शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा कापणार उत्तर प्रदेशातील किमान निम्म्या खासदारांची तिकिटे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2019 06:09 IST

लोकांमध्ये नाराजी; काहींचे मतदारसंघ बदलण्याचा प्रयत्न

लखनौ : भाजपाच्याउत्तर प्रदेशातील निम्म्यांहून अधिक खासदारांना यावेळी उमेदवारी दिली जाणार नाही वा काहींचे मतदारसंघच बदलतील, असे सांगण्यात येत आहे. या खासदारांनी मतदारसंघाशी संपर्क ठेवला नाही, मतदारसंघातील कामे नीट केली नाहीत, असे भाजपाने केलेल्या सर्वेक्षणातून आढळून आले असून, त्याचा फटका निवडणुकीत बसण्याची भीती भाजपाला वाटत आहे, असे समजते. त्यामुळेच भाजपाने हा निर्णय घेण्याचे ठरवले असल्याची चर्चा आहे.यंदा लोकसभेसाठी बसपा,सपा व रालोद यांची आघाडी झाली आहे. या आघाडीने काँग्रेससाठी अमेठी व रायबरेली या दोनच जागा सोडल्या आहेत. ही आघाडी आपल्याला चांगलाच त्रास देऊ शकेल, असे भाजपा नेत्यांना वाटत आहे. त्यातच निम्म्यांहून अधिक खासदारांची कामगिरी चांगली नाही, असे सर्व्हेतून दिसून आल्याने ते पराभूत होण्याची भीती भाजपाला वाटत आहे. यावर उपाय म्हणून अशा मतदारसंघांत नवे चेहरे देण्याचा विचार पक्षात सुरू आहे.गेल्या निवडणुकांत उत्तर प्रदेशात ८0 पैकी ७१ जागा भाजपाने जिंकल्या होत्या. त्या पक्षासमवेत असलेल्या अपना दलाला दोन जागा मिळाल्या होत्या. बसपाच्या सर्वेसर्वा मायावती याही पराभूत झाल्या होत्या. पण नंतरच्या पोटनिवडणुकांत भाजपाची कामगिरी अतिशय वाईट होती. सपा-बसपा-काँग्रेसने लोकसभा व विधानसभा पोटनिवडणुकांत भाजपा उमेदवारांचा पराभव केला. आपण एकत्र आल्यास भाजपाचा पराभव शक्य आहे, हे लक्षात आल्यानेच सपा व बसपा एकत्र आले आहेत. ३५ खासदारांची कामगिरी चांगली नसून, लोक त्यांच्यावर नाराज वा संतप्त आहेत, असा अहवाल आहे. अशांना उमेदवारी दिल्यास अधिकच अडचण होईल, असे भाजपाला वाटते.काँग्रेसचे नव्याने प्रयत्नभाजपाची ही स्थिती पाहून, काँग्रेसनेही सपा-बसपा आघाडीशी जुळवून घेण्याच्या दृष्टीने पावले उचलायला सुरुवात केली आहे. या आघाडीने आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी व यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या मतदारसंघांतच उमेदवार उभे न करण्याचे ठरविले आहे.याखेरीज १८ ते २0 जागा सपा-बसपा आघाडीने आपल्यासाठी सोडाव्यात, असा काँग्रेसचा प्रयत्न आहे. उत्तर प्रदेशात सर्वत्र तिरंगी लढती झाल्यास काही मतदारसंघांमध्ये तरी त्याचा फायदा भाजपाला होऊ शकेल, हे सपा-बसपा नेत्यांच्या मनावर बिंबवण्याचे प्रयत्न काँग्रेस करीत आहे.तिरंगी लढतीमुळे सपा-बसपाचे काही उमेदवार पडतीलच, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. तिरंगी लढती आघाडी वा काँग्रेसला मारक ठरतील. त्याचा अधिक फटका सपा-बसपाला बसू शकतो, असे काँग्रेस नेत्याने सांगितले. त्यामुळेच नव्याने जुळवाजुळवीचे प्रयत्न सुरू केले आहेत, असे तो म्हणाला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Uttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपाcongressकाँग्रेसSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टी