शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
2
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
3
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
5
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
6
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
7
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
8
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
9
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
10
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
11
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
12
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
13
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
14
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
15
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
16
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
17
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
18
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
19
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
20
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
Daily Top 2Weekly Top 5

“जो जनतेचं म्हणणं ऐकून घेत नाही, त्याला हुकुमशहा म्हणतात”; भाजप नेत्याचा मोदींना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2021 11:26 IST

राजस्थानमधील भाजप प्रदेशाध्यक्षांवर नाराज असलेला गट पक्षालाच घरचा आहेर देताना पाहायला मिळत आहे.

ठळक मुद्देराजस्थानमधील भाजप नेत्याचा पक्षाला घरचा आहेरपंतप्रधान मोदी आणि भाजपच्या धोरणांवर टीकास्त्रकेंद्राच्या कृषी कायद्यात अनेक त्रुटी असल्याचा दावा

जयपूर: गेल्या काही दिवसांपासून राजस्थान भाजपमधील अंतर्गत धुसपूस चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळत असून, वसुधंरा राजे समर्थक अधिक आक्रमत होत असल्याची राजकीय चर्चा जोर धरू लागली आहे. राजस्थानमधील भाजप प्रदेशाध्यक्षांवर नाराज असलेला गट पक्षालाच घरचा आहेर देताना पाहायला मिळत आहे. एवढेच नव्हे तर, जो जनतेचं म्हणणं ऐकून घेत नाही, त्याला हुकुमशहा म्हणतात, असा अप्रत्यक्ष टोला भाजप नेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला आहे. (vasundhara raje loyalists rohitashav sharma criticized pm modi and bjp over party decision)

मी कुणालाही घाबरत नाही. चुकीचे चाललेय त्याविरोधात बोलायला हवे. कारण यामुळे पक्षाचे नुकसान होत आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने राज्यांवर नेतृत्व लादले. जिथे जिथे नेते लादण्यात आले, तिथे तिथे भाजपचे सरकार गेले. जो जनतेचं म्हणणं ऐकून घेत नाही, त्याला हुकुमशहा म्हणतात, असा टोला वसुंधरा राजे गटातील नेते रोहिताश्व शर्मा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला आहे. त्यांना पक्ष शिस्तीचा भंग केल्याप्रकरणी सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. 

रतन टाटांनी गुंतवणूक केलेल्या Generic Aadhaar ची फ्रेंचायजी घ्या; गुंतवणूक छोटी, नफा मोठा!

त्यांचा तो गैरसमज आहे, स्वप्न पूर्ण होणार नाही

तीन वर्ष प्रदेशाध्यक्ष राहिल्यामुळे मुख्यमंत्री बनतील, असा गैरसमज सतीश पुनिया यांचा झाला आहे. मात्र, त्यांचे स्वप्न पूर्ण होणार नाही. पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने ज्या राज्यांवर नेतृत्व लादले, तिथे भाजपला सत्ता गमवावी लागली. त्यामुळे जनतेच्या हिताचे काम करणाऱ्या स्थानिक नेतृत्वाकडे सुत्रे द्यायला हवीत. तेव्हाच राज्यांमध्ये भाजपची सरकारे येऊ शकतात, असे रोहिताश्व शर्मा यांनी म्हटले आहे. 

नोकरीची सुवर्ण संधी! TCS, Infosys, Wipro एक लाख कर्मचाऱ्यांची करणार भरती

केंद्राच्या कृषी कायद्यात अनेक त्रुटी

केंद्राच्या कृषी कायद्यात अनेक त्रुटी आहेत. ज्या देशातील शेतकरी सुखी असतो, तो देश प्रगती करतो. एमएसपीमध्येही बदल करण्याची गरज आहे. ही धोरण कॉर्पोरेट्स हाऊसच्या हिताचीच आहेत. सरकारने कोणतेही धोरण ठरवताना त्याच्याशी संबंधित लोकांशी चर्चा केली पाहिजे. सरकारने पुढे यावे आणि शेतकऱ्यांशी चर्चा करावी, असे सांगत रस्त्यावर सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन थांबवावे, असे आवाहन शर्मा यांनी केले आहे. 

“टाटा, अंबानी, बिर्लांच्या बँक बॅलन्सशी सामान्यांचा काय संबंध, तो लोकांना कळायला हवा का?”

दरम्यान, आम्हीदेखील पक्षाचेच कार्यकर्ते आहोत. आम्ही पक्षाच्या विरोधात नाही. नेतृत्वाला बाजूला सारून निवडणुका लढता येऊ शकतात का, वसुंधरा राजे यांना हटवून निवडणुका लढता येतील का, अशी विचारणा करत ३ महिन्यांनंतर वसुंधरा राजे टेक ओव्हर करतील, त्यांना कुणीही रोखू शकत नाही, असे रोहिताश्व शर्मा यांनी म्हटल्याचा एक ऑडिओ अलीकडेच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.  

टॅग्स :PoliticsराजकारणRajasthanराजस्थानBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहा