शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
4
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
5
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
6
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
7
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
8
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
9
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
10
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
11
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
12
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
13
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
14
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...
15
धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तातडीने तपास
16
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
17
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
18
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
19
Dev Diwali 2025: देवदिवाळी नेमकी कधी? १ की २१ नोव्हेंबरला? हा गोंधळ कशामुळे? वाचा!
20
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...

VIDEO: शिवसेना-कंगना वादामागे 'वेगळं'च कारण; मनसेनं सांगितलं राजकारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2020 10:21 IST

शिवसेना-कंगना राणौत वादात मनसेची एंट्री; वेगळंच राजकारण सुरू असल्याचा दावा

मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणावर सातत्यानं बोलणाऱ्या, बॉलिवूडमधील अनेक प्रस्थापितांना लक्ष्य करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणौतनं आता राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. शिवसेना आणि कंगना यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाकयुद्ध सुरू आहे. मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानंतर शिवसेना नेते आक्रमक झाले आहेत. कंगनाला मुंबईत राहण्याचा अधिकार नसल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे. तर मुंबईत येणारच. हिंमत असेल तर अडवून दाखवा, असं आव्हान कंगनानं दिलं आहे. शिवसेना विरुद्घ कंगना वादावर आता मनसेनं भाष्य केलं आहे.अमृता फडणवीस यांच्याकडून कंगना राणौतची पाठराखण, म्हणाल्या...शिवसेना आणि कंगना वादामागे वेगळेचं कारण असल्याचं मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी सांगितलं आहे. सध्या राज्यात विविध प्रश्न आहेत. लोकांचे हाल होत आहेत. त्यापासून लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी शिवसेना नेते कंगनाला इतकं महत्त्व देत आहेत, असा दावा त्यांनी केला. 'सध्या मंदिरात प्रवेशाला बंदी आहे. लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. आरोग्य व्यवस्थेचा बोऱ्या वाजल्यानं हजारो लोकांचे बळी गेले आहेत. मुख्यमंत्री घरात बसल्यानं जनतेत नाराजी आहे. रेल्वेसेवा सुरू नसल्यानं लोकांचे प्रचंड हाल सुरू आहेत,' अशा शब्दांत देशपांडेंनी राज्यातील समस्यांची यादीच वाचून दाखवली.मुंबई माझी कर्मभूमी, तिने मला यशोदामाईसारखं सांभाळलं; विवादानंतर कंगनाला उपरतीराज्यातील समस्यांपासून जनतेचं लक्ष हटवण्यासाठी ज्या व्यक्तीची पाच पैशांची किंमत नाही, ज्या व्यक्तीच्या वक्तव्याला पाच पैशांची किंमत नाही, त्याला किंमत दिली जात आहे. ती व्यक्ती केवळ प्रसिद्धीसाठी विधानं करत आहे. त्या व्यक्तीनं प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी फेकलेल्या जाळ्यात अडकण्याइतकी शिवसेना निर्बुद्ध नक्कीच नाही. पण शिवसेना मुद्दाम जाळ्यात अडकतेय का हा प्रश्न आहे. इतर सगळ्या गोष्टींवरून लक्ष विचलित करून या एका गोष्टीवर लक्ष केंद्रीत व्हायला हवं, हा शिवसेनेचा प्रयत्न आहे का, त्यासाठी काही षडयंत्र रचलं जात नाही ना, याचा विचार जनतेनं करायला हवा, असं देशपांडे म्हणाले.अभिनेत्री कंगना राणावत यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा, शिवसेनेची मागणी  ​​​​​गेल्या दोन महिन्यात एका इंग्रजी आणि हिंदी वृत्तपत्राचा संपादक शिवसेनेचे वाभाडे काढत होता. त्यावेळी गप्प राहिलेली शिवसेना आता का बोलतेय याचा विचार व्हायला हवा. या षडयंत्रात कोण कोण आहे याचाही विचार झाला पाहिजे. जनता सुज्ञ आहे. ती याचा विचार नक्की करेल, अशी आशा देशपांडेंनी व्यक्त केली. राज्यातल्या महत्त्वाच्या प्रश्नांपासून जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी शिवसेना कंगनाच्या विधानांना महत्त्व देत असल्याचा आरोप मनसेनं केला आहे. या टीकेली शिवसेना काय उत्तर देते, हे पाहणं महत्त्वाचं असेल.'जे भाजपाच्या पोटात ते कंगनाच्या मुखात, महाराष्ट्रद्रोह्यांना जनता माफ करणार नाही'

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतShiv SenaशिवसेनाSandeep Deshpandeसंदीप देशपांडेMNSमनसे