शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

आसाम गण परिषदेचा अस्तित्वाचा संघर्ष; काँग्रेस आघाडीचे आव्हान, भाजपचा सहकारी झाला दुबळा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 4:50 AM

गुवाहाटी : आसाममध्ये १९८५ मध्ये आंदोलनाच्या परिणामस्वरूप एक पक्ष उदयाला आला. आसाम गण परिषद (एजीपी) त्याचे नाव. आसामी लोकांचा ...

गुवाहाटी : आसाममध्ये १९८५ मध्ये आंदोलनाच्या परिणामस्वरूप एक पक्ष उदयाला आला. आसाम गण परिषद (एजीपी) त्याचे नाव. आसामी लोकांचा अभिमान म्हणून या पक्षाकडे बघितले जात होते. आज रालोआचा दुबळा घटक पक्ष म्हणून आसाम गण परिषदेकडे पाहिले जात आहे. एक काळ असा होता की, भाजपने आसाम गण परिषदेचा ज्युनिअर सहकारी म्हणून राज्यात पाय रोवले होते. मात्र, आज मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या नेतृत्वात भाजपचा विस्तार झाला आहे. हेच सोनोवाल कधी काळी एजीपीमध्ये होते. तेच आज भाजपचे राज्यात नेतृत्व करत आहेत. रालोआ जिंकणार की, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील दहा पक्षांची महाआघाडी हा प्रश्न अनुत्तरित असला तरी एजीपी पूर्वीपेक्षा अधिक कमजोर होऊ शकतो. भाजपकडून २६ जागा मिळविण्यात हा पक्ष यशस्वी ठरला असला तरी यातील बहुतांश जागा जिंकणे अवघड आहे. (The struggle for the existence of the Assam Gana Parishad; The challenge of the Congress front, the BJP's ally became weak) 

एजीपीसाठी का आहे जागा जिंकणे अवघड ? एजीपी आमदारांच्या जागा भाजपने त्यांच्याकडून काढून घेतल्या आहेत. यात माजी मुख्यमंत्री आणि एजीपीचे संस्थापक प्रफुल्ल महंत यांच्या जागेचाही समावेश आहे. महंत यांची प्रकृती सध्या बरी नाही. तथापि, पक्षाचे अध्यक्ष अतुल बोरा यांनी महंत यांची जागा भाजपला देण्यास सहमती दर्शविल्याने महंत यांचे समर्थक नाराज आहेत. 

कारण, काँग्रेसकडून सुरेश बोरा यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. ते २०१६ मध्ये महंत यांच्याकडून पराभूत झाले होते. महंत यांचे समर्थक मतदार रालोआच्या विरोधात मतदान करतील तर सत्ताधारी आघाडीसाठी तो धक्का ठरू शकतो. 

- एजीपीने मागील वेळी ज्या जागा जिंकल्या होत्या त्यात कमलपूर, लखीमपूर, नाहरकटिया आणि पटाचारकुची यांचा समावेश आहे. या जागा आता भाजपने आपल्याकडे घेतल्या आहेत. - पटाचारकुची हा मतदारसंघ भाजपचे प्रदेशाध्यक्ष रणजीत दास यांनी एजीपीकडून घेतला आहे. - भाजपने गतवेळच्या आपल्या ८ जागा एजीपीला दिल्या आहेत. मात्र, काँग्रेस - एआययूडीएफ आघाडीमुळे या जागा जिंकणे अवघड झाले आहे. कारण, हे मुस्लिमबहुल मतदारसंघ आहेत. 

- २०१६ च्या आकड्यांचा आधार घेतला तर काँग्रेस- एआययूडीएफचे मते संयुक्तपणे ५४ टक्क्यांवर आहेत. गत निवडणुकीत काँग्रेस आणि एआययूडीएफ यांच्यात मतांची विभागणी झाली होती. काँग्रेसने ३१ टक्के, तर एआययूडीएफने २३ टक्के मते घेतली होती, तर भाजप-एजीपीला ४१.९ टक्के मते मिळाली होती. 

- राहा, बभनीपूर, नोबोइचा या मतदारसंघात एजीपी काट्याची लढत देऊ शकते.  

टॅग्स :Assam Assembly Elections 2021आसाम विधानसभा निवडणूक २०२१BJPभाजपाcongressकाँग्रेस