर्वाधिक एफआरपी ५२८ कोटी रूपये त्यांनीच दिली. त्यांच्याकडून २२लाख क्विंटल साखर उत्पादित झाली. अर्थ विभागाचे संचालक ज्ञानदेव मुकणे तसेच ऊपपदार्थचे सहसंचालक संजय भोसले, पांडुरंग शेळके (विकास), ऊत्तम इंदलकर (प्रशासन), राजेश सुरवसे (प्रशासन) यावेळी उपस्थित होते. 

कोरोना काळात सामाजिक जबाबदारी धाराशिव कारखान्यांबरोबरच आता आणखी १९ कारखाने ऑक्सिजन निर्मिती करणार आहेत. काही कारखाने लगेच सुरू होणारा ऑक्सिजन प्रकल्प प्रस्तावित करत असून त्याचे पैसेही त्यांनी जमा केले आहेत असे गायकवाड यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेState Governmentराज्य सरकारFarmerशेतकरी