शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

डॉ. सुनील देशमुखांच्या घरवापसीने आमदारांमध्ये अस्वस्थता; मतदारसंघाचे गणित बिघडण्याची धाकधूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2021 08:11 IST

भाजपमध्ये गेल्यानंतर सुनील देशमुख यांनी अमरावतीत ७ नगरसेवकांपासून ४५ नगरसेवकांपर्यंत भाजपचा विस्तार केला. पण, कोणती पदे कोणाला द्यायची यासाठी नागपूरला विचारावे लागत असे. पक्षाच्या कोअर बैठकीमध्ये फारसे स्थान नव्हते.

अतुल कुलकर्णी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : माजी राज्यमंत्री, काँग्रेस पक्ष संघटनेचा मोठा अनुभव असणारे व नाराजी नाट्यातून भाजपवासी झालेले डॉ. सुनील देशमुख पुन्हा काँग्रेसमध्ये परत येत आहेत. मात्र, यामुळे काँग्रेसमधील विद्यमान आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. ज्या ठिकाणी सध्या काँग्रेसचे आमदार आहेत त्याच ठिकाणी अन्य पक्षातील नेत्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यामुळे त्या-त्या मतदारसंघांचे राजकीय गणित बिघडणार नाही का? असे सवाल होऊ लागले आहेत. 

भाजपमध्ये गेल्यानंतर सुनील देशमुख यांनी अमरावतीत ७ नगरसेवकांपासून ४५ नगरसेवकांपर्यंत भाजपचा विस्तार केला. पण, कोणती पदे कोणाला द्यायची यासाठी नागपूरला विचारावे लागत असे. पक्षाच्या कोअर बैठकीमध्ये फारसे स्थान नव्हते. कोअर टीमची बैठक सुरू असताना बैठकीत गेलो तर आपल्या देखत विषय बदलले जातात, अशी खंत देशमुख यांनी काही नेत्यांकडे बोलून दाखवल्याचे वृत्त होते. या पार्श्वभूमीवर देशमुख यांना विचारले असता ते म्हणाले, आपण आपल्या मूळ पक्षात परत येत आहोत याचा जास्त आनंद आहे. भाजपमध्ये फडणवीस, गडकरी यांनी कधीही वाईट वागवले नाही. मात्र, प्रत्येक गोष्ट विचारुन करण्यामुळे कार्यकर्त्यांची नाराजी होऊ लागली. पण, पक्ष सोडताना मनात कटुता नाही, असेही ते म्हणाले. 

उमेदवारीविषयी श्रेष्ठींचा निर्णय मान्य - देशमुखआपल्या मतदारसंघात काँग्रेसच्याच विद्यमान आमदार आहेत, तेव्हा आपली लढत कोणाशी होणार? यावर देशमुख म्हणाले, विधानसभेच्या निवडणुकीला आणखी तीन वर्ष बाकी आहेत. त्यामुळे त्यावर आत्ताच काही भाष्य करणे योग्य होणार नाही. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल.

विधानसभा मीच लढवणारवेगवेगळ्या लोकांना घेऊन पक्ष मजबूत करणे हे पक्षाचे धोरण आहे. मी आणि देशमुख एकमेकांच्या विरोधात लढलो. त्यांचा मी १८ हजार मतांनी पराभव केला होता. देशमुख यांच्या पक्ष प्रवेशाबद्दल मी त्यांचे स्वागत करते, पण विधानसभा मीच लढवणार.     - आ. सुलभा खोडके, अमरावती

निवडून आलेल्या आमदारांना त्रास होणार नाही. देशमुख यांना पक्षात घेताना त्यांच्यासाठी वेगळा विचार केला आहे. मुकुल वासनिक यांच्यासारखे नेते त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत होते. संघटनेत त्यांना जबाबदारी दिली जाईल.  

- नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष  

टॅग्स :Sunil Deshmukhसुनिल देशमुखcongressकाँग्रेसMLAआमदार