शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

राष्ट्रवादीच्या रणनीतीचा भाजपाला फटका? शरद पवारांनी अजितदादांवर सोपवली नवी जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2020 16:29 IST

महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षाचं राजकारण आणि ताकद ओळखून त्या त्या जिल्ह्यात नेत्यांना पुन्हा पक्षात घेण्याचा विचार सुरु आहे.

ठळक मुद्देभाजपात गेलेल्या आमदारांना पुन्हा राष्ट्रवादीत घेण्याची रणनीतीपक्षात प्रवेश देण्यापूर्वी शिवसेना-काँग्रेसलाही विचारात घेणार आमदारांना राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवावी लागणार?

मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ पवार यांची कानउघडणी केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज झाल्याची चर्चा होती. मात्र त्यानंतर शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला अजितदादाही उपस्थित होते. या बैठकीत राष्ट्रवादीच्या पुढील रणनीतीबद्दल चर्चा झाल्याची माहिती आहे.

यामध्ये सर्वात मुख्य म्हणजे विधानसभा निवडणुकीपूर्वी जे लोक राष्ट्रवादीसोडून भाजपात गेले होते अशा नेत्यांना पुन्हा पक्षात घेण्याबाबत व्यूहरचना आखण्यात आल्याची माहिती आहे. याबैठकीला शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील यांच्यासह अन्य प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षाचं राजकारण आणि ताकद ओळखून त्या त्या जिल्ह्यात नेत्यांना पुन्हा पक्षात घेण्याचा विचार सुरु आहे.

पक्ष सोडून गेलेल्या कोणत्या नेत्यांना राष्ट्रवादीत परत घ्यायचं याची जबाबदारी जयंत पाटील आणि अजित पवारांवर दिली आहे. अलीकडेच राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी भाजपात गेलेले नेते पक्षात येण्यास उत्सुक आहेत, पण अद्याप त्यावर निर्णय झाला नाही. लवकरच कळवलं जाईल असं म्हटलं होतं. त्यामुळे बुधवारच्या बैठकीत या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे. याबाबत न्यूज १८ ने बातमी दिली आहे. 

राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीचं सरकार आहे. त्यामुळे भाजपातील कोणते नेत्यांचा अथवा आमदारांचा राष्ट्रवादीत प्रवेश करुन घ्यायचा याबाबत हालचाली सुरु आहेत, तसेच प्रवेश देण्यापूर्वी मित्रपक्ष शिवसेना-काँग्रेसला विश्वासात घेतलं जाईल असंही सांगण्यात आलं आहे. तर याबाबत छगन भुजबळ यांनी सांगितले आहे की, भाजपाचे काही आमदार आमच्या संपर्कात असतील तर त्यांची नावे जाहीर करणार नाही, ते आमदार राजीनामा देऊन आले तर त्यांना महाविकास आघाडी पुन्हा निवडून आणू शकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  

पार्थ पवारांवरुन अजितदादा नाराज?

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या सीबीआय चौकशीची मागणी आणि राम मंदिराच्या निर्माणावेळी शुभेच्छा दिल्यानंतर पार्थ पवार यांच्यावर शरद पवारांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. मी माझ्या नातवाच्या मागणीला कवडीचीही किंमत देत नाही, तो इमॅच्युर आहे अशा शब्दात पवारांनी पार्थला फटकारलं होतं. त्यानंतर पार्थ पवारांनी याविषयी काही बोलण्यास नकार दिला मात्र या प्रकरणावरुन राजकीय वर्तुळात अजित पवार हे नाराज झाल्याची चर्चा उठली होती.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारparth pawarपार्थ पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस