शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
7
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
10
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
11
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
12
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
13
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
14
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
15
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
16
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
17
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
18
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
19
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
20
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

"भाजपा हा दिवाळी नाही तर जनतेचं दिवाळं काढणारा पक्ष", अखिलेश यादवांचा हल्लाबोल  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2020 08:47 IST

Akhilesh Yadav And BJP : अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत बसपा नेते कैलास नाथ सिंह यादव यांच्यासह अनेक नेते समाजवादी पार्टीत दाखल झाले.

लखनऊ - उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीला अद्याप बराच कालावधी बाकी आहे. मात्र आतापासून राजकारण तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. समाजवादी पार्टीने (सपा) पुन्हा एकदा बहुजन समाज पक्षाला (बसपा) झटका दिला आहे. 'सपा'चे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्या उपस्थितीत बसपा नेते कैलास नाथ सिंह यादव यांच्यासह अनेक नेते समाजवादी पार्टीत दाखल झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, कैलासनाथ सिंह यादव यांच्या व्यतिरिक्त बाळकुमार पटेल, कैसर जहां, सुनील यादव, काँग्रेस नेते राम सिंह पटेल, रमेश राही, जास्मीन अन्सारी, अशफाक खान, जेडीयू नेते अरविंद सिंह पटेल, आशिष मिश्रा यांच्यासह अनेकांनी 'सपा'मध्ये प्रवेश केला आहे. यावेळी अखिलेश यादव यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "भाजपा दिवाळी साजरी करत नाही, तर जनतेला दिवाळखोरीत काढते. उत्तर प्रदेशात कोणत्याही प्रकारे सरकार स्थापन करण्यासाठी भाजपाने नोटबंदी केली होती. भाजपाने देशातील जनतेची निराशा केली आणि विश्वासघात केला" असं अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेले अनेक मजूर देशातील विविध भागात अडकून पडले होते. दरम्यान, लॉकडाऊनच्या अटीशर्थींमध्ये सूट देऊन मजुरांना घरी परतण्याची सशर्त परवानगी देण्यात आली. त्यानंतर  विविध राज्यांची सरकारे आपल्या राज्यातील मजुरांना परत आणण्यासाठी काम सुरू केले. केंद्रीय गृह मंत्रालयाने 'श्रमिक स्पेशल ट्रेन' सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला. मजूर, विद्यार्थी, पर्यटक, तीर्थस्थळांवर अडकलेले यात्रेकरू या विशेष ट्रेनने घरी पोहोचले. मात्र याच दरम्यान ट्रेन तिकिटासाठी लागणाऱ्या पैशावरून विरोधकांनी मोदी सरकारला घेरलं होतं.

'असहाय्य मजुरांकडून पैसे घेणं लज्जास्पद'; अखिलेश यादव यांचं मोदी सरकारवर टीकास्त्र

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी याआधी काही महिन्यांपूर्वी तिकिटासाठी येणाऱ्या खर्चावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. असहाय्य मजुरांकडून पैसे घेणं लज्जास्पद असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. अखिलेश यांनी ट्विरवरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला होता. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी एक ट्वीट केलं होतं. 'रेल्वेद्वारे घरी परतणाऱ्या गरीब, असहाय्य मजुरांकडून भाजपा सरकारद्वारे पैसे घेण्याची बातमी लज्जास्पद आहे. भांडवलदारांचे कोट्यवधी रुपये माफ करणारी भाजपा श्रीमंतांच्या सोबत आणि गरीबांच्या विरुद्ध आहे, हे आज उघड झालं. संकटसमयी शोषण सावकार करतात, सरकार नाही' असं ट्विट अखिलेश यादव यांनी केलं होतं.

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेशSamajwadi Partyसमाजवादी पार्टी