शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

...म्हणून त्या अग्रलेखाविरोधात सेनाभवनावर मोर्चा काढला; भाजपानं सांगितलं नेमकं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 12:57 PM

Shivsena-BJP News: सामनातील अग्रलेखाविरोधात सामनाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्याऐवजी थेट शिवसेना भवनासमोर भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन का केले, असा सवाल आता विचारला जात आहे. त्याला आता भाजपाकडून उत्तर देण्यात आले आहे.

मुंबई - काल शिवसेनाभवनासमोरशिवसेना आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यामुळे मुंबईसह राज्यातील वातावरण तापले आहे. या घटनेबाबत दोन्ही पक्षांकडून परस्परविरोधी दावे केले जात आहेत. दरम्यान,  राममंदिराबाबत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून लिहिण्यात आलेल्या ज्या अग्रलेखावरून हा वाद झाला. त्याविरोधात सामनाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्याऐवजी थेट शिवसेना भवनासमोर भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन का केले, असा सवाल आता विचारला जात आहे. त्याला आता भाजपाकडून उत्तर देण्यात आले आहे. (So We marched on Sena Bhavan against that front article; The BJP MLA Amit Satam stated the exact reason)

लोकमतच्या एका विशेष चर्चेमध्ये भाजपाचे आमदार अमित साटम यांनी शिवसेना भवनासमोर आंदोलन का केलं, याचं नेमकं कारण सांगितलं आहे. ते म्हणाले की, ज्या प्रकारची भाषा सामनामधून वारंवार वापरली जाते. पत्रकारिता ही वेगळी बाब. ही पत्रकारिता नाही. जसे यांचे शिवसैनिक आवेशात येतात तसे आमचे भाजयुमोचे कार्यकर्तेही आवेशात येतात. त्यामुळे वारंवार होणारे असे बिलो द बेल्ट हल्ले सुरू होते ते कुठेतरी भाजयुमोच्या युवा कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागले होते. तुम्ही एकदा लिहाल दोनदा लिहाल. मात्र दहाव्यांदा लिहिल्यावर अकराव्या वेळी कुठला ना कुठला कार्यकर्ता प्रतिक्रिया देणारच, असे अमित साटम यांनी सांगितले.

दरम्यान, शांततापूर्वक, लोकशाहीच्या मार्गाने भाजयुमोचा कार्यकर्ता त्याठिकाणी आंदोलन करण्यासाठी गेला होता. त्यांनी तिथे आंदोलन केलं. त्यांना अटक झाली. मात्र त्यानंतर त्या ठिकाणी तीनचार कार्यकर्ते वेगळे उभे होते. त्यात एक महिला होती. तेव्हा उर्वरित कार्यकर्ते गेल्यानंतर पोलिसांच्या आडून ५०-६० जणांच्या जमावाने या तीन चार जणांवर हल्ला केला, ही वस्तुस्थिती आहे. जसे यांचे शिवसैनिक आवेशात येतात तसे आमचे कार्यकर्तेही आवेशात येतात. जसं यांना लागतं, तसं आमच्या लोकांनाही लागतं. गेल्या सहा सात वर्षांत शिवसेनेकडून होणारी टीका अनेकदा सहन केली आहे. शिवसेनेकडून सत्तेत असतानाही भाजपाच्या नेत्यांवर बिलो द बेल्ड हल्ले सुरू होते. मात्र अशी टीका होऊनही कार्यकर्ते शांत होते. मात्र कधीनाधील अशा संतापाचा उद्रेक होतो, तो काल झाला, असे भाजपा आमदार अमित साटम यांनी सांगितले. 

दरम्यान, राम मंदिर न्यासाच्या अयोध्येतील एका जमीन खरेदीवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शिवसेना नेत्यांनी या व्यवहाराच्या चौकशीची भूमिका घेतली. त्या भूमिकेविरोधात भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी शिवसेना भवनसमोर फटकार मोर्चा काढला होता. भाजयुमोचे मुंबई अध्यक्ष तेजिंदरसिंह तिवाना यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. कोविडच्या पार्श्वभूमीवर मर्यादित संख्येत आंदोलनाला परवानगी देण्यात आली होती. काँग्रेससोबत सत्तेत सहभागी झालेली शिवसेना हिंदुत्व विसरली, धर्मनिरपेक्ष बनलेली शिवसेना आता खोटे आरोप करत हिंदुत्वाच्या आस्थेवरही आघात करत असल्याचा आरोप भाजपने केले.  

टॅग्स :BJPभाजपाShiv SenaशिवसेनाMumbaiमुंबईPoliticsराजकारण