शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: शिवसेना-कंगना वादामागे 'वेगळं'च कारण; मनसेनं सांगितलं राजकारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2020 10:21 IST

शिवसेना-कंगना राणौत वादात मनसेची एंट्री; वेगळंच राजकारण सुरू असल्याचा दावा

मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणावर सातत्यानं बोलणाऱ्या, बॉलिवूडमधील अनेक प्रस्थापितांना लक्ष्य करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणौतनं आता राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. शिवसेना आणि कंगना यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाकयुद्ध सुरू आहे. मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानंतर शिवसेना नेते आक्रमक झाले आहेत. कंगनाला मुंबईत राहण्याचा अधिकार नसल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे. तर मुंबईत येणारच. हिंमत असेल तर अडवून दाखवा, असं आव्हान कंगनानं दिलं आहे. शिवसेना विरुद्घ कंगना वादावर आता मनसेनं भाष्य केलं आहे.अमृता फडणवीस यांच्याकडून कंगना राणौतची पाठराखण, म्हणाल्या...शिवसेना आणि कंगना वादामागे वेगळेचं कारण असल्याचं मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी सांगितलं आहे. सध्या राज्यात विविध प्रश्न आहेत. लोकांचे हाल होत आहेत. त्यापासून लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी शिवसेना नेते कंगनाला इतकं महत्त्व देत आहेत, असा दावा त्यांनी केला. 'सध्या मंदिरात प्रवेशाला बंदी आहे. लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. आरोग्य व्यवस्थेचा बोऱ्या वाजल्यानं हजारो लोकांचे बळी गेले आहेत. मुख्यमंत्री घरात बसल्यानं जनतेत नाराजी आहे. रेल्वेसेवा सुरू नसल्यानं लोकांचे प्रचंड हाल सुरू आहेत,' अशा शब्दांत देशपांडेंनी राज्यातील समस्यांची यादीच वाचून दाखवली.मुंबई माझी कर्मभूमी, तिने मला यशोदामाईसारखं सांभाळलं; विवादानंतर कंगनाला उपरतीराज्यातील समस्यांपासून जनतेचं लक्ष हटवण्यासाठी ज्या व्यक्तीची पाच पैशांची किंमत नाही, ज्या व्यक्तीच्या वक्तव्याला पाच पैशांची किंमत नाही, त्याला किंमत दिली जात आहे. ती व्यक्ती केवळ प्रसिद्धीसाठी विधानं करत आहे. त्या व्यक्तीनं प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी फेकलेल्या जाळ्यात अडकण्याइतकी शिवसेना निर्बुद्ध नक्कीच नाही. पण शिवसेना मुद्दाम जाळ्यात अडकतेय का हा प्रश्न आहे. इतर सगळ्या गोष्टींवरून लक्ष विचलित करून या एका गोष्टीवर लक्ष केंद्रीत व्हायला हवं, हा शिवसेनेचा प्रयत्न आहे का, त्यासाठी काही षडयंत्र रचलं जात नाही ना, याचा विचार जनतेनं करायला हवा, असं देशपांडे म्हणाले.अभिनेत्री कंगना राणावत यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा, शिवसेनेची मागणी  ​​​​​गेल्या दोन महिन्यात एका इंग्रजी आणि हिंदी वृत्तपत्राचा संपादक शिवसेनेचे वाभाडे काढत होता. त्यावेळी गप्प राहिलेली शिवसेना आता का बोलतेय याचा विचार व्हायला हवा. या षडयंत्रात कोण कोण आहे याचाही विचार झाला पाहिजे. जनता सुज्ञ आहे. ती याचा विचार नक्की करेल, अशी आशा देशपांडेंनी व्यक्त केली. राज्यातल्या महत्त्वाच्या प्रश्नांपासून जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी शिवसेना कंगनाच्या विधानांना महत्त्व देत असल्याचा आरोप मनसेनं केला आहे. या टीकेली शिवसेना काय उत्तर देते, हे पाहणं महत्त्वाचं असेल.'जे भाजपाच्या पोटात ते कंगनाच्या मुखात, महाराष्ट्रद्रोह्यांना जनता माफ करणार नाही'

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतShiv SenaशिवसेनाSandeep Deshpandeसंदीप देशपांडेMNSमनसे