शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
6
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
7
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
8
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
9
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
10
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
11
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
12
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

भाजपा कापणार उत्तर प्रदेशातील किमान निम्म्या खासदारांची तिकिटे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2019 06:09 IST

लोकांमध्ये नाराजी; काहींचे मतदारसंघ बदलण्याचा प्रयत्न

लखनौ : भाजपाच्याउत्तर प्रदेशातील निम्म्यांहून अधिक खासदारांना यावेळी उमेदवारी दिली जाणार नाही वा काहींचे मतदारसंघच बदलतील, असे सांगण्यात येत आहे. या खासदारांनी मतदारसंघाशी संपर्क ठेवला नाही, मतदारसंघातील कामे नीट केली नाहीत, असे भाजपाने केलेल्या सर्वेक्षणातून आढळून आले असून, त्याचा फटका निवडणुकीत बसण्याची भीती भाजपाला वाटत आहे, असे समजते. त्यामुळेच भाजपाने हा निर्णय घेण्याचे ठरवले असल्याची चर्चा आहे.यंदा लोकसभेसाठी बसपा,सपा व रालोद यांची आघाडी झाली आहे. या आघाडीने काँग्रेससाठी अमेठी व रायबरेली या दोनच जागा सोडल्या आहेत. ही आघाडी आपल्याला चांगलाच त्रास देऊ शकेल, असे भाजपा नेत्यांना वाटत आहे. त्यातच निम्म्यांहून अधिक खासदारांची कामगिरी चांगली नाही, असे सर्व्हेतून दिसून आल्याने ते पराभूत होण्याची भीती भाजपाला वाटत आहे. यावर उपाय म्हणून अशा मतदारसंघांत नवे चेहरे देण्याचा विचार पक्षात सुरू आहे.गेल्या निवडणुकांत उत्तर प्रदेशात ८0 पैकी ७१ जागा भाजपाने जिंकल्या होत्या. त्या पक्षासमवेत असलेल्या अपना दलाला दोन जागा मिळाल्या होत्या. बसपाच्या सर्वेसर्वा मायावती याही पराभूत झाल्या होत्या. पण नंतरच्या पोटनिवडणुकांत भाजपाची कामगिरी अतिशय वाईट होती. सपा-बसपा-काँग्रेसने लोकसभा व विधानसभा पोटनिवडणुकांत भाजपा उमेदवारांचा पराभव केला. आपण एकत्र आल्यास भाजपाचा पराभव शक्य आहे, हे लक्षात आल्यानेच सपा व बसपा एकत्र आले आहेत. ३५ खासदारांची कामगिरी चांगली नसून, लोक त्यांच्यावर नाराज वा संतप्त आहेत, असा अहवाल आहे. अशांना उमेदवारी दिल्यास अधिकच अडचण होईल, असे भाजपाला वाटते.काँग्रेसचे नव्याने प्रयत्नभाजपाची ही स्थिती पाहून, काँग्रेसनेही सपा-बसपा आघाडीशी जुळवून घेण्याच्या दृष्टीने पावले उचलायला सुरुवात केली आहे. या आघाडीने आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी व यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या मतदारसंघांतच उमेदवार उभे न करण्याचे ठरविले आहे.याखेरीज १८ ते २0 जागा सपा-बसपा आघाडीने आपल्यासाठी सोडाव्यात, असा काँग्रेसचा प्रयत्न आहे. उत्तर प्रदेशात सर्वत्र तिरंगी लढती झाल्यास काही मतदारसंघांमध्ये तरी त्याचा फायदा भाजपाला होऊ शकेल, हे सपा-बसपा नेत्यांच्या मनावर बिंबवण्याचे प्रयत्न काँग्रेस करीत आहे.तिरंगी लढतीमुळे सपा-बसपाचे काही उमेदवार पडतीलच, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. तिरंगी लढती आघाडी वा काँग्रेसला मारक ठरतील. त्याचा अधिक फटका सपा-बसपाला बसू शकतो, असे काँग्रेस नेत्याने सांगितले. त्यामुळेच नव्याने जुळवाजुळवीचे प्रयत्न सुरू केले आहेत, असे तो म्हणाला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Uttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपाcongressकाँग्रेसSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टी