शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

काँग्रेस कार्यालयाबाहेर फडकला भगवा झेंडा; पोलीस बंदोबस्त तैनात, भाजपा नेत्यानं फटकारलं

By प्रविण मरगळे | Published: January 11, 2021 2:52 PM

भाजपा आणि काँग्रेस यांच्यातील राजकारण पेटलं

ठळक मुद्देभगवा रंग मान-सन्मानाचं प्रतीक आहे, काँग्रेस भगव्या रंगापासून अंतर ठेवत आहेतसर्वपक्षीय बैठकीत विरोधी पक्ष नेत्यांनी अधिवेशन तहकूब करण्यास सहमती दर्शविली होती कॉंग्रेस पक्षाचे आमदार प्रश्नांबाबत खोटी विधाने करीत आहेत

भोपाळ – भाजपा आणि काँग्रेसमध्ये जोरदार राजकारण पेटलं आहे. रविवारी डॉ. गोविंद सिंह आणि विश्वास सारंग एकमेकांसमोर आले आणि नव्या वादाला तोंड फुटलं आहे. कोणीतरी काँग्रेस कार्यालयाबाहेर सरकारी पोलवर भगवा झेंडा फडकवला, त्यावर काँग्रेसने आक्षेप नोंदवला. प्रकरणाचं गांभीर्य ओळखून काँग्रेस कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलिसांना बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलं होतं.  

या प्रकरणी कॅबिनेट मंत्री विश्वास सारंग म्हणाले की, भगवा रंग मान-सन्मानाचं प्रतीक आहे, काँग्रेस भगव्या रंगापासून अंतर ठेवत आहेत, त्यामुळे त्यांची अशी अवस्था झाली आहे. काँग्रेसवाल्यांनी भगव्याचा आदर करावा. विशेष म्हणजे रविवारी कॉंग्रेस आणि भाजप नेते आमनेसामने आले. गोविंद सिंह यांनी आमदारांच्या प्रश्नाकडून भाजपा पळ काढतेय असा आरोप केला तर विश्वास सारंग यांनी कॉंग्रेस नेत्यावर खोटी विधाने करून विधानसभा अधिवेशन तहकूब केल्याचा आरोप केला. माजी मंत्री डॉ. गोविंद सिंह यांनी माध्यमांना सांगितले की, विधानसभेत आमदारांनी विचारलेल्या प्रश्नांना सरकारने उत्तरे दिली पाहिजेत. सध्या विधानसभेत बावीस हजार प्रश्न प्रलंबित आहेत. याची उत्तरे यायला हवीत.

मुख्यमंत्री शिवराज चौहान यांना पत्र लिहिणार

माजी मंत्री म्हणाले की, या प्रकरणात प्रोटेम स्पीकर रामेश्वर शर्मा आणि सीएम शिवराज यांनाही पत्र देतील. सर्वपक्षीय बैठकीत आमदारांना प्रश्‍न देण्यासाठी समिती स्थापन करण्याबाबत सहमती दर्शविली गेली होती, परंतु अधिवेशन तहकूब झाल्यामुळे समिती अद्याप स्थापन झालेली नाही. सार्वजनिक प्रश्नांची उत्तरे न मिळाल्याने राज्यात अराजकता वाढत आहे.

कॉंग्रेसमुळे विधानसभा अधिवेशन तहकूब

डॉ गोविंद सिंह यांच्यावर पलटवार करताना कॅबिनेट मंत्री विश्वास सारंग म्हणाले की, विरोधकांमुळे आमदारांच्या प्रश्नांची उत्तरे येत नाहीत. सर्वपक्षीय बैठकीत विरोधी पक्ष नेत्यांनी अधिवेशन तहकूब करण्यास सहमती दर्शविली होती. विधानसभेचे अधिवेशन व्हावे अशी कॉंग्रेसची इच्छा नाही असं त्यांनी सांगितले, राज्य सरकार प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यास तयार आहे. कॉंग्रेस पक्षाचे आमदार प्रश्नांबाबत खोटी विधाने करीत आहेत असा आरोप त्यांनी केला.

युवक शिबिरावरही विश्वास सारंग यांनी लावले आरोप

युवक कॉंग्रेसच्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या संदर्भात राजकारण सुरू झालं आहे. युवक कॉंग्रेसला आक्रमक व्हावे लागेल, आक्रमकता ही युवक कॉंग्रेसची ओळख आहे. संजय गांधींच्या काळात युवक कॉंग्रेस ही सर्वात मजबूत संघटन होतं. विक्रांत भूरिया यांच्या नेतृत्वात युथ कॉंग्रेस पुन्हा मजबूत होईल असं डॉ. गोविंद सिंह म्हणाले, त्यावर भाजपाचे कॅबिनेट मंत्री विश्वास सारंग म्हणाले की, युवक कॉंग्रेसची ओळख ही भ्रष्ट संघटन आणि अनुशासनहीन आहे. युवक कॉंग्रेसने तरुणांमधील विश्वासार्हता गमावली आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपा