शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
3
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
4
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
5
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
6
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
7
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
8
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
9
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
10
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
11
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
12
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
13
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
14
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
15
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
16
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
17
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
18
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
19
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
20
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 

"प. बंगालमध्ये काश्मीरपेक्षा वाईट स्थिती", भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार

By मोरेश्वर येरम | Published: December 15, 2020 2:45 PM

राज्यात होणाऱ्या राजकीय हिंसाचाराच्या घटनांवर कडक कारवाई करण्याची भाजपने निवडणूक आयोगाकडे मागणी केलीय.

ठळक मुद्देभाजपची पश्चिम बंगालमधील परिस्थितीवरुन निवडणूक आयोगाकडे धावराजकीय हिंसाचाराच्या घटनांवर कारवाई करण्याची केली मागणीप.बंगालमध्ये तातडीने आचार संहिता लागू करण्याची भाजपची मागणी

नवी दिल्लीपश्चिम बंगालमधील विधानसभा निवडुकीसाठीचं राजकीय वातावरण आता चांगलंच तापू लागलं आहे. भारतीय जनता पक्षाने (भाजप) मंगळवारी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. पश्चिम बंगालमधील परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करत कारवाई करण्याची मागणी भाजपने केली आहे. राज्यात होणाऱ्या राजकीय हिंसाचाराच्या घटनांवर कडक कारवाई करण्यात यावी असं भाजपचं म्हणणं आहे.

पश्चिम बंगालमधील सध्याची परिस्थिती ही काश्मीरपेक्षाही वाईट आहे, असं विधान निवडणूक आयोगाकडे तक्रार करणारे भाजपचे आमदार सब्यासाची दत्ता यांनी केलं आहे.

भाजपने निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात पश्चिम बंगालमधील कायदा-सुव्यवस्था आणि हिंसाचाराचा उल्लेख केला आहे. यात अनेक घटनांची नोंद करण्यात आली आहे. 

>> जे.पी.नड्डा यांच्या ताफ्यावर झालेला हल्ला दुर्दैवी असून पश्चिम बंगाल पोलीस पक्षपात करत आहे.>> पश्चिम बंगाल पोलीस तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते असल्याचं काम करत आहेत.>> राज्यात सुरक्षेच्या कारणास्तव निमलष्करी दलाची नियुक्ती केली जावी. >> राज्य सरकारी कर्मचारीच बैठका घेऊन तृणमूल काँग्रेसचा प्रचार करत आहेत. मग निवडणूक नि:पक्षपातीपणे कशी होईल?>> पश्चिम बंगालमध्ये तातडीने आचारसंहिता लागू करावी.अशा तक्रारी आणि मागण्या भाजपने निवडणूक आयोगाकडे केल्या आहेत. 

भाजपच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोग देखील सक्रीय झालं असून १७ डिसेंबर रोजी आयोगाचे उपायुक्त सुदीप जैन पश्चिम बंगालचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात पश्चिम बंगालमधील परिस्थितीची पाहणी ते करणार आहेत.  

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग