शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
6
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
8
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
9
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
10
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
11
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
12
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
13
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
15
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
16
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
17
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
18
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
19
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
20
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!

सुशांत प्रकरणामुळे अजित पवारांची भाजपाशी जवळीक वाढली?; ‘या’ दोन घटना योगायोग की...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 7:41 PM

Sushant Singh Rajput: या प्रकरणाच्या निमित्ताने अजित पवार आणि भाजपाची जवळीक वाढली आहे का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.

मुंबई – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरण सीबीआयकडे सोपवावं असा निर्णय बुधवारी सुप्रीम कोर्टाने दिला. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर महाराष्ट्र सरकारला मोठा झटका बसला. सुशांतचा तपास मुंबई पोलिसांकडेच राहावा अशी आग्रही मागणी सत्ताधारी शिवसेनेची होती. मात्र सुप्रीम कोर्टाच्या या निकालानं हे प्रकरण सीबीआयकडे चौकशीसाठी जाणार हे आता स्पष्ट झालं आहे.

मात्र या प्रकरणाच्या निमित्ताने अजित पवार आणि भाजपाची जवळीक वाढली आहे का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे. याला कारण म्हणजे सुशांतच्या सीबीआय चौकशीवरुन २ घटना प्रखरतेने लक्षात आल्या. त्याम्हणजे अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी सुशांत सिंग राजपूत मृत्यूची चौकशी सीबीआयकडे द्यावी अशी मागणी केली.

पार्थ पवार इतक्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन निवेदनही सादर केलं. पार्थ पवार याच्या सीबीआय चौकशीच्या मागणीवरुन आजोबा शरद पवार यांनी जाहिरपणे नाराजी व्यक्त केली होती. मी माझ्या नातवाच्या मागणीला कवडीचीही किंमत देत नाही, तो इमॅच्युर आहे अशा शब्दात शरद पवारांनी फटकारलं होतं. शरद पवारांच्या अशा भूमिकेमुळे उपमुख्यमंत्री अजित पवारही नाराज असल्याचं सांगितले जात होते. तो लहान आहे, हळूहळू कळेल, पण जाहिररित्या असं त्याला बोलणं योग्य नव्हे असं मत अजित पवारांचे होते.

शरद पवारांनी पार्थबाबत केलेल्या विधानावरुन पुन्हा एकदा पवार कुटुंबातील मतभेदावर चर्चा सुरु झाली. पार्थ पवारांनी कुटुंबातील नातेवाईकांच्या भेटीगाठी सुरु केल्या. पार्थ लवकरच मोठा निर्णय घेईल असंही सांगितलं जात होतं. पार्थ पवार यांनी श्रीनिवास पवार आणि त्यांच्या पत्नी यांची भेट घेतली होती. त्यानंतर शरद पवारांसोबतही पार्थ पवारांची भेट झाली होती. पार्थ प्रकरणात सर्वकाही आलबेल आहे अस चित्र उभं केलं गेले. त्यानंतर या वादावर पडदा पडणार असं वाटत असतानाच सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला.

सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर पार्थ यांनी केलेलं सत्यमेव जयते या ट्विटचे अनेक अर्थ काढण्यासारखे आहेत. एकीकडे राज्य सरकार या निर्णयावर सल्लामसलत करत असताना खुद्द शरद पवार यांच्या नातूने अशाप्रकारे ट्विट केल्याने पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं. कारण जाहिररित्या आजोबांनी फटकारल्यानंतरही पार्थ यांनी त्यांची भूमिका योग्य असल्याचं ट्विटमधून मांडली आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो.   

कोण आहेत श्रीनिवास पवार?

श्रीनिवास पवार हे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे मोठे बंधू आहेत. यापूर्वी अजितदादांनी भाजपासोबत हातमिळवणी केल्यात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. तेव्हा शपथविधी उरकल्यानंतर अजित पवार हे बंधू श्रीनिवास पवार यांच्या चर्चगेट येथील निवासस्थानी मुक्कामी होते. शरद पवारांनी फटकारल्यानंतर पार्थने श्रीनिवास पवार यांचीही भेट घेतली. एकेकाळी श्रीनिवास पवार यांच्यावर मुंबई सकाळची जबाबदारी होती.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

ठाकरे सरकारचं ‘शिवभोजन’ तर काँग्रेसचं ‘इंदिरा रसोई योजना’; ८ रुपयांत मिळणार जेवण

शिवलिंग प्राप्तीसाठी बंद खोलीत दोन भावांची अघोरी प्रथा; एकाचा मृत्यू झाला अन् दुसरा...

आता नोकरीसाठी केवच एकच परीक्षा; कोट्यवधी तरुणांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा

मुंबई पोलिसांच्या प्रतिष्ठेचा विषय नाही, तपास कमी पडला; काँग्रेस नेत्याचा सरकारला घरचा आहेर

मुंबई पोलिसांवर प्रश्नचिन्ह उभं करणं हे षडयंत्र; सुप्रीम कोर्टाच्या निकालावर संजय राऊत म्हणाले...

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतparth pawarपार्थ पवारAjit Pawarअजित पवारBJPभाजपाSupreme Courtसर्वोच्च न्यायालयSharad Pawarशरद पवार