शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

"कॅप्टन हटवा,अन्यथा गेम ओव्हर," पंजाबमधील काँग्रेसच्या बड्या नेत्याचा पक्ष नेतृत्वाला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 11:03 AM

राजस्थानमधील वाद मिटून काही दिवस उलटत नाहीत तोच आता अजून एका राज्यात काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. राजस्थाननंतर आता कांग्रेसमधील अंतर्गत वादाची लाट पंजाबमध्ये पोहोचली आहे.

ठळक मुद्देपंजाबमधील काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रताप सिंग बाजवा यांनी कॅप्ट्न अमरिंदर सिंग यांच्याविरोधात उघडली आघाडीमुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांना पदावरून हटवण्यात यावे राज्यातील काँग्रेसचे ९० टक्क्यांहून अधिक आमदार हे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांच्याविरोधात, बाजवा यांचा दावा

चंदिगड - गेला महिनाभर चाललेल्या आरोप प्रत्यारोपांनंतर राजस्थान काँग्रेसमध्ये सुरू असलेला वाद प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांच्या यशस्वी हस्तक्षेपानंतर नुकताच मिटला आहे. मात्र राजस्थानमधील वाद मिटून काही दिवस उलटत नाहीत तोच आता अजून एका राज्यात काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. राजस्थाननंतर आता कांग्रेसमधील अंतर्गत वादाची लाट पंजाबमध्ये पोहोचली आहे.पंजाबमधील काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रताप सिंग बाजवा यांनी कॅप्ट्न अमरिंदर सिंग यांच्याविरोधात आघाडी उघडली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांना पदावरून हटवण्यात यावे, अशी मागणी पक्षनेतृ्वाकडे केली आहे. राज्यातील काँग्रेसचे ९० टक्क्यांहून अधिक आमदार हे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांच्याविरोधात आहेत. त्यामुळे पक्षनेतृत्वाने त्यांना पदावरून तत्काळ हटवावे, अन्यथा पंजाबमध्ये काँग्रेसचा गेम ओव्हर होईल, असा इशारा प्रताप सिंह बाजवा यांनी दिला आहे.बाजवा म्हणाले की, राज्यातील आमदार पक्षाच्या बाजूने पत्रके प्रसिद्ध करत आहेत. मात्र खरेतर ते सरकार आमि पक्षसंघटनेवर नाराज आहेत. कॅप्टन आणि जाखड यांचे नेतृत्व पंजाबमध्ये कायम राहावे, असे या आमदारांना वाटत नाही. त्यामुळे पक्षनेतृत्वाने याबाबत पक्षनेतृत्वाने लवकरच निर्णय घेतला पाहिजे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी आमदारांना गटागटाने न बोलावता एकेकाला दिल्लीत बोलावून त्यांची व्यथा ऐकली पाहिजे.मात्र यादरम्यान, मुख्यमंत्री, प्रदेश प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष यांना बोलावू नये. आमदारांशी चर्चा करून जेव्हा पक्षश्रेष्ठी कॅप्टन आणि जाखड यांच्यावर नाराज असलेल्या काँग्रेस आमदारांची मोजणी करतील तेव्हा नाराज आमदारांची संख्या ही ९० टक्क्यांऐवजी ९५ टक्के एवढी भरेल. असा दावाही बाजवा यांनी केला. तसेच पक्षनेतृत्वाने सर्वांची बाजू ऐकून घेऊन लवकरच स्थिती स्पष्ट करावी. परिस्थितीचे गांभीर्य पाहून कुण्या एका व्यक्तीच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले पाहिजे. मात्र कॅप्टन यांच्याकडे नेतृत्व सोपवले गेल्यास २०२२ पर्यंत राज्यात काँग्रेसचा गेमओव्हर होईल. तसेच मी काही कॅप्टनच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार नाही.काही दिवसांपूर्वी झालेल्या विषारी दारूकांडानंतर बाजवा आणि राज्यसभा खासदार समशेर सिंग दुलो यांनी सीबीआय तपासासाठी राज्यपालांकडे पत्रक दिले होते. तेव्हापासूनच पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत लढाई शिगेला पोहोचली आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसPunjabपंजाबPoliticsराजकारण