शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

Sanjay Raut Exclusive: सुडाची कारवाई करायची असती तर १५ दिवसाआधीच केली असती; शिवसेना नेते संजय राऊतांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2021 15:39 IST

नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्रिपदाचं भान ठेवायला हवं. मोदी कॅबिनेटमधील एक मंत्री दाखवा जो बेताल वक्तव्य करून पुढे जातोय. परंतु नारायण राणेंचा स्वभाव आहे.

ठळक मुद्देनारायण राणे महाराष्ट्रात आल्यापासून अतिशय घाणेरड्या शब्दात मुख्यमंत्र्यांवर टीका करतातनारायण राणेंनी महाराष्ट्राच्या प्रतिमेचा, परंपरेचा भान ठेऊन जपून बोलावं.ठाकरे हे ठाकरे आहे. ठाकरे शैलीची तुलना करू नये. माझी लायकी काय आहे ते बाळासाहेबांना माहिती होतं म्हणून संपादक केले.

मुंबई – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना केंद्रात मंत्रिपदाची जबाबदारी दिली आहे. त्यांनी त्या खात्याचा कारभार योग्यपणे सांभाळावा. राणेंना शिवसेनेचा प्रभार दिला नाही. नारायण राणेंच्या प्रत्येक गोष्टीवर बोलायला लागलो तर आम्ही इतर कामं कधी करायची? नारायण राणेंवर झालेली कारवाई ही कायद्यानं योग्यच आहे. राणेंवर दाखल झालेला गुन्हा कायद्याने योग्य असल्याचं कोर्टाने म्हटलं आहे असं शिवसेना नेते संजय राऊत(Shivsena Sanjay Raut) यांनी सांगितले.

लोकमतला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊत म्हणाले की, नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्रिपदाचं भान ठेवायला हवं. मोदी कॅबिनेटमधील एक मंत्री दाखवा जो बेताल वक्तव्य करून पुढे जातोय. परंतु नारायण राणेंचा स्वभाव आहे. नारायण राणे यांना उत्तर देण्याचा पूर्ण अधिकार आहे. परंतु नारायण राणे महाराष्ट्रात आल्यापासून अतिशय घाणेरड्या शब्दात मुख्यमंत्र्यांवर टीका करतात. धोरणात्मक टीका होऊ शकते. पंतप्रधानांवर आम्हीही धोरणात्मक टीका केली आहे. कोण कुठला मुख्यमंत्री? मुख्यमंत्री गेला उडत. तिथेच गुन्हा दाखल व्हायला हवा होता. सुडाची कारवाई करायची असती तर १५ दिवसाआधीच केली असती. केंद्रीय मंत्री आहे म्हणून आदर ठेवला. त्यांच्या स्वभावाला औषध नाही म्हणून दुर्लक्ष केले. २४ तासांत काय गुन्हा झाल्यानंतर २४ मिनिटांत, २४ सेकंदात अटक होते. गुन्हेगारांना संधी दिल्यास तो पळून जातो असा गौप्यस्फोट राऊतांनी केला.

तसेच महाराष्ट्राच्या प्रतिमेचा, परंपरेचा भान ठेऊन जपून बोलावं. विलासराव देशमुखही अगदी विनोदी शैलीत समोरच्याला टोचून बोलायचे. शिवराळ भाषा म्हणजे शैली नाही. ठाकरे हे ठाकरे आहे. ठाकरे शैलीची तुलना करू नये. माझी लायकी काय आहे ते बाळासाहेबांना माहिती होतं म्हणून संपादक केले. म्हणजे बाळासाहेबांची लायकी नव्हती असं म्हणायचं का? तुम्हाला बाळासाहेबांनी मुख्यमंत्री बनवलं, तुमची लायकी नव्हती का? शिवसेनेवर चिखलफेक करणं हे तुमचं काम नाही. तुमचं ध्येर्य राष्ट्रीय स्तरावर काम करावं असं संजय राऊत म्हणाले. नारायण राणे(Narayan Rane) यांना मंत्रिपद देऊन भाजपानं शिवसेनेला मदत केली आहे. त्याबद्दल मी भाजपाचे आभारी आहे असा टोलाही राऊतांनी भाजपाला काढला.

पश्चिम बंगालसोबत महाराष्ट्राची तुलना कमीपणा नाही

राणे म्हणतात, महाराष्ट्राचा पश्चिम बंगाल होऊ देणार नाही. पण त्या राज्यात भाजपा नेत्यांची पळता भुई थोडी झाली. एका महिलेने भल्याभल्या नेत्यांना गाडून टाकलं. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राचं नातं आहे. त्यामुळे त्यात कमीपणा काहीच नाही. पश्चिम बंगाल ही क्रांतिकारकांची भूमी आहे. तसं महाराष्ट्र महापुरुषांची भूमी आहे. अभ्यास करा मग बोला. उगाच तोंडावर पडू नका असंही राऊतांनी राणेंना बजावलं.

शिवसेनेने केले अनिल परब यांचं समर्थन

अनिल परब हे सरकारमधील मंत्री आहेत. ज्या भागात राणेंना अटक केली त्याठिकाणचे पालकमंत्री अनिल परब आहेत. त्यामुळे त्या जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पालकमंत्री म्हणून त्यांचीही आहे. त्यामुळे अनिल परब यांनी पोलीस अधिकाऱ्यांना फोन केला त्यात झालं काय? ज्यांच्या वकिली चालत नाही ते राजकीय सल्ले देत बसतात अशा शब्दात संजय राऊतांनी भाजपा नेते आशिष शेलार(BJP Ashish Shelar) यांना सुनावलं आहे.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतNarayan Raneनारायण राणे BJPभाजपाShiv Senaशिवसेना