शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

VIDEO: शिवसेना-कंगना वादामागे 'वेगळं'च कारण; मनसेनं सांगितलं राजकारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2020 10:21 IST

शिवसेना-कंगना राणौत वादात मनसेची एंट्री; वेगळंच राजकारण सुरू असल्याचा दावा

मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणावर सातत्यानं बोलणाऱ्या, बॉलिवूडमधील अनेक प्रस्थापितांना लक्ष्य करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणौतनं आता राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. शिवसेना आणि कंगना यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाकयुद्ध सुरू आहे. मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानंतर शिवसेना नेते आक्रमक झाले आहेत. कंगनाला मुंबईत राहण्याचा अधिकार नसल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे. तर मुंबईत येणारच. हिंमत असेल तर अडवून दाखवा, असं आव्हान कंगनानं दिलं आहे. शिवसेना विरुद्घ कंगना वादावर आता मनसेनं भाष्य केलं आहे.अमृता फडणवीस यांच्याकडून कंगना राणौतची पाठराखण, म्हणाल्या...शिवसेना आणि कंगना वादामागे वेगळेचं कारण असल्याचं मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी सांगितलं आहे. सध्या राज्यात विविध प्रश्न आहेत. लोकांचे हाल होत आहेत. त्यापासून लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी शिवसेना नेते कंगनाला इतकं महत्त्व देत आहेत, असा दावा त्यांनी केला. 'सध्या मंदिरात प्रवेशाला बंदी आहे. लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. आरोग्य व्यवस्थेचा बोऱ्या वाजल्यानं हजारो लोकांचे बळी गेले आहेत. मुख्यमंत्री घरात बसल्यानं जनतेत नाराजी आहे. रेल्वेसेवा सुरू नसल्यानं लोकांचे प्रचंड हाल सुरू आहेत,' अशा शब्दांत देशपांडेंनी राज्यातील समस्यांची यादीच वाचून दाखवली.मुंबई माझी कर्मभूमी, तिने मला यशोदामाईसारखं सांभाळलं; विवादानंतर कंगनाला उपरतीराज्यातील समस्यांपासून जनतेचं लक्ष हटवण्यासाठी ज्या व्यक्तीची पाच पैशांची किंमत नाही, ज्या व्यक्तीच्या वक्तव्याला पाच पैशांची किंमत नाही, त्याला किंमत दिली जात आहे. ती व्यक्ती केवळ प्रसिद्धीसाठी विधानं करत आहे. त्या व्यक्तीनं प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी फेकलेल्या जाळ्यात अडकण्याइतकी शिवसेना निर्बुद्ध नक्कीच नाही. पण शिवसेना मुद्दाम जाळ्यात अडकतेय का हा प्रश्न आहे. इतर सगळ्या गोष्टींवरून लक्ष विचलित करून या एका गोष्टीवर लक्ष केंद्रीत व्हायला हवं, हा शिवसेनेचा प्रयत्न आहे का, त्यासाठी काही षडयंत्र रचलं जात नाही ना, याचा विचार जनतेनं करायला हवा, असं देशपांडे म्हणाले.अभिनेत्री कंगना राणावत यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा, शिवसेनेची मागणी  ​​​​​गेल्या दोन महिन्यात एका इंग्रजी आणि हिंदी वृत्तपत्राचा संपादक शिवसेनेचे वाभाडे काढत होता. त्यावेळी गप्प राहिलेली शिवसेना आता का बोलतेय याचा विचार व्हायला हवा. या षडयंत्रात कोण कोण आहे याचाही विचार झाला पाहिजे. जनता सुज्ञ आहे. ती याचा विचार नक्की करेल, अशी आशा देशपांडेंनी व्यक्त केली. राज्यातल्या महत्त्वाच्या प्रश्नांपासून जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी शिवसेना कंगनाच्या विधानांना महत्त्व देत असल्याचा आरोप मनसेनं केला आहे. या टीकेली शिवसेना काय उत्तर देते, हे पाहणं महत्त्वाचं असेल.'जे भाजपाच्या पोटात ते कंगनाच्या मुखात, महाराष्ट्रद्रोह्यांना जनता माफ करणार नाही'

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतShiv SenaशिवसेनाSandeep Deshpandeसंदीप देशपांडेMNSमनसे