शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

मोदी सरकारचा 'तो' निर्णयच जबाबदार; मनमोहन सिंग यांनी सांगितलं देशातील वाढत्या बेरोजगारीचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2021 15:55 IST

Manmohan Singh on Narendra modi government : कार्यक्रमादरम्यान मार्गदर्शन करताना मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारचा मोठा निर्णय बेरोजगारीसाठी जबाबदार असल्याचं म्हटलं

ठळक मुद्देमार्गदर्शन करताना मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारचा मोठा निर्णय बेरोजगारीसाठी जबाबदार असल्याचं म्हटलंमोदी सरकार राज्यांसोबत नियमितपणे विचार-विनिमय करत नसल्याचा मनमोहन सिंग यांचा आरोप

देशात सातत्यानं बेरोजगारांच्या संख्येत वाढ होत असल्याचं म्हणत काँग्रेसकडून केंद्र सरकारवर टीका करण्यात येत आहे. भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी मंगळवारी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी नोटबंदीचा निर्णय चुकीचा होता असा पुनरुच्चारही केला. भाजप सरकारनं कोणताही विचार न करता घेतल्या गेलेल्या निर्णयामुळेच देशात बेरोजगारीचं प्रमाण वाढत आहे. तसंच असंघठित क्षेत्रही मोडकळीस आलं आहे, असं ते म्हणाले. तसंच मोदी सरकार राज्यांसोबत नियमितपणे विचार-विनिमय करत नसल्याचा आरोपही मनमोहन सिंग यांनी यावेळी केला. केरळमध्ये राजीव गांधी डेव्हलपमेंट स्टडिजच्या व्हर्च्युअल संमेलनाचं उद्घाटनं करताना डॉ. मनमोहन सिंग यांनी यावर भाष्य केलं. "सरकार आणि रिझर्व्ह बँकेच्या तात्पुरत्या उपाययोजनांनी पतपुरवठा समस्या लपवता येणार नाही. या संकटाचा परिणाम लघु आणि मध्यम क्षेत्रावर होऊ शकतो," असं ते म्हणाले. "देशात बेरोजगारी अधिक आहे आणि असंघटीत क्षेत्र ढासळलं आहे. हे संकट २०१६ मध्ये कोणत्याही विचारांशिवाय घेण्यात आलेल्या नोटबंदीच्या निर्णयामुळे उद्भवलं आहे," असंही त्यांनी नमूद केलं. "संघटना आणि राज्यांशी नियमितपणे सल्लामसलत करणे, ही भारताची आर्थिक आणि राजकीय आधारभूत संस्था आहे आणि घटनेत याबद्दल लिहिण्यात आलं आहे. परंतु विद्यमान केंद्र सरकार त्याला महत्त्व देत नाही," असं सिंग म्हणाले. यावेळी त्यांनी केरळच्या विकासावर भाष्य केलं. तसंच भविष्यात या ठिकाणी अन्य पर्यायांवरही लक्ष देणं आवश्यक असल्याचं म्हटलं. बाधा पार करून पुढे जायचंय"या ठिकाणी अनेक बाधा आहेत. यातून राज्याला पुढे न्यायाचं आहे. डिजिटल प्रणालीमुळे माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्र काम करू शकत आहे. परंतु पर्यटन क्षेत्राला कोरोनाच्या महासंकटाचा मोठा फटका बसला आहे. शिक्षण आणि आरोग्यावर लक्ष दिल्यामुळेच केरळचे लोकं देशात आणि जगातील अन्य भागांमध्ये नोकरी मिळवण्यास सक्षम झाले आहेत," असंही मनमोहन सिंग म्हणाले. 

टॅग्स :IndiaभारतDemonetisationनिश्चलनीकरणprime ministerपंतप्रधानcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीManmohan Singhमनमोहन सिंगKeralaकेरळ