शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
3
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
4
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
5
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
6
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
7
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
8
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
9
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
10
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
11
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
12
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
13
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
14
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
15
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
16
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
17
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
18
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
19
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
20
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं

२४ तासांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काढला तोडगा; जितेंद्र आव्हाड खुश अन् शिवसेना आमदारही समाधानी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 5:28 PM

मुख्यमंत्र्यांनी अचानक दिलेल्या स्थगितीमुळे जितेंद्र आव्हाड नाराज झाले होते. त्यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन निर्णयाला स्थगिती दिल्याची खंत व्यक्त केली.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांनी आजच्या आज त्याच परिसरात जागा शोधून निर्णय घ्या असं सांगितलं अन् १५ मिनिटांत निर्णयही झालाजर महाविकास आघाडी सरकारमध्ये कुठलाही संवाद नसता तर २४ तासांत निर्णय झाला नसता. काल स्थगिती मिळाली आणि आज त्याच परिसरात तेवढ्याच जागा देऊ शकलो याचा आनंद आहे

मुंबई – कॅन्सरग्रस्तांच्या नातेवाईकांना म्हाडाच्या १०० सदनिका उपलब्ध करून देण्याचा निर्णय मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसांपूर्वी घेतला होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते या १०० सदनिकांच्या चाव्या टाटा कॅन्सर रुग्णालयाला सुपूर्द करण्यात आल्या होत्या. परंतु शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आणि तात्काळ मुख्यमंत्र्यांनीही त्याची दखल घेत आव्हाडांच्या निर्णयाला स्थगिती दिली होती.

मुख्यमंत्र्यांनी अचानक दिलेल्या स्थगितीमुळे जितेंद्र आव्हाड नाराज झाले होते. त्यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन निर्णयाला स्थगिती दिल्याची खंत व्यक्त केली. परंतु मुख्यमंत्र्यांनी आजच्या आज त्याच परिसरात जागा शोधून निर्णय घ्या असं सांगितलं अन् १५ मिनिटांत निर्णयही झाला. बॉम्बे डाईंगमध्ये १०० सदनिका कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांना देण्यात आल्या आहेत. मंत्री जितेंद आव्हाड यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, जर महाविकास आघाडी सरकारमध्ये कुठलाही संवाद नसता तर २४ तासांत निर्णय झाला नसता. काल स्थगिती मिळाली आणि आज त्याच परिसरात तेवढ्याच जागा देऊ शकलो याचा आनंद आहे असं त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हाडा सदनिका कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांना देण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली होती. यावरून विरोधी पक्ष भाजपाने महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं. कोणताही निर्णय घेताना मुख्यमंत्र्यांना विश्वासात घेतलं जात नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. मात्र मुख्यमंत्र्यांनी २४ तासांत या प्रकरणी तोडगा काढून जितेंद्र आव्हाडांना खुश तर आमदार अजय चौधरी यांचे समाधान केले.

आमदार अजय चौधरी यांच्यात पत्रात काय म्हटलंय?

शिवडी विधानसभा मतदारसंघातील सुखकर्ता आणि विघ्नहर्ता सोसायटी या पुर्नरचित इमारतींमध्ये ७५० मराठी कुटुंब राहतात. सदर इमारती पुर्नविकसित करण्यात येत असल्याने म्हाडा प्राधिकरणास सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या. या सदनिका रहिवाशी व संक्रमण शिबिरातील रहिवाशी यांना कायम स्वरुपी राहण्याकरिता देणे अपेक्षित होते. परंतु सदनिका त्यांना वितरीत न करता कॅन्सरग्रस्त रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना राहण्याकरिता टाटा रुग्णालयाला देण्याचा निर्णय गृहनिर्माण विभागाने घेतला. त्यामुळे या कुटुंबाने चिंतेचे आणि भितीचे वातावरण निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केला होता.

मोठी बातमी! जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ निर्णयाला मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती; राष्ट्रवादीसह शरद पवारांनाही धक्का

विरोधी पक्षांनी साधला होता निशाणा

कॅन्सर रुग्णांच्या नातेवाईकांसाठी म्हाडानं १०० सदनिका दिल्या, जेव्हा हा निर्णय झाला तेव्हा त्याचं कौतुक केले होते. परंतु या निर्णयाला स्थगिती देण्यापूर्वी संवेदनशीलपणे विचार करायला हवा होता. निर्णय झाला तेव्हा मुख्यमंत्र्यांना विश्वासात घेतलं नव्हतं का? या निर्णयाला स्थगिती देण्यामागे नेमकं काय कारण आहे याचा खुलासा होणं गरजेचे आहे. शिवसेना आमदाराचं पत्र वाचून या निर्णयामागे मुख्यमंत्र्यांना कुठे संशय आहे का? असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी करत सरकारवर निशाणा साधला होता.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेmhadaम्हाडाcancerकर्करोगJitendra Awhadजितेंद्र आव्हाडAjay Chaudharyअजय चौधरीShiv SenaशिवसेनाBJPभाजपा