शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
5
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
6
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
7
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
8
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
9
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
10
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
11
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
12
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
13
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
14
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
15
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
16
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
17
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
18
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
19
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
20
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल

Video: “देशात नव्या राजकीय समीकरणाची सुरुवात; जे महाराष्ट्रात घडलं नाही ते बिहारमध्ये घडवू”

By प्रविण मरगळे | Published: September 28, 2020 3:52 PM

आपण सगळे एकत्र येऊन या निवडणुकीत सरकार पाडू शकतो. या बिहार निवडणुकीत एनडीएचा पराभव करणे हेच आमचं उद्दिष्ट आहे असंही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

ठळक मुद्देबिहारमध्ये मुस्लीम, आंबेडकरवादी, आदिवासी मिळून ४० टक्के लोकसंख्या आहे.आपण सगळे एकत्र येऊन या निवडणुकीत सरकार पाडू शकतो. बिहार निवडणुकीत एनडीएचा पराभव करणे हेच आमचं उद्दिष्ट आहे

मुंबई – बिहार विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजल्यानंतर आता प्रत्येक राजकीय पक्षाने दंड थोपटले आहेत. कोरोना आणि लॉकडाऊन काळातील ही पहिलीच निवडणूक असल्याने सगळ्यांचे याकडे लक्ष आहे. यातच वंचित बहुजन आघाडीनेही बिहार निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. जे महाराष्ट्रात घडलं नाही ते बिहारमध्ये होऊ शकतं असं सांगत वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएमला साद दिली आहे.

याबाबत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, देशभरात नव्या राजकीय समीकरणाची सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात एमआयएमसोबत आम्ही लोकसभा निवडणुकीत लढलो, त्यात एक जागा एमआयएमला मिळाली, विधानसभा निवडणुकीत हे समीकरण चाललं असतं परंतु जागावाटपावरुन दोघांमध्ये तडजोड झाली नाही, एमआयएमने १०० जागा मागितल्या, त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळाला, आता बिहार निवडणुका आहेत, जे महाराष्ट्रात झाले नाही ते बिहारमध्ये होऊ शकते असं त्यांनी म्हटलं आहे.

तसेच बिहारमध्ये मुस्लीम, आंबेडकरवादी, आदिवासी मिळून ४० टक्के लोकसंख्या आहे. इतक्या मोठ्या जनाधाराने कोणत्याही सरकारला पाडू शकतो. हे सरकार नागरिकता आणि आरक्षणाच्या विरोधात आहे. मौलवी, मौलाना यासह जे शिक्षित मुसलमान आहेत त्यांनी याबाबत विचार करायला हवा. आपण सगळे एकत्र येऊन या निवडणुकीत सरकार पाडू शकतो. या बिहार निवडणुकीत एनडीएचा पराभव करणे हेच आमचं उद्दिष्ट आहे असंही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

बिहारमध्ये दिवाळीपूर्वीच 'फटाके फुटणार

बिहार विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजले असून निवडणूक आयोगाने तारखांची घोषणा केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी विधानसभेच्या २४३ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीसाठी तारखांची घोषणा केली. त्यानुसार, बिहारमधील विधानसभा निवडणुका तीन टप्प्यात होणार असून २८ ऑक्टोबर रोजी मतदानाचा पहिला टप्पा पार पडणार आहे. तर, निवडणुकांचा निकाल १० नोव्हेंबर रोजी लागणार आहे. म्हणजेच दिवाळीपूर्वीच बिहारमध्ये फटाके फुटणार आहेत.

बिहार विधानसभेचा कार्यकाळ २९ नोव्हेंबरला संपणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकांची प्रक्रिया २९ नोव्हेंबरपूर्वीच संपणार आहे. राज्यात २८ ऑक्टोबर रोजी मतदानाचा पहिला टप्पा पार पडणार असून ३ नोव्हेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान घेण्यात येईल. निवडणुकांचा अंतिम टप्पा ७ नोव्हेंबर रोजी पडणार असून ३ दिवसांत म्हणजेच १० नोव्हेंबर रोजी निवडणुकांचा निकाल लागणार आहे. त्यामुळे, दिवाळीपूर्वीच बिहारमध्ये कोणत्या पक्षाचे सरकार स्थापन होणार, हे स्पष्ट होणार आहे. दिवाळीपूर्वीच मतदार आणि उमेदवारांची दिवाळी साजरी होणार आहे. देशात १४ नोव्हेंबर रोजी दिवाळीला सुरूवात होत आहे.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूक 2020Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन