शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
2
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
3
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
6
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
7
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
8
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
9
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
10
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
11
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
12
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
13
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
14
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
15
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
16
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
17
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
18
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
19
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
20
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना

“जो जनतेचं म्हणणं ऐकून घेत नाही, त्याला हुकुमशहा म्हणतात”; भाजप नेत्याचा मोदींना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2021 11:26 IST

राजस्थानमधील भाजप प्रदेशाध्यक्षांवर नाराज असलेला गट पक्षालाच घरचा आहेर देताना पाहायला मिळत आहे.

ठळक मुद्देराजस्थानमधील भाजप नेत्याचा पक्षाला घरचा आहेरपंतप्रधान मोदी आणि भाजपच्या धोरणांवर टीकास्त्रकेंद्राच्या कृषी कायद्यात अनेक त्रुटी असल्याचा दावा

जयपूर: गेल्या काही दिवसांपासून राजस्थान भाजपमधील अंतर्गत धुसपूस चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळत असून, वसुधंरा राजे समर्थक अधिक आक्रमत होत असल्याची राजकीय चर्चा जोर धरू लागली आहे. राजस्थानमधील भाजप प्रदेशाध्यक्षांवर नाराज असलेला गट पक्षालाच घरचा आहेर देताना पाहायला मिळत आहे. एवढेच नव्हे तर, जो जनतेचं म्हणणं ऐकून घेत नाही, त्याला हुकुमशहा म्हणतात, असा अप्रत्यक्ष टोला भाजप नेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला आहे. (vasundhara raje loyalists rohitashav sharma criticized pm modi and bjp over party decision)

मी कुणालाही घाबरत नाही. चुकीचे चाललेय त्याविरोधात बोलायला हवे. कारण यामुळे पक्षाचे नुकसान होत आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने राज्यांवर नेतृत्व लादले. जिथे जिथे नेते लादण्यात आले, तिथे तिथे भाजपचे सरकार गेले. जो जनतेचं म्हणणं ऐकून घेत नाही, त्याला हुकुमशहा म्हणतात, असा टोला वसुंधरा राजे गटातील नेते रोहिताश्व शर्मा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला आहे. त्यांना पक्ष शिस्तीचा भंग केल्याप्रकरणी सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. 

रतन टाटांनी गुंतवणूक केलेल्या Generic Aadhaar ची फ्रेंचायजी घ्या; गुंतवणूक छोटी, नफा मोठा!

त्यांचा तो गैरसमज आहे, स्वप्न पूर्ण होणार नाही

तीन वर्ष प्रदेशाध्यक्ष राहिल्यामुळे मुख्यमंत्री बनतील, असा गैरसमज सतीश पुनिया यांचा झाला आहे. मात्र, त्यांचे स्वप्न पूर्ण होणार नाही. पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने ज्या राज्यांवर नेतृत्व लादले, तिथे भाजपला सत्ता गमवावी लागली. त्यामुळे जनतेच्या हिताचे काम करणाऱ्या स्थानिक नेतृत्वाकडे सुत्रे द्यायला हवीत. तेव्हाच राज्यांमध्ये भाजपची सरकारे येऊ शकतात, असे रोहिताश्व शर्मा यांनी म्हटले आहे. 

नोकरीची सुवर्ण संधी! TCS, Infosys, Wipro एक लाख कर्मचाऱ्यांची करणार भरती

केंद्राच्या कृषी कायद्यात अनेक त्रुटी

केंद्राच्या कृषी कायद्यात अनेक त्रुटी आहेत. ज्या देशातील शेतकरी सुखी असतो, तो देश प्रगती करतो. एमएसपीमध्येही बदल करण्याची गरज आहे. ही धोरण कॉर्पोरेट्स हाऊसच्या हिताचीच आहेत. सरकारने कोणतेही धोरण ठरवताना त्याच्याशी संबंधित लोकांशी चर्चा केली पाहिजे. सरकारने पुढे यावे आणि शेतकऱ्यांशी चर्चा करावी, असे सांगत रस्त्यावर सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन थांबवावे, असे आवाहन शर्मा यांनी केले आहे. 

“टाटा, अंबानी, बिर्लांच्या बँक बॅलन्सशी सामान्यांचा काय संबंध, तो लोकांना कळायला हवा का?”

दरम्यान, आम्हीदेखील पक्षाचेच कार्यकर्ते आहोत. आम्ही पक्षाच्या विरोधात नाही. नेतृत्वाला बाजूला सारून निवडणुका लढता येऊ शकतात का, वसुंधरा राजे यांना हटवून निवडणुका लढता येतील का, अशी विचारणा करत ३ महिन्यांनंतर वसुंधरा राजे टेक ओव्हर करतील, त्यांना कुणीही रोखू शकत नाही, असे रोहिताश्व शर्मा यांनी म्हटल्याचा एक ऑडिओ अलीकडेच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.  

टॅग्स :PoliticsराजकारणRajasthanराजस्थानBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहा