शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
Delhi Red Fort Blast : 'आम्ही दोषींना सोडणार नाही...', दिल्ली स्फोटांवर राजनाथ सिंह यांचा इशारा
3
ऑपरेशन सिंदूर २.० सुरु होणार? दिल्लीतील आत्मघाती स्फोटानंतर मागणी जोर धरू लागली, एकजरी हल्ला झाला तरी... 
4
जैशच्या महिला विंगची 'ती' प्रमुख निघाली; कारमध्ये घेऊन फिरायची AK 47, कोण आहे डॉ. शाहीन शाहीद?
5
"मरे उनके दुश्मन..."; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या वाचून शत्रुघ्न सिन्हांचा राग अनावर
6
Adani Group Companies IPO: विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
7
Delhi Blast : वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहि‍णींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट
8
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
9
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
10
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?
11
भारतासाठी खुशखबर! डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले 50% टॅरिफ कमी करण्याचे संकेत, म्हणाले...
12
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
14
"त्याच्या निधनानंतर माझ्यातली निरागसता...", सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिल भावुक
15
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
16
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
17
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
18
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम
19
प्रेमानंद महाराज सांगतात, 'बुधवारी केस कापल्याने येते धन-समृद्धी आणि टळतो अकाली मृत्यू!'
20
माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी, आजही अगदी तशीच दिसते 90sची अभिनेत्री; ओळखलंत का?

बारामती तालुक्यातील उंडवडी सुपेच्या चारा छावणीत १ हजार जनावरांचा टप्पा पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2019 13:29 IST

जून महिना संपत आला तरी पाऊस पडत नसल्या कारणाने जिरायत पट्ट्यात जनावरांच्या चाऱ्याचे व पाण्याचा प्रश्न फारच गंभीर झाला आहे.

ठळक मुद्देपाऊस नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त : छावणीवरील जनावरांना करणार पाणीपुरवठाबत्तीसाव्या दिवशी १०४७ पर्यंत जनावरे दाखल पावसाच्या लांबणीमुळे अजून जनावरे वाढणार

उंडवडी कडेपठार : बारामती तालुक्यातील उंडवडी सुपे येथे महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून कारभारी अण्णा चॅरिटेबल फाउंडेशन चारा छावणी सुरू करण्यात आली असून, छावणीत दिवसेंदिवस जनावरांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. बत्तीसाव्या दिवशी १०४७ पर्यंत जनावरे दाखल झाली आहेत. जून महिना संपत आला तरी पाऊस पडत नसल्या कारणाने जिरायत पट्ट्यात जनावरांच्या चाऱ्याचे व पाण्याचा प्रश्न फारच गंभीर झाला आहे. आज पाऊस पडेल, उद्या पडेल या आशेवर शेतकरी होता परंतु पाऊस पडण्याची चिन्हेच दिसत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी आपली जनावरे चारा छावणीत दाखल केली आहेत. छावणीत जनावरांना पशुखाद्य व हिरवा चारा तसेच जनावरांना पिण्याच्या पाण्याची सोय योग्य पद्धतीने  होत असल्याचे समाधान शेतकऱ्यांनी व्यक्त केले. जसजसा पाऊस लांबत आहे तस-तसा शेतकऱ्यांना जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न बिकट होत असल्याने बारामती तालुक्यातील जिरायती पट्ट्यातील शेतकरी चारा छावणीकडे धाव घेत आहेत. सध्या चारा छावणीत जनावरांचा आकडा १ हजाराच्या पुढे गेला आहे. पावसाच्या लांबणीमुळे अजून जनावरे वाढणार आहेत.

शेटफळगढे : छत्रपतीच्या मदतीला सोनाई धावणार आहे. छावणीवरील जनावरांना पाणीपुरवठा करण्यास मदत करण्याचे सुतोवाच सोनाई परिवाराचे व जिल्हा परिषदेचे सभापती प्रवीण माने यांनी केले. लाकडी (ता. इंदापूर) येथील छत्रपती कारखान्याने सुरू केलेल्या छावणीला जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे सभापती प्रवीण माने यांनी भेट दिली. या वेळी उपस्थित शेतकऱ्यांकडून पशुधनाच्या दुग्धोत्पादनाची छावणीवर दिल्या जाणाऱ्या सुविधांची माहिती घेतली. यावर उपस्थित शेतकऱ्यांनी दिल्या जाणाऱ्या सुविधांवर समाधान व्यक्त केले. मात्र, या छावणीत जवळपास दीड हजार जनावरे दाखल झाली आहेत. याला सध्या पाणी कमी पडत आहे. यामुळे आणखी एक टँकर देण्याची मागणी शेतकऱ्यांनी या वेळी माने यांच्याकडे केली. यावर माने यांनी सोनाई परिवाराच्या वतीने प्रतिदिन २० हजार लिटर क्षमतेच्या टँकरने पाणीपुरवठा केला जाईल, असे घोषित केले. यावर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. या वेळी बोलताना  माने म्हणाले, की सध्याचा दुष्काळ हा भीषण आहे. इंदापूर तालुक्यात  छत्रपती कारखाना बाजार समिती तसेच सोनाई परिवार यांनी सुरू केलेल्या छावण्यामुळे शेतकऱ्यांना दुष्काळात आधार मिळाला आहे. या वेळी जिल्हा परिषदेचे सदस्य हनुमंत बंडगर, दादा वणवे, महेश वणवे, शेतकरी व कारखान्याचे कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :BaramatiबारामतीFarmerशेतकरीdroughtदुष्काळRainपाऊसWaterपाणी