शहरांची नावे बदलून काय होणार?; काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2021 16:46 IST2021-01-01T16:44:45+5:302021-01-01T16:46:17+5:30
भाजपकडून तेढ निर्माण करणारं राजकारण; थोरातांचा आरोप

शहरांची नावे बदलून काय होणार?; काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांचा सवाल
संगमनेर (जि. अहमदनगर) : सर्वसामान्य माणसांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. शहरांची नावे बदलून काय होणार? भारतीय जनता पक्षाचे राजकारण विकासाच्या मुद्द्यांवर नाही. निवडणुका तोंडावर आल्या की त्यांच्याकडून भावनिक मुद्दा पुढे करत समाजात तेढ निर्माण करणारे विषय पुढे आणले जातात.,अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.
संगमनेरातील यशोधन जनसंपर्क कार्यालयात शुक्रवारी ( १ जानेवारी) पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे यावेळी उपस्थित होत्या.