शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
2
तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
3
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
4
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
5
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार
6
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
7
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
8
SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद
9
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
10
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
11
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
12
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
13
'माझिया प्रियाला प्रीत कळेना' विषयी अभिजीतचा मोठा खुलासा; म्हणाला, 'तुम्ही संधी दिली पण...'
14
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
15
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
16
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
17
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
18
Narmada Pushkaram 2024: नुसत्या दर्शनानेही पापमुक्ती देणारी नर्मदा मैय्या; १ मे पासून सुरु होत आहे पुष्करम पर्व!
19
Narmada Pushkaram 2024: नर्मदा पुष्करम पर्वाच्या कालावधीत म्हणा नर्मदा स्तोत्र; होईल अपार लाभ!
20
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?

"वाजपेयींच्या एनडीएमध्ये ३३ पक्ष होते पण त्याला कुणी अनैतिक नाही म्हटले’’ शिवसेनेचा भाजपाला टोला

By बाळकृष्ण परब | Published: November 29, 2020 6:59 PM

Sanjay raut : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यावर भाजपाने हे सरकार अनैतिक असल्याचा आरोप केला होता.

ठळक मुद्देमाजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये वेगवेगळी विचारसरणी असलेल्या ३३ पक्षांची आघाडी होती त्या आघाडीला कुणी अनैतिक म्हटले नव्हतेकोरोना विषाणू, लॉकडाऊन, पूर आणि निसर्ग चक्रीवादळ अशी संकटे आले नसती तर राज्य सरकारने महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलला असता

मुंबई - युती तुटल्यापासून शिवसेना आणि भाजपामध्ये सुरू असलेलं वाकयुद्ध आता दिवसागणित अधिकाधित तीव्र होत चाललं आहे. शनिवारी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यावर भाजपाने हे सरकार अनैतिक असल्याचा आरोप केला होता. भाजपाच्या या आरोपाला आता शिवसेनेकडून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये वेगवेगळी विचारसरणी असलेल्या ३३ पक्षांची आघाडी होती, पण त्या आघाडीला कुणी अनैतिक म्हटले नव्हते, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या रूपात सत्तेवर असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि कांग्रेस यांच्या आघाडीचा अस्वाभाविक आणि अनैतिक असा उल्लेख भाजपाने केला होता. त्यावर पलटवार करताना संजय राऊत म्हणाले की, अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये ३३ वेगवेगळ्या विचारसरणी असलेल्या पक्षांची आघाडी होती. मात्र त्या आघाडीला कुणी अनैतिक म्हटले नव्हते.जर कोरोना विषाणू, लॉकडाऊन, पूर आणि निसर्ग चक्रीवादळ अशी संकटे आले नसती तर राज्य सरकारने महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलला असता. अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या छत्राखाली ३३ राजकीय पक्षांची आघाडी होती. आणि सर्वांची विचारसरणी वेगवेगळी होती. मात्र त्यावर कुणी प्रश्न उपस्थित केले नव्हते.दरम्यान, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकारवर जोरदार टीका केली होती. हे सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग, शेतकऱ्यांचे मुद्दे आणि विकास प्रकल्प अशा सर्व आघाड्यांवर सरकारला अपयश आले आहे.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाBJPभाजपाAtal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीPoliticsराजकारण