शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

राष्ट्रवादीच्या रणनीतीचा भाजपाला फटका? शरद पवारांनी अजितदादांवर सोपवली नवी जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2020 16:29 IST

महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षाचं राजकारण आणि ताकद ओळखून त्या त्या जिल्ह्यात नेत्यांना पुन्हा पक्षात घेण्याचा विचार सुरु आहे.

ठळक मुद्देभाजपात गेलेल्या आमदारांना पुन्हा राष्ट्रवादीत घेण्याची रणनीतीपक्षात प्रवेश देण्यापूर्वी शिवसेना-काँग्रेसलाही विचारात घेणार आमदारांना राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवावी लागणार?

मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ पवार यांची कानउघडणी केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज झाल्याची चर्चा होती. मात्र त्यानंतर शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला अजितदादाही उपस्थित होते. या बैठकीत राष्ट्रवादीच्या पुढील रणनीतीबद्दल चर्चा झाल्याची माहिती आहे.

यामध्ये सर्वात मुख्य म्हणजे विधानसभा निवडणुकीपूर्वी जे लोक राष्ट्रवादीसोडून भाजपात गेले होते अशा नेत्यांना पुन्हा पक्षात घेण्याबाबत व्यूहरचना आखण्यात आल्याची माहिती आहे. याबैठकीला शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील यांच्यासह अन्य प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षाचं राजकारण आणि ताकद ओळखून त्या त्या जिल्ह्यात नेत्यांना पुन्हा पक्षात घेण्याचा विचार सुरु आहे.

पक्ष सोडून गेलेल्या कोणत्या नेत्यांना राष्ट्रवादीत परत घ्यायचं याची जबाबदारी जयंत पाटील आणि अजित पवारांवर दिली आहे. अलीकडेच राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी भाजपात गेलेले नेते पक्षात येण्यास उत्सुक आहेत, पण अद्याप त्यावर निर्णय झाला नाही. लवकरच कळवलं जाईल असं म्हटलं होतं. त्यामुळे बुधवारच्या बैठकीत या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे. याबाबत न्यूज १८ ने बातमी दिली आहे. 

राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीचं सरकार आहे. त्यामुळे भाजपातील कोणते नेत्यांचा अथवा आमदारांचा राष्ट्रवादीत प्रवेश करुन घ्यायचा याबाबत हालचाली सुरु आहेत, तसेच प्रवेश देण्यापूर्वी मित्रपक्ष शिवसेना-काँग्रेसला विश्वासात घेतलं जाईल असंही सांगण्यात आलं आहे. तर याबाबत छगन भुजबळ यांनी सांगितले आहे की, भाजपाचे काही आमदार आमच्या संपर्कात असतील तर त्यांची नावे जाहीर करणार नाही, ते आमदार राजीनामा देऊन आले तर त्यांना महाविकास आघाडी पुन्हा निवडून आणू शकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  

पार्थ पवारांवरुन अजितदादा नाराज?

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या सीबीआय चौकशीची मागणी आणि राम मंदिराच्या निर्माणावेळी शुभेच्छा दिल्यानंतर पार्थ पवार यांच्यावर शरद पवारांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. मी माझ्या नातवाच्या मागणीला कवडीचीही किंमत देत नाही, तो इमॅच्युर आहे अशा शब्दात पवारांनी पार्थला फटकारलं होतं. त्यानंतर पार्थ पवारांनी याविषयी काही बोलण्यास नकार दिला मात्र या प्रकरणावरुन राजकीय वर्तुळात अजित पवार हे नाराज झाल्याची चर्चा उठली होती.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारparth pawarपार्थ पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस