शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

'गोबेल्स' तंत्र थांबवा अन् केंद्राला सहकार्य करण्यास सांगा; अशोक चव्हाणांचे भाजपाला खडेबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2020 19:22 IST

Ashok Chavan : मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणाबाबत मंगळवारी विधानसभेत माहिती देताना चव्हाण यांनी विरोधी पक्षांच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर दिले.

ठळक मुद्देभाजपा सरकारनेच नेमलेल्या वकिलांच्या युक्तिवादानंतरही अंतरिम स्थगिती मिळत असेल तर आम्ही त्याची जबाबदारी फडणवीसांवर ढकलून मोकळे व्हायचे का? असा सवालही अशोक चव्हाण यांनी यावेळी उपस्थित केला.

मुंबई : मराठा आरक्षणप्रकरणी विरोधी पक्ष ‘गोबेल्स’ तंत्राचा वापर करीत असून काही नेते चुकीची माहिती देऊन समाजाची दिशाभूल करत आहेत. मराठा आरक्षणाबाबतभाजपा गंभीर असेल तर हे प्रकार त्यांनी थांबवावे आणि यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राला मदत करण्याची भूमिका घ्यावी, असे खडेबोल सार्वजनिक बांधकाम मंत्री व मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मंगळवारी सुनावले. 

मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणाबाबत मंगळवारी विधानसभेत माहिती देताना चव्हाण यांनी विरोधी पक्षांच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, भाजपाने मराठा आरक्षणासारख्या संवेदनशील विषयावर राजकारण करण्याऐवजी राज्य सरकारला सहकार्य करण्याची भूमिका घ्यायला हवी. एसईबीसी कायदा करताना तेव्हाच्या विरोधी पक्षांनी तत्कालीन भाजपा सरकारला सहकार्य करण्याची भूमिका घेतली होती. हा कायदा कोणतीही चर्चा न करता एकमुखाने पारित करण्यात आला होता. आज विरोधी पक्षात असलेल्या भाजपनेही तीच भूमिका घ्यायला हवी. परंतु, त्यांच्या अनेक नेत्यांकडून सरकार गंभीर नाही, सरकारमध्ये समन्वय नाही, अशी धादांत खोटी माहिती देऊन राजकारण केले जाते आहे. हा कायदा पारित करताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही न्यायालयात टिकेल, असा ‘फुलप्रुफ’ कायदा करीत असल्याचे सांगितले होते. मग त्या कायद्याला भाजपा सरकारनेच नेमलेल्या वकिलांच्या युक्तिवादानंतरही अंतरिम स्थगिती मिळत असेल तर आम्ही त्याची जबाबदारी फडणवीसांवर ढकलून मोकळे व्हायचे का? असा सवालही अशोक चव्हाण यांनी यावेळी उपस्थित केला.  

सरकारने केलेल्या उपाययोजना व प्रयत्नांची माहिती देऊन ते पुढे म्हणाले की, ९ डिसेंबरच्या सुनावणीनंतर घटनापिठाने केंद्र सरकारला नोटीस देऊन आपली भूमिका मांडण्यास सांगितले आहे. भाजपासाठी ही मोठी संधी आहे. राज्याच्या विधीमंडळात सर्व राजकीय पक्षांनी सर्वसंमतीने मंजूर केलेले मराठा आरक्षण कायम रहावे, अशी भाजपाची प्रामाणिक इच्छा असेल तर त्यांनी केंद्र सरकारला सांगून केंद्राच्या महाधिवक्त्यांमार्फत सर्वोच्च न्यायालयात सकारात्मक बाजू मांडली पाहिजे. खा. संभाजी राजे यांनी केंद्राच्या मदतीसाठी पंतप्रधानांना भेटीची वेळ मागितली होती. परंतु अद्याप त्यांना वेळ मिळालेली नाही, अशी आपली माहिती असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. 

घटनापीठासमोरील सुनावणीत राज्य सरकारने अंतरिम आदेश रद्द करण्याची मागणी केली. पूर्णत्वास आलेल्या नोकरभरती व प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याची परवानगी मागितली. सुपर न्युमररी म्हणजे अधिसंख्य पदे निर्माण करण्याचीही अनुमती मागितली. परंतु त्याऐवजी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचे मूळ प्रकरण २५ जानेवारीपासून दैनंदिन पद्धतीने अंतिम निकालासाठी सुनावणीस घेण्याचे जाहीर केले. मराठा आरक्षणाची खरी लढाई न्यायालयातच लढावी लागणार आहे. त्यासाठी भाजपाने राज्य सरकारला सहकार्य करावे, असे आवाहन करून अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षण देण्याचा निर्णय़ न्यायालयावर कसा अवलंबून आहे, याबाबत फडणवीस यांच्या एका जुन्या प्रतिक्रियेतील मजकूरच वाचून दाखवला. सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशानंतर राज्य मंत्रिमंडळाने एसईबीसी प्रवर्गाला ईडब्ल्यूएसचे लाभ देण्याचा निर्णय़ घेतला होता. परंतु, या मुद्द्यावर समाजात सहमती नव्हती. या निर्णयाने मराठा आरक्षणाच्या मूळ प्रकरणाला धक्का लागेल, असे मत काही जणांनी नोंदवले होते. त्यामुळे समाजातील एका वर्गाची ही भावना लक्षात घेऊन राज्य सरकारने आपला निर्णय तूर्तास स्थगित ठेवला, असेही अशोक चव्हाण यांनी विधानसभेत सांगितले.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणMaratha Reservationमराठा आरक्षणvidhan sabhaविधानसभाBJPभाजपा