शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

भाजपचा सर्वत्र डंका, काँग्रेसचा होतोय सुपडासाफ; स्मृती इराणींचा घणाघात

By मोरेश्वर येरम | Published: December 28, 2020 3:27 PM

कृषी कायद्यांवरुन ग्रामीण भागातील जनतेला आणि शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असतानाही देशातील ग्रामीण भागांमध्ये भाजपला जोरदार समर्थन मिळत आहे,

नवी दिल्लीदेशाच्या विविध भागांमध्ये झालेल्या स्थानिक आणि पंचायत निवडणुकांच्या निकालांबाबत माहिती देण्यासाठी भाजप नेत्या आणि केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी आज पत्रकार परिषद घेतली. इराणी यांनी यावेळी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. 

"अरुणाचल प्रदेश असो वा काश्मीर भाजपने सर्वच ठिकाणी विजय प्राप्त केला आहे. तर काँग्रेसचा सुपडासाफ होताना दिसत आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपने जिल्हा परिषदेच्या १८७ जागांवर विजय प्राप्त केला. तर आतापर्यंत ६४५० ग्राम पंचायतींमध्ये भाजपला यश आलं आहे. पासीघाट पालिका निवडणुकीमध्ये तर काँग्रेसला फक्त दोन जागा मिळाल्या आहेत", असं स्मृती इराणी म्हणाल्या. 

कृषी कायद्यांवरुन ग्रामीण भागातील जनतेला आणि शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असतानाही देशातील ग्रामीण भागांमध्ये भाजपला जोरदार समर्थन मिळत आहे, अशी टीका स्मृती इराणी यांनी काँग्रेसवर केली. "काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात असला तरी सप्टेंबरपासून डिसेंबरपर्यंत देशात ठिकठिकाणी झालेल्या स्थानिक निवडणुकांमध्ये भाजला मोठं यश मिळालं आहे", असंही त्या म्हणाल्या.

"देशात ज्या ठिकाणी काँग्रेसची सत्ता होती त्याठिकाणी आज भाजपने अभूतपूर्व विजय प्राप्त केला आहे. तर केरळमध्येही भाजप मजबूत स्थितीत आहे. तिथं भाजपच्या कार्यकर्त्यांना जीवे मारण्याचा प्रकार सुरू आहे", असा खळबळजनक आरोप इराणी यांनी केला. 

टॅग्स :Smriti Iraniस्मृती इराणीBJPभाजपाcongressकाँग्रेसElectionनिवडणूक