शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

"हे कुठून आले?"; किरीट सोमय्यांचं आकडेवारी बोट, व्होट जिहादबद्दल काय बोलले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 18:34 IST

Maharashtra Latest News: लोकसभा निवडणुकीत व्होट जिहाद करण्यात आला, अशी टीका भाजपा नेत्यांकडून केली जात आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे ...

Maharashtra Latest News: लोकसभा निवडणुकीत व्होट जिहाद करण्यात आला, अशी टीका भाजपा नेत्यांकडून केली जात आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली असून, आयोगाने चौकशी करून कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्यावर आता भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी आकडेवारी मांडत सवाल उपस्थित केला आहे. 

किरीट सोमय्यांनी काही मतदारसंघातील आकडेवारी पोस्ट केली आहे. त्या आकडेवारीवर बोट ठेवत किरीट सोमय्यांनी हे कुठून आले? असा सवाल केला आहे. 

किरीट सोमय्यांचे म्हणणे काय?

"निवडणूक आयोगाने सांगितले मुंबईत गेल्या पाच वर्षात 5% मतदार वाढले. त्यात मालाड मालवणी येथे 22.34% आणि चांदिवली येथे 20.47% मतदार वाढले, हे कुठून आले? लोकसभा निवडणुकीत मालेगाव विधानसभेत 178 बूथमध्ये कॉंग्रेसला 99,053 मते मिळाली, भाजपला फक्त 596 मते मिळाली, याला काय म्हणायचं?", असा सवाल किरीट सोमय्यांनी व्होट जिहादच्या मुद्द्यावर बोलताना केला आहे. 

निवडणूक आयोगाने काय म्हटलेलं आहे?

पत्रकार परिषदेत बोलताना आयोगाचे अधिकारी कुलकर्णी म्हणालेले, "आपल्याकडे अभिव्यक्ती आणि भाषण स्वातंत्र्य आहे. कोणी आपले मते मांडणे, वैयक्तिक किंवा जाहीरपणे या सगळ्याबद्दल आपला कायद्यात काही ना काही म्हटलेलं आहे. कायद्याच्या बाहेर जाणारं विधान कुणी करत असेल, तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल."

"आपण जो प्रश्न विचारला की अमूक हे (व्होट जिहाद शब्द) कायद्याच्या बाहेर जाणार आहे की नाही. याचं उत्तर नक्की काय झालेलं आहे? पुरावे काय आहेत? याच्यावर अवलंबून आहे. आणि कायद्याच्या चौकटीतच हे सिद्ध व्हावं लागतं", असे आयोगाचे अधिकारी म्हणाले आहेत.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४mumbai regionमुंबई विधानसभा निवडणूकKirit Somaiyaकिरीट सोमय्याBJPभाजपाcongressकाँग्रेस