शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

...त्यावेळी अनेकांनी दिला होता भाजप सोडण्याचा सल्ला; नितीन गडकरींनी सांगितला 'तो' किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2021 17:52 IST

कोरोना संकटावर भाष्य करताना गडकरींनी सांगितला चार दशकांपूर्वीचा किस्सा

मुंबई: धडाकेबाज निर्णय, अफाट कार्यक्षमता यामुळे केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते नितीन गडकरी कायम चर्चेच असतात. कोरोना लढ्याचं नेतृत्त्व गडकरींकडे सोपवा, अशी मागणी काही दिवसांपूर्वीच भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामींनी केली. त्यामुळे गडकरी पुन्हा चर्चेत आले. सर्वच पक्षांमध्ये गडकरी यांचे उत्तम संबंध आहेत. गडकरी यांच्या कार्यक्षमतेमुळे त्यांची टास्कमास्टर अशी ओळख आहे. मात्र एक काळ असा होता की नितीन गडकरींना अनेकांनी पक्ष सोडण्याचा सल्ला दिला होता. खुद्द गडकरींनीच हा प्रसंग देशातील विविध कुलगुरुंशी संवाद साधताना सांगितला.काँग्रेसचा बडा नेता म्हणतो, "नरेंद्र मोदींना सोयरसुतक नाही; नितीन गडकरी पंतप्रधान हवेत"कोरोना परिस्थितीचा सामना करताना आपल्याला संकटांना तोंड द्यायचं आहे. आपल्याला हा लढा लढायचा आहे असं म्हणताना गडकरींनी १९८० मधील एक आठवण सांगितली. “मी विद्यार्थी परिषदेमधून भाजपमध्ये आलो. १९८० चा कालवधी होता. अटलजी निवडणूक हरले होते. आमच्या पक्षाची परिस्थिती बिकट होती. तेव्हा सर्वजण निराश होते. जनता पार्टीनंतर एवढा मोठा पराभव झाल्यानं अटलजी, अडवाणीजींना काही भविष्य नाही. या पक्षालाही काही भविष्य नाही. हा पक्ष संपला आहे. या पक्षाला काही आधार नाही, अशी टीका करण्यास पत्रकारांनी सुरुवात केली होती,'  असं गडकरींनी सांगितलं.“नितीन गडकरी काय सांगतात, हे त्यांचे बॉस ऐकतायत का?” काँग्रेसची विचारणा या सर्व परिस्थितीमध्ये मलाही अनेकदा निराशा झाल्यासारखं वाटायचं असंही गडकरी म्हणाले. 'तेव्हा मलाही अनेकदा निराश झाल्यासारखं व्हायचं. लोक म्हणायचे तू चांगला आहेस. पण पक्ष चांगला नसल्याने इथे तुझं भविष्य चांगलं नाही. त्यामुळे तू पक्ष बदल असा सल्ला काहींनी दिला. पण पक्ष आमचा आहे, विचार आमचे आहेत. त्यामुळे पक्षासोबतच राहण्याची भूमिका मी घेतली,' असं गडकरींनी सांगितलं.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीBJPभाजपाLal Krishna Advaniलालकृष्ण अडवाणीAtal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयी